शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

रस्ते अपघातात राज्यातील ३ वाघ, ५० बिबट्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 11:12 IST

राज्यातील एका वनपरिक्षेत्रातून दुसऱ्या परिक्षेत्रात स्थानांतरण करताना (महामार्ग ओलांडताना) वन्यप्राण्यांच्या रस्ता अपघातात होणाऱ्या मृत्यूची संख्या चिंतेत टाकणारी आहे.

ठळक मुद्देदोन वर्षांत वन्यप्राण्यांच्या मृत्यूची संख्या चिंताजनक नागपूर-अमरावती महामार्गावर नुकताच वाघ आणि बिबट्यांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: राज्यातील एका वनपरिक्षेत्रातून दुसऱ्या परिक्षेत्रात स्थानांतरण करताना (महामार्ग ओलांडताना) वन्यप्राण्यांच्या रस्ता अपघातात होणाऱ्या मृत्यूची संख्या चिंतेत टाकणारी आहे. मागील दोन वर्षात संपूर्ण राज्यात ३ वाघांचा आणि ५० बिबट्यांचा रस्ता ओलांडताना अपघाती मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली आहे.२०१६ च्या आकडेवारीनुसार संपूर्ण राज्यात १४ वाघांचा मृत्यू झाला. यात ११ नैसर्गिक, एकाचा शिकारीने तर दोन वाघांचा मृत्यू रस्ता अपघातात झाला. तर ७ बिबट्यांची शिकार करण्यात आली असून, २९ बिबट्यांचा मृत्यू रस्ता अपघातात झाले. याचप्रकारे २०१७ मध्ये ९ बिबट्यांची शिकार करण्यात आली तर २१ बिबट्यांचा मृत्यू रस्ता अपघातात झाले.गेल्या वर्षी एक वाघ (बाजीराव) याचा नागपूर-अमरावती महामार्ग ओलांडताना वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. वाघ, बिबट्यांसह इतर वन्यप्राण्यांचेही अपघातात मृत्यू होत आहेत. या महामार्गाला ओलांडून बोर व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राणी पुढे कोंढाळी, काटोल, कळमेश्वरमार्गे पेंच व्याघ्र प्रकल्पापर्यंत येतात. वन्यप्राण्यांना वाचविण्यासाठी त्यांचे स्थलांतरणही आवश्यक मानले जाते. एकाच परिक्षेत्रात राहिल्याने त्यांचे अस्तित्व संकटात येण्याची भीती असते.

साडेतीन महिन्यात वाघ-बिबट्याचा अपघातात मृत्यूनागपूर-अमरावती महामार्गावर १३ एप्रिल २०१८ रोजी सायंकाळी कोंढाळी रेंजच्या जुन्या पाण्याच्या शिवाराजवळ एका वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला. त्यापूर्वी २९ डिसेंबर २०१७ रोजी अमरावती महामार्गावर बोरमधील प्रसिद्ध वाघ बाजीरावला अज्ञात वाहनाने जोरदार धडक देऊन मारले होते.

धोकादायक ठिकाणी आवश्यक उपाययोजना व्हावीमानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांनी सांगितले की, वाघ-बिबट किंवा इतर वन्यप्राण्यांचे एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात जाणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. ते थांबायला नको. अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या मार्गासाठी वन विभागाची परवानगी घेतली जाते. वन्यप्राण्यांच्या ये-जा यासाठी अंडरपासेस बांधणे आवश्यक आहे. परंतु जे रस्ते अगोदरच बांधले गेले किंवा अभयारण्याला लागून नाहीत अशा रस्त्यांवरील धोकादायक ठिकाणांची ओळख व्हावी आणि तिथे आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात.

टॅग्स :Tigerवाघ