शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

आपला करंटेपणा, राजकारण्यांच्या माजलेपणामुळे हातचा विदर्भ गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2022 20:38 IST

Nagpur News फजल अली आयोगाने स्वतंत्र विदर्भ दिला होता. परंतु, आपल्या करंटेपणाने आणि राजकारण्यांना आलेल्या माजामुळे तोंडचा घास पळवला गेल्याचे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश (सेवानिवृत्त) विकास सिरपूरकर यांनी आज येथे केले.

ठळक मुद्दे श्रीनिवास खांदेवालेंच्या ‘आमचा ७/१२ आमच्या नावे’ पुस्तकाचे प्रकाशन

नागपूर : फजल अली आयोगाने स्वतंत्र विदर्भ दिला होता. परंतु, आपल्या करंटेपणाने आणि राजकारण्यांना आलेल्या माजामुळे तोंडचा घास पळवला गेल्याचे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश (सेवानिवृत्त) विकास सिरपूरकर यांनी आज येथे केले.

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी लिहिलेल्या ‘आमचा ७/१२ आमच्या नावे’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना न्या. सिरपूरकर आपल्या भावना व्यक्त करत होते. सिव्हिल लाईन्स येथील प्रेस क्लबमध्ये पार पडलेल्या या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार ॲड. वामनराव चटप होते तर व्यासपीठावर माजी पोलीस महासंचालक प्रबीरकुमार चक्रवर्ती, ॲड. सुरेश वानखेडे, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, डॉ. जी. एस. ख्वाजा, विष्णुपंत आष्टीकर, प्रभाकर कोंडबत्तूनवार, अरुण केदार, रंजना मामर्डे उपस्थित होते.

राजकारण्यांचे समाजकारण हे माजकारण असते, हे संयुक्त महाराष्ट्र कृती समितीद्वारे तत्कालीन राजकीय नेत्यांनी सिद्ध केले. विदर्भ वेगळा झाला असता तर त्यांच्या पक्षाला बहुमत मिळाले नसते. या भीतीपोटी त्यांनी विदर्भाला महाराष्ट्रात टाकले. मी प्रखर विदर्भवादी असून, मी असो वा नसो, विदर्भ स्वतंत्र होणारच असल्याचे न्या. विकास सिरपूरकर यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन मुकेश मासूरकर यांनी केले तर प्रास्ताविक प्रभाकर कोंडबत्तूनवार यांनी केले.

विदर्भाचे आंदोलन हे बहुजनांचे - श्रीनिवास खांदेवाले

विदर्भवाद्यांचे आंदोलन हे अभिजनांचे असल्याचा भ्रम मुद्दामहून निर्माण केला जात आहे. मात्र, हे आंदोलन बहुजनांचे अर्थात सर्वांचेच असल्याचे डॉ. श्रीनिवास खांदेवाले यावेळी म्हणाले. या आंदोलनातून साहित्यिकांनी फारकत घेतल्याचे कायम दिसते. त्यांनी तिकडले हारतुरे चालतात. परंतु, जेव्हा अन्याय होतो, तेव्हा विदर्भ आंदोलक आठवत असतात, असा टोला खांदेवाले यांनी विदर्भातील सांस्कृतिक व साहित्य क्षेत्राला लगावला.

पुन्हा एकदा एल्गार - वामनराव चटप

लोकमान्य टिकळांचे ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे’, अण्णाभाऊ साठे यांचे ‘जागते रहो’, सावरकरांचे ‘रणाविन स्वातंत्र्य कुणा मिळाले’ या घोषणांचा आणि कृतींचा कृतिशील पुनरुच्चार होणे गरजेचे असल्याचे मत ॲड. वामनराव चटप यांनी व्यक्त करतानाच पुन्हा एकदा एल्गार पुकारण्याची ही वेळ असल्याचे म्हटले.

..................

टॅग्स :literatureसाहित्य