शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरित पक्ष्यांच्या संख्येत २५ टक्क्याने घट

By admin | Updated: January 18, 2016 03:01 IST

तलावांवर वाढती मासेमारी, पक्ष्यांची शिकार व काठावर मोबाईलमधील गाण्याच्या गोंगाटामुळे स्थलांतरित पक्ष्यांची संख्या २५ टक्क्यांनी कमी झाली आहे.

शिकार व वाढलेली मासेमारी मुख्य कारण : ‘बर्ड आॅफ विदर्भ’तर्फे पक्षी गणनानागपूर : तलावांवर वाढती मासेमारी, पक्ष्यांची शिकार व काठावर मोबाईलमधील गाण्याच्या गोंगाटामुळे स्थलांतरित पक्ष्यांची संख्या २५ टक्क्यांनी कमी झाली आहे. ‘बर्ड आॅफ विदर्भ’ यांनी केलेल्या पक्षी गणनेतून ही माहिती समोर आली आहे. गेल्यावर्षी ११ हजारांपेक्षा जास्त पक्ष्यांची नोंद झाली होती. यावेळी ९,४१२ पक्षी आढळून आले आहेत. वनखात्याच्या दोन टप्प्यात पाणवठ्यावरील पक्ष्यांची गणना करण्यात आली. पहिला टप्पा २० डिसेंबर रोजी झाला. यात ४२ तलावांवर ७,१२७ पक्षी आढळून आले. मागील वर्षी ११ हजारावर पक्षी आढळले होते. १० जानेवारी रोजी झालेल्या दुसऱ्या टप्प्यात ८३ प्रजातींच्या ९,४१२ पक्ष्यांची नोंद झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आकडेवारी २५ टक्क्यांनी कमी आहे. याला घेऊन पक्षी अभ्यासकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या संदर्भाचा अहवाल पर्यावरण मंत्र्यांना देण्याचा तयारीत पक्षिप्रेमी आहेत. (प्रतिनिधी)मत्स्य गरुड पक्षी आढळलादुर्मिळ असलेला राखडी डोक्याचा मत्स्य गरुड हा पक्षी जोडीने आढळला. ‘नीअर थ्रेटंन’ असलेल्या या प्रजातीचे लोहाराच्या तलावावर दर्शन झाल्याने पक्षिप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण होते. पक्षी गणनेत पक्षी निरीक्षकांसह अभ्यासक, पक्षिप्रेमी, रामदेवबाबा इंजिनिअरिंग कॉलेजचे शिक्षक व विद्यार्थी, विदर्भ नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संस्थापक सदस्य डॉ. अनिल पिंपळापुरे, प्रकाश गर्दे, मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांचाही सहभाग होता. पक्षी गणना यशस्वी करण्यासाठी बर्डस् आॅफ विदर्भचे सुरेंद्र अग्निहोत्री, नितीन मराठे, विनीत अरोरा, संकेत धाराशिवकर, संजय खोलीया आणि आशिष तिवारी यांनी योगदान दिले.तलावाच्या परिसरात शेतीपक्षी अभ्यासक अविनाश लोंढे यांनी सांगितले, पाटबंधारे विभागाने पाणी नसलेल्या तलावाच्या जागेवर शेती करण्याला परवानगी दिली आहे. याशिवाय तलावांवर अतिप्रमाणात होत असलेली मासेमारी, पार्ट्या, मोबाईलवर सुरू असलेली गाणी, या सर्वांचा परिणाम पक्ष्यांवर होत आहे. यामुळे स्थलांतरित पक्ष्यांसोबतच स्थानिक पक्ष्यांची संख्या रोडावली आहे. मासेमारीकरिता फेब्रुवारी ते नोव्हेंबरपर्यंतच कंत्राटे द्यावीत. त्यामुळे अन्न व साखळीतील प्रमुख घटक असलेल्या पक्ष्यांच्या संख्येत वाढ होण्यास मदत होईल.