शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सिटी सर्व्हेच्या कार्यालयात कोरोना नियमांची धूळधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने धास्तावलेल्या सरकारने अंशत: टाळेबंदीची घोषणा ३१ मार्चपर्यंत केली आहे. त्या अनुषंगाने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने धास्तावलेल्या सरकारने अंशत: टाळेबंदीची घोषणा ३१ मार्चपर्यंत केली आहे. त्या अनुषंगाने नियमांसह शासकीय, खासगी प्रतिष्ठानांसोबतच सर्वसामान्यांना कोरोनाचे नियम घालून दिले आहेत. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणांकडून कठोर पावले उचलली जात आहेत. मात्र, शासकीय कार्यालयातच या नियमांची धूळधाण उडवली जात आहे. त्यांच्यावर कारवाई कोण करणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

सिव्हिल लाईन्स येथील विभागीय कार्यालयाच्या परिसरातील प्रशासकीय इमारतीच्या सहाव्या मजल्यावर सिटी सर्व्हेचे कार्यालय आहे. येथे शहरातील शेकडो-हजारोंच्या संख्येने नागरिक आपापल्या कामांसाठी येत असतात. कामात सुसूत्रता असावी आणि कुणाला ताटकळत बसावे लागू नये म्हणून कार्यालयात दररोज सकाळी ९ वाजता १०० टोकन वाटले जातात. ज्याचा क्रमांक लागेल त्याचा क्रमांक भिंतीवर टांगलेल्या टोकन वॉचवर झळकण्याची व्यवस्था आहे. मात्र, ही टोकन वॉच सुरू असतानाही त्याचा वापर होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रचंड गर्दी उसळलेली असते. शिवाय, दलालांचा राबता मोठा असतो. दलालांची कामे प्रथम, या तत्त्वावर येथील कर्मचारी काम करताना दिसतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना संध्याकाळपर्यंत ताटकळत उभे ठेवले जाते. ही बाब प्रशासकीय दिरंगाईची आहे. सोबतच कोरोना नियमांकडे दुर्लक्ष केले जाते. नागरिकांच्या तर सोडाच, कर्मचाऱ्यांच्या तोंडालाही मास्क दिसत नाही. नागरिकांमध्ये व्यक्तिश: अंतर जपण्याचे आवाहन केले जात नाही. सॅनिटायझरची व्यवस्था केवळ नाममात्र आहे. अशा स्थितीत कोरोना संक्रमण आटोक्यात येणार का आणि त्यात शासकीय कार्यालयांची भूमिका जबाबदारीची आहे का, असा सवाल सुज्ञ नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. याबाबत शिवसेनेचे युवा नेते प्रवीण शर्मा यांनी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व महापौरांकडे कारवाई करण्याची मागणी केली आहे. व्यापाऱ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना कोरोनाच्या नावाखाली प्रशासन वेठीस धरत आहे आणि दुसरीकडे स्वत:च कायद्याचे उल्लंघन करत असल्याचा आरोप शर्मा यांनी केला आहे.

...............