शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

पिण्याच्या पाण्याची चिंता नाही

By admin | Updated: June 28, 2014 02:36 IST

जून संपत आला तरी मृगाचा पाऊस बरसला नाही. त्यामुळे राज्यभर जलसंकट निर्माण झाल्याचे चित्र आहे. असे असले तरी नागपूरकरांना आताच चिंता करण्याची गरज नाही.

नागपूर : जून संपत आला तरी मृगाचा पाऊस बरसला नाही. त्यामुळे राज्यभर जलसंकट निर्माण झाल्याचे चित्र आहे. असे असले तरी नागपूरकरांना आताच चिंता करण्याची गरज नाही. नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह व नवेगाव खैरी या दोन्ही जलाशयात मुबलक जलसाठा उपलब्ध आहे. या दोन्ही जलाशयांमध्ये जवळपास चार महिने पुरेल एवढा साठा आहे. त्यामुळे नागपुरात सध्यातरी कुठल्याही प्रकारची पाणीकपात होण्याची शक्यता नाही, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ही बाब नागपूरकरांना दिलासा देणारी आहे. तोतलाडोह जलाशयातून नवेगाव खैरी जलाशयात पाणी सोडले जाते. तेथून पाणी कन्हान येथे आणले जाते. कन्हानमध्ये पंपिंग करून पाणी गोरेवाडा तलावात पोहचविले जाते. तेथून राजभवन टाकीला पुरवठा करून शहरात सर्वत्र वितरित केले जाते. तोतलाडोह येथे ४६६ दलघमी म्हणजे क्षमतेच्या ४५ टक्के जलसाठा आहे. नवेगाव खैरीमध्ये १६३ दलघमी म्हणजे ९१ टक्के जलसाठा आहे. नागपूर शहराला दररोज ६५० दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. पाणी पुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी महापौर अनिल सोले यांनी बैठक घेतली. तीत उपमहापौर जैतूनबी अंसारी, आ. सुधाकरराव देशमुख, स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर, आयुक्त श्याम वर्धने, सत्तापक्ष नेते प्रवीण दटके, जलप्रदाय समितीचे अध्यक्ष सुधाकर कोहळे, रमेश शिंगारे उपस्थित होते. बैठकीनंतर सुधाकर कोहळे यांनी सांगितले की, गोरेवाडा तलावातील जलस्तर कमी होण्यासाठी आरेंजसिटी वॉटर वर्क (ओसीडब्ल्यू) महादुला येथे अनियमित वीज पुरवठा होत असल्याचे कारण देत आहे. वास्तविकता गोरेवाडा तलावाच्या गेटमध्ये कचरा फसल्यामुळे पाणीपुरवठ्यात अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे. संबंधित प्रकरणी महापौरांनी ओसीडब्ल्यूच्या कर्मचाऱ्यांना फटकारल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)