शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

धूलिकणांचे प्रदूषण सर्वाधिक त्रासदायक; नागपूरकरांसाठी उद्योग, बांधकाम, रस्त्याचीही धूळ कारणीभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2022 13:17 IST

धूलिकणांमुळे लोकांच्या आरोग्याचा धोका अनेक पटीने वाढला

नागपूर : उपराजधानीचा विस्तार आणि वाढत्या औद्योगिकरणासह प्रदूषणातही तीव्रतेने वाढ होत आहे. कार्बन, नायट्रोजनचे प्रदूषण वाढत आहेच; पण नागपूरकरांसाठी खरी डोकेदुखी धूलिकणांनी वाढविली आहे. १० मायक्रॉनखालील पार्टीकुलेट मॅटर (पीएम-१०) आणि २.५ मायक्रॉन आकाराचे पीएम-२.५ या अतिसूक्ष्म कणांनी लोकांच्या आरोग्याचा धोका वाढविला आहे. हे धूलिकण स्वतः धोकादायक आहेतच; पण ते विषारी वायू आणि प्रदूषणाचे वाहकही आहेत.

वायू प्रदूषणासाठी अनेक स्त्रोत कारणीभूत ठरतात. त्यात उद्योग, बांधकाम, रस्त्यावर धावणारी वाहने, निवासी परिसरात कचरा जाळण्याचा प्रकार आदींद्वारे प्रदूषणाचा विळखा पडतो. नागपूर शहरात लहान, मध्यम व मोठे जवळपास २१३ उद्योगांची नोंद आहे. शिवाय शहराला लागून असलेले ४८५६ मेगावॅटचे औष्णिक वीज केंद्र हे नागपूर व आसपासच्या भागात प्रदूषणाचे सर्वात भीषण कारण ठरले आहे.

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) ने धूलिकणांच्या प्रदूषणाबाबत कोरोनानंतर सर्वेक्षण केले होते. एमआयडीसी हिंगणा, मस्कासाथ, इतवारी, औद्योगिक बाजारपेठ तसेच निवासी क्षेत्रातही हे सर्वेक्षण केले होते. त्यात धूलिकण प्रदूषणाची धक्कादायक स्थिती दिसून आली होती. या धूलिकणांमुळे लोकांच्या आरोग्याचा धोका अनेक पटीने वाढला आहे. तज्ज्ञांच्या मते थंडीच्या काळात तापमान खाली घसरलेले असते. वातावरणात दवबिंदू पसरलेले असतात. धूलिकणांसह वाहत असलेले प्रदूषित घटक या दवबिंदूंना चिकटतात व वातावरणात वाहत असतात.

असरचे नागपूर शहरातील सर्वेक्षण

  • नागपूर शहरात दरवर्षी पीएम-१० चे तब्बल १०५ गिगाच्यावर उत्सर्जन होते. हे प्रमाण चंद्रपूर व अमरावतीपेक्षा अधिक आहे.
  • औष्णिक वीज केंद्राच्या परिसरात पीएम- १० चे उत्सर्जन ३४ टक्क्यांनी अधिक आहे.
  • त्यापाठोपाठ खराब रस्त्यावरून उडणारी धूळ पीएम-१० प्रदूषणाचे दुसरे मोठे कारण आहे. हे प्रमाण २१ टक्के आहे.
  • याशिवाय असंघटित क्षेत्रातून १६ टक्के, बांधकाम क्षेत्रातून ९ टक्के, मनपाद्वारे घनकचरा जाळल्याने ५ टक्के पीएम-१० ची भर
  • निवासी क्षेत्रातूनही धूलिकणांचे प्रदूषण वाढले आहे. झोपडपट्ट्यांमध्ये चुलीवर स्वयंपाकाने ७ टक्के तर रस्त्यावरील खाद्य विक्रेत्यांमुळे ४ टक्के धूलिकणांचे उत्सर्जन होते.

 

नीरीने केलेले सर्वेक्षण

  • औष्णिक वीज केंद्र व विकास प्रकल्पांच्या बांधकामामुळे धूलिकणांचे प्रदूषण धोकादायक स्तरावर वाढले आहे.
  • शहरात धावणारी वाहनांमुळे आणि निवासी क्षेत्रातही पीएम-१० व पीएम २.५ प्रदूषणाचा स्तर अधिक आहे.
  • पीएम-१० औद्योगिक क्षेत्रात १४.४ टक्के, बाजारपेठेत ४७.२ टक्के, निवासी क्षेत्रात ५२.१ टक्के एवढे आहे.
  • एप्रिल ते जून व नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात धूलिकण प्रदूषण सर्वाधिक असते.
  • पीएम-२.५ चा स्तर इतर क्षेत्रापेक्षा निवासी क्षेत्रात ११.५ टक्के अधिक आहे.
  • नोव्हेंबर ते फेब्रुवारी ते मेपर्यंत पीएम-१० व पीएम २.५ च्या प्रदूषणाचा स्तर सर्वाधिक असतो.
टॅग्स :pollutionप्रदूषणenvironmentपर्यावरणnagpurनागपूर