शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

आपला करंटेपणा, राजकारण्यांच्या माजलेपणामुळे हातचा विदर्भ गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2022 20:38 IST

Nagpur News फजल अली आयोगाने स्वतंत्र विदर्भ दिला होता. परंतु, आपल्या करंटेपणाने आणि राजकारण्यांना आलेल्या माजामुळे तोंडचा घास पळवला गेल्याचे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश (सेवानिवृत्त) विकास सिरपूरकर यांनी आज येथे केले.

ठळक मुद्दे श्रीनिवास खांदेवालेंच्या ‘आमचा ७/१२ आमच्या नावे’ पुस्तकाचे प्रकाशन

नागपूर : फजल अली आयोगाने स्वतंत्र विदर्भ दिला होता. परंतु, आपल्या करंटेपणाने आणि राजकारण्यांना आलेल्या माजामुळे तोंडचा घास पळवला गेल्याचे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश (सेवानिवृत्त) विकास सिरपूरकर यांनी आज येथे केले.

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी लिहिलेल्या ‘आमचा ७/१२ आमच्या नावे’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना न्या. सिरपूरकर आपल्या भावना व्यक्त करत होते. सिव्हिल लाईन्स येथील प्रेस क्लबमध्ये पार पडलेल्या या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार ॲड. वामनराव चटप होते तर व्यासपीठावर माजी पोलीस महासंचालक प्रबीरकुमार चक्रवर्ती, ॲड. सुरेश वानखेडे, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, डॉ. जी. एस. ख्वाजा, विष्णुपंत आष्टीकर, प्रभाकर कोंडबत्तूनवार, अरुण केदार, रंजना मामर्डे उपस्थित होते.

राजकारण्यांचे समाजकारण हे माजकारण असते, हे संयुक्त महाराष्ट्र कृती समितीद्वारे तत्कालीन राजकीय नेत्यांनी सिद्ध केले. विदर्भ वेगळा झाला असता तर त्यांच्या पक्षाला बहुमत मिळाले नसते. या भीतीपोटी त्यांनी विदर्भाला महाराष्ट्रात टाकले. मी प्रखर विदर्भवादी असून, मी असो वा नसो, विदर्भ स्वतंत्र होणारच असल्याचे न्या. विकास सिरपूरकर यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन मुकेश मासूरकर यांनी केले तर प्रास्ताविक प्रभाकर कोंडबत्तूनवार यांनी केले.

विदर्भाचे आंदोलन हे बहुजनांचे - श्रीनिवास खांदेवाले

विदर्भवाद्यांचे आंदोलन हे अभिजनांचे असल्याचा भ्रम मुद्दामहून निर्माण केला जात आहे. मात्र, हे आंदोलन बहुजनांचे अर्थात सर्वांचेच असल्याचे डॉ. श्रीनिवास खांदेवाले यावेळी म्हणाले. या आंदोलनातून साहित्यिकांनी फारकत घेतल्याचे कायम दिसते. त्यांनी तिकडले हारतुरे चालतात. परंतु, जेव्हा अन्याय होतो, तेव्हा विदर्भ आंदोलक आठवत असतात, असा टोला खांदेवाले यांनी विदर्भातील सांस्कृतिक व साहित्य क्षेत्राला लगावला.

पुन्हा एकदा एल्गार - वामनराव चटप

लोकमान्य टिकळांचे ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे’, अण्णाभाऊ साठे यांचे ‘जागते रहो’, सावरकरांचे ‘रणाविन स्वातंत्र्य कुणा मिळाले’ या घोषणांचा आणि कृतींचा कृतिशील पुनरुच्चार होणे गरजेचे असल्याचे मत ॲड. वामनराव चटप यांनी व्यक्त करतानाच पुन्हा एकदा एल्गार पुकारण्याची ही वेळ असल्याचे म्हटले.

..................

टॅग्स :literatureसाहित्य