शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

दक्षिण नागपुरातील ड्रेनेज लाईनमुळे विहिरींचे पाणी दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:08 IST

नागपूर - दक्षिण नागपुरातील अयोध्यानगर ते नंदनवन भागात ड्रेनेज लाईनमुळे विहिरींचे पाणी दूषित होत आहे. अनेकांनी नाईलाजाने विहिरी बुजविल्या ...

नागपूर - दक्षिण नागपुरातील अयोध्यानगर ते नंदनवन भागात ड्रेनेज लाईनमुळे विहिरींचे पाणी दूषित होत आहे. अनेकांनी नाईलाजाने विहिरी बुजविल्या असून, या भागातील लोकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचा आरोप युवा चेतना मंचतर्फे करण्यात आला आहे.

१९६० च्या कालावधीत केंद्र सरकारने दक्षिण नागपूर वस्तीचा विस्तार केला आणि तेव्हा रस्ते, वीज आणि आरोग्य या सुविधा करण्यात आल्या. १९६३ मध्ये या भागात अयोध्यानगर ते नंदनवन ड्रेनेज लाईन टाकण्यात आली. या भागात पूर्वी शेती होती. त्यामुळे येथे काळी मातीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे ९ इंचाचे सिमेंटचे पाईप टाकून ड्रेनेज लाईन टाकण्यात आली होती. परंतु नंतर मोठ्या प्रमाणात या भागाचा विस्तार झाला आणि समस्यांना सुरुवात झाली. ड्रेनेज लाईन चोक होण्यास प्रारंभ झाला. कालांतराने ही ड्रेनेज लाईन हळूहळू क्षतिग्रस्त झाली आणि या भागातील विहिरी व पाण्याचे स्रोत प्रदूषित झाले. विहिरीचे पाणी खराब झाल्यामुळे लोकांनी आपल्या विहिरी बुजविल्या. या परिसरात मोठ्या प्रमाणात ड्रेनेज लाईन चोकअप होत राहतात. शिवाय कावीळसारखे आजारदेखील होतात. या भागात सिमेंट रोडचे काम पूर्ण होण्यापूर्वी येथे मोठी ड्रेनेज लाईन टाकण्यात यावी, अशी मागणी युवा चेतना मंचतर्फे करण्यात आली. मंचचे राष्ट्रीय उपाध्यक्ष महेश शिवाजीराव महाडिक यांच्या नेतृत्वात मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले. यावेळी दत्ता शिर्के, राहुल बांबल, प्रवीण घरजाळे इत्यादी उपस्थित होते.