शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

पिण्याच्या पाण्याची चिंता नाही

By admin | Updated: June 28, 2014 02:36 IST

जून संपत आला तरी मृगाचा पाऊस बरसला नाही. त्यामुळे राज्यभर जलसंकट निर्माण झाल्याचे चित्र आहे. असे असले तरी नागपूरकरांना आताच चिंता करण्याची गरज नाही.

नागपूर : जून संपत आला तरी मृगाचा पाऊस बरसला नाही. त्यामुळे राज्यभर जलसंकट निर्माण झाल्याचे चित्र आहे. असे असले तरी नागपूरकरांना आताच चिंता करण्याची गरज नाही. नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह व नवेगाव खैरी या दोन्ही जलाशयात मुबलक जलसाठा उपलब्ध आहे. या दोन्ही जलाशयांमध्ये जवळपास चार महिने पुरेल एवढा साठा आहे. त्यामुळे नागपुरात सध्यातरी कुठल्याही प्रकारची पाणीकपात होण्याची शक्यता नाही, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ही बाब नागपूरकरांना दिलासा देणारी आहे. तोतलाडोह जलाशयातून नवेगाव खैरी जलाशयात पाणी सोडले जाते. तेथून पाणी कन्हान येथे आणले जाते. कन्हानमध्ये पंपिंग करून पाणी गोरेवाडा तलावात पोहचविले जाते. तेथून राजभवन टाकीला पुरवठा करून शहरात सर्वत्र वितरित केले जाते. तोतलाडोह येथे ४६६ दलघमी म्हणजे क्षमतेच्या ४५ टक्के जलसाठा आहे. नवेगाव खैरीमध्ये १६३ दलघमी म्हणजे ९१ टक्के जलसाठा आहे. नागपूर शहराला दररोज ६५० दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. पाणी पुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी महापौर अनिल सोले यांनी बैठक घेतली. तीत उपमहापौर जैतूनबी अंसारी, आ. सुधाकरराव देशमुख, स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर, आयुक्त श्याम वर्धने, सत्तापक्ष नेते प्रवीण दटके, जलप्रदाय समितीचे अध्यक्ष सुधाकर कोहळे, रमेश शिंगारे उपस्थित होते. बैठकीनंतर सुधाकर कोहळे यांनी सांगितले की, गोरेवाडा तलावातील जलस्तर कमी होण्यासाठी आरेंजसिटी वॉटर वर्क (ओसीडब्ल्यू) महादुला येथे अनियमित वीज पुरवठा होत असल्याचे कारण देत आहे. वास्तविकता गोरेवाडा तलावाच्या गेटमध्ये कचरा फसल्यामुळे पाणीपुरवठ्यात अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे. संबंधित प्रकरणी महापौरांनी ओसीडब्ल्यूच्या कर्मचाऱ्यांना फटकारल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)