शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
3
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
4
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
5
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
6
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
7
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
8
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
9
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
10
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
11
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
12
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
13
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
15
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
16
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
17
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
18
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
19
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
20
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला

कोळशाच्या ‘डॅमरेज’मुळे महानिर्मितीला कोट्यवधीचा फटका

By admin | Updated: November 17, 2015 04:23 IST

वीजनिर्मितीसाठी औष्णिक विद्युत केंद्रांना लागणारा कोळसा आयात केल्यानंतर रेल्वे मालगाडीतून तो वेळेवर रिकामा न

नागपूर : वीजनिर्मितीसाठी औष्णिक विद्युत केंद्रांना लागणारा कोळसा आयात केल्यानंतर रेल्वे मालगाडीतून तो वेळेवर रिकामा न केल्याबद्दल महानिर्मितीला कोट्यवधीचा फटका दरवर्षी बसतो. महानिर्मितीच्या तिजोरीतून गेलेल्या या कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड अखेर सर्वसामान्य ग्राहकांवर पडतो. यासंदर्भात महानिर्मितीने अजूनपर्यंत कोणतीही उपाययोजना केली नसल्याचे समजते.महानिर्मितीने अभय कोलारकर यांना माहितीच्या अधिकारात दिलेल्या आकडेवारीवरू न केवळ तीनच वीजनिर्मिती केंद्रांचे डॅमरेज हे कोट्यवधीच्या घरात असल्याचे सिद्ध झाले आहे. वीजनिर्मिती केंद्रांसाठी लागणारा कोळसा निर्मिती केंद्रापर्यंत रेल्वे मालगाडीने आणला जातो. प्रत्येक निर्मिती केंद्रापर्यंत रेल्वेचे रुळ टाकण्यात आले आहेत. या केंद्रांना लागणारा हजारो टन कोळसा रेल्वेद्वारे पोहोचवला जातो. कोळशाने भरलेले रेल्वेचे पूर्ण डबे रिकामे करण्यासाठी रेल्वेने महानिर्मितीला सात तासांचा अवधी दिलेला असतो. एक १६ डब्याची रेल्वेगाडी सात तासात रिकामी करावी लागते. जर सात तासात गाडी रिकामी केली गेली नाही, तर प्रत्येक डब्याला प्रत्येक तासाला रेल्वे महानिर्मितीकडून दंड ‘डॅमरेज’ वसूल करते. म्हणजेच सात तासांपेक्षा जास्त अवधी झाल्यास प्रत्येक तासाला प्रत्येक डब्याला रेल्वे दंड लावते. महानिर्मितीने रेल्वेतून कोळसा रिकामा करण्याचे कंत्राट खाजगी कंपन्यांना दिले आहे. ऊर्जामंत्र्यांनी घेतली दखल कोट्यवधींच्या घरात करण्यात येणाऱ्या या डॅमरेजच्या खर्चाची दखल ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली असून हा खर्च कसा वाचेल, यासंदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांना विचारणा केली आहे. महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांना सप्टेंबरमध्ये त्यांनी एक पत्र पाठवून विचारणा केली आहे. पण महानिर्मितीने त्यावर अजूनपर्यंत कोणतीही उपाययोजना केली नसल्याचे समजते.