शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
6
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
7
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
8
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
9
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
10
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
11
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
12
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
13
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
14
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
15
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
16
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
17
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
18
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
19
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
20
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल

धूलिकणांचे प्रदूषण सर्वाधिक त्रासदायक; नागपूरकरांसाठी उद्योग, बांधकाम, रस्त्याचीही धूळ कारणीभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2022 13:17 IST

धूलिकणांमुळे लोकांच्या आरोग्याचा धोका अनेक पटीने वाढला

नागपूर : उपराजधानीचा विस्तार आणि वाढत्या औद्योगिकरणासह प्रदूषणातही तीव्रतेने वाढ होत आहे. कार्बन, नायट्रोजनचे प्रदूषण वाढत आहेच; पण नागपूरकरांसाठी खरी डोकेदुखी धूलिकणांनी वाढविली आहे. १० मायक्रॉनखालील पार्टीकुलेट मॅटर (पीएम-१०) आणि २.५ मायक्रॉन आकाराचे पीएम-२.५ या अतिसूक्ष्म कणांनी लोकांच्या आरोग्याचा धोका वाढविला आहे. हे धूलिकण स्वतः धोकादायक आहेतच; पण ते विषारी वायू आणि प्रदूषणाचे वाहकही आहेत.

वायू प्रदूषणासाठी अनेक स्त्रोत कारणीभूत ठरतात. त्यात उद्योग, बांधकाम, रस्त्यावर धावणारी वाहने, निवासी परिसरात कचरा जाळण्याचा प्रकार आदींद्वारे प्रदूषणाचा विळखा पडतो. नागपूर शहरात लहान, मध्यम व मोठे जवळपास २१३ उद्योगांची नोंद आहे. शिवाय शहराला लागून असलेले ४८५६ मेगावॅटचे औष्णिक वीज केंद्र हे नागपूर व आसपासच्या भागात प्रदूषणाचे सर्वात भीषण कारण ठरले आहे.

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) ने धूलिकणांच्या प्रदूषणाबाबत कोरोनानंतर सर्वेक्षण केले होते. एमआयडीसी हिंगणा, मस्कासाथ, इतवारी, औद्योगिक बाजारपेठ तसेच निवासी क्षेत्रातही हे सर्वेक्षण केले होते. त्यात धूलिकण प्रदूषणाची धक्कादायक स्थिती दिसून आली होती. या धूलिकणांमुळे लोकांच्या आरोग्याचा धोका अनेक पटीने वाढला आहे. तज्ज्ञांच्या मते थंडीच्या काळात तापमान खाली घसरलेले असते. वातावरणात दवबिंदू पसरलेले असतात. धूलिकणांसह वाहत असलेले प्रदूषित घटक या दवबिंदूंना चिकटतात व वातावरणात वाहत असतात.

असरचे नागपूर शहरातील सर्वेक्षण

  • नागपूर शहरात दरवर्षी पीएम-१० चे तब्बल १०५ गिगाच्यावर उत्सर्जन होते. हे प्रमाण चंद्रपूर व अमरावतीपेक्षा अधिक आहे.
  • औष्णिक वीज केंद्राच्या परिसरात पीएम- १० चे उत्सर्जन ३४ टक्क्यांनी अधिक आहे.
  • त्यापाठोपाठ खराब रस्त्यावरून उडणारी धूळ पीएम-१० प्रदूषणाचे दुसरे मोठे कारण आहे. हे प्रमाण २१ टक्के आहे.
  • याशिवाय असंघटित क्षेत्रातून १६ टक्के, बांधकाम क्षेत्रातून ९ टक्के, मनपाद्वारे घनकचरा जाळल्याने ५ टक्के पीएम-१० ची भर
  • निवासी क्षेत्रातूनही धूलिकणांचे प्रदूषण वाढले आहे. झोपडपट्ट्यांमध्ये चुलीवर स्वयंपाकाने ७ टक्के तर रस्त्यावरील खाद्य विक्रेत्यांमुळे ४ टक्के धूलिकणांचे उत्सर्जन होते.

 

नीरीने केलेले सर्वेक्षण

  • औष्णिक वीज केंद्र व विकास प्रकल्पांच्या बांधकामामुळे धूलिकणांचे प्रदूषण धोकादायक स्तरावर वाढले आहे.
  • शहरात धावणारी वाहनांमुळे आणि निवासी क्षेत्रातही पीएम-१० व पीएम २.५ प्रदूषणाचा स्तर अधिक आहे.
  • पीएम-१० औद्योगिक क्षेत्रात १४.४ टक्के, बाजारपेठेत ४७.२ टक्के, निवासी क्षेत्रात ५२.१ टक्के एवढे आहे.
  • एप्रिल ते जून व नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात धूलिकण प्रदूषण सर्वाधिक असते.
  • पीएम-२.५ चा स्तर इतर क्षेत्रापेक्षा निवासी क्षेत्रात ११.५ टक्के अधिक आहे.
  • नोव्हेंबर ते फेब्रुवारी ते मेपर्यंत पीएम-१० व पीएम २.५ च्या प्रदूषणाचा स्तर सर्वाधिक असतो.
टॅग्स :pollutionप्रदूषणenvironmentपर्यावरणnagpurनागपूर