शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

धूलिकणांचे प्रदूषण सर्वाधिक त्रासदायक; नागपूरकरांसाठी उद्योग, बांधकाम, रस्त्याचीही धूळ कारणीभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2022 13:17 IST

धूलिकणांमुळे लोकांच्या आरोग्याचा धोका अनेक पटीने वाढला

नागपूर : उपराजधानीचा विस्तार आणि वाढत्या औद्योगिकरणासह प्रदूषणातही तीव्रतेने वाढ होत आहे. कार्बन, नायट्रोजनचे प्रदूषण वाढत आहेच; पण नागपूरकरांसाठी खरी डोकेदुखी धूलिकणांनी वाढविली आहे. १० मायक्रॉनखालील पार्टीकुलेट मॅटर (पीएम-१०) आणि २.५ मायक्रॉन आकाराचे पीएम-२.५ या अतिसूक्ष्म कणांनी लोकांच्या आरोग्याचा धोका वाढविला आहे. हे धूलिकण स्वतः धोकादायक आहेतच; पण ते विषारी वायू आणि प्रदूषणाचे वाहकही आहेत.

वायू प्रदूषणासाठी अनेक स्त्रोत कारणीभूत ठरतात. त्यात उद्योग, बांधकाम, रस्त्यावर धावणारी वाहने, निवासी परिसरात कचरा जाळण्याचा प्रकार आदींद्वारे प्रदूषणाचा विळखा पडतो. नागपूर शहरात लहान, मध्यम व मोठे जवळपास २१३ उद्योगांची नोंद आहे. शिवाय शहराला लागून असलेले ४८५६ मेगावॅटचे औष्णिक वीज केंद्र हे नागपूर व आसपासच्या भागात प्रदूषणाचे सर्वात भीषण कारण ठरले आहे.

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) ने धूलिकणांच्या प्रदूषणाबाबत कोरोनानंतर सर्वेक्षण केले होते. एमआयडीसी हिंगणा, मस्कासाथ, इतवारी, औद्योगिक बाजारपेठ तसेच निवासी क्षेत्रातही हे सर्वेक्षण केले होते. त्यात धूलिकण प्रदूषणाची धक्कादायक स्थिती दिसून आली होती. या धूलिकणांमुळे लोकांच्या आरोग्याचा धोका अनेक पटीने वाढला आहे. तज्ज्ञांच्या मते थंडीच्या काळात तापमान खाली घसरलेले असते. वातावरणात दवबिंदू पसरलेले असतात. धूलिकणांसह वाहत असलेले प्रदूषित घटक या दवबिंदूंना चिकटतात व वातावरणात वाहत असतात.

असरचे नागपूर शहरातील सर्वेक्षण

  • नागपूर शहरात दरवर्षी पीएम-१० चे तब्बल १०५ गिगाच्यावर उत्सर्जन होते. हे प्रमाण चंद्रपूर व अमरावतीपेक्षा अधिक आहे.
  • औष्णिक वीज केंद्राच्या परिसरात पीएम- १० चे उत्सर्जन ३४ टक्क्यांनी अधिक आहे.
  • त्यापाठोपाठ खराब रस्त्यावरून उडणारी धूळ पीएम-१० प्रदूषणाचे दुसरे मोठे कारण आहे. हे प्रमाण २१ टक्के आहे.
  • याशिवाय असंघटित क्षेत्रातून १६ टक्के, बांधकाम क्षेत्रातून ९ टक्के, मनपाद्वारे घनकचरा जाळल्याने ५ टक्के पीएम-१० ची भर
  • निवासी क्षेत्रातूनही धूलिकणांचे प्रदूषण वाढले आहे. झोपडपट्ट्यांमध्ये चुलीवर स्वयंपाकाने ७ टक्के तर रस्त्यावरील खाद्य विक्रेत्यांमुळे ४ टक्के धूलिकणांचे उत्सर्जन होते.

 

नीरीने केलेले सर्वेक्षण

  • औष्णिक वीज केंद्र व विकास प्रकल्पांच्या बांधकामामुळे धूलिकणांचे प्रदूषण धोकादायक स्तरावर वाढले आहे.
  • शहरात धावणारी वाहनांमुळे आणि निवासी क्षेत्रातही पीएम-१० व पीएम २.५ प्रदूषणाचा स्तर अधिक आहे.
  • पीएम-१० औद्योगिक क्षेत्रात १४.४ टक्के, बाजारपेठेत ४७.२ टक्के, निवासी क्षेत्रात ५२.१ टक्के एवढे आहे.
  • एप्रिल ते जून व नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात धूलिकण प्रदूषण सर्वाधिक असते.
  • पीएम-२.५ चा स्तर इतर क्षेत्रापेक्षा निवासी क्षेत्रात ११.५ टक्के अधिक आहे.
  • नोव्हेंबर ते फेब्रुवारी ते मेपर्यंत पीएम-१० व पीएम २.५ च्या प्रदूषणाचा स्तर सर्वाधिक असतो.
टॅग्स :pollutionप्रदूषणenvironmentपर्यावरणnagpurनागपूर