शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

राज्यातील ४३ गावांत होणार ‘पेयजलक्रांती’

By admin | Updated: May 29, 2017 17:27 IST

राज्यातील ग्रामीण भागातील दीर्घकालीन गरजांचा व आरोग्यांचा विचार करुन ग्रामीण जनतेला शुध्द व मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध करण्याचा दृष्टीने राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे.

प्रशांत देसाई । आॅनलाईन लोकमतभंडारा : राज्यातील ग्रामीण भागातील दीर्घकालीन गरजांचा व आरोग्यांचा विचार करुन ग्रामीण जनतेला शुध्द व मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध करण्याचा दृष्टीने राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत राज्यातील ४३ गावांसाठी नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. २५ कोटी ८३ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून यातून ग्रामीणांसाठी ‘पेयजल’ निर्माण करण्यात येत आहे. हा कार्यक्रम राज्यभरात सन २०१६ -२०१७ ते २०१९-२० या चार वर्षांसाठी राबविण्यात येणार असून या कार्यक्रमाचे तीन प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या अंमलबजावणीचे कोणतेही अधिकार ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीला राहणार नाही. ही योजना जिल्हा परिषद प्रशासन हाताळणार आहे. भंडारा तालुक्यातील गणेशपूर, आमगाव व साकोली तालुक्यातील सुकळी या गावांचा समावेश आहे. जिल्हानिहाय मंजूर झालेली योजनाभंडारा- गणेशपूर, साकोली, आमगाव; यवतमाळ - ब्रम्ही, वेणी; जालना- लोणी (खु), आनंदगाव ; चंद्रपूर- लखमापूर, गोविंदपूर ; अहमदनगर- रस्तापूर, डोणगाव; सोलापूर- ज्योतीबाची वाडी, अकोले मंद्रुप, नरोटेवाडी, उमरगे ; सांगली - डोंगरसोनी, हिंगणगाव, हिवरे; वर्धा- कानगाव, डोंगरगाव ; गोंदिया- रापेवाडा, नवरगाव, डोंगरगाव, सहेसपूर ; नांदेड -दुगाव, निमगाव ; नागपूर - तामसवाडी, मानेगाव, रेवराळ ; जळगाव - जुनोने, वाधळी, भोद, चिचंपुरे ; नाशिक- भेगु ; अकोला-गोरेगाव, अन्वी, सारकिन्ही, दगडपारवा, धोत्राशिंदे, सोनाळा, मनाब्दा ; परभणी - हिस्सी, रायपूर