शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
8
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
9
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
10
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
11
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
12
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
13
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
14
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
15
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
16
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
17
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
18
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
19
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
20
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार

आंभोरा उपसा सिंचन योजनेला थकीत पाणी पट्टीचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:07 IST

वेलतूर : पाणीपट्टी अडल्याने कुही तालुक्यातील आंभोरा उपसा सिंचन योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्यांनी पाणीपट्टी न भरल्यास ७,५०० ...

वेलतूर : पाणीपट्टी अडल्याने कुही तालुक्यातील आंभोरा उपसा सिंचन योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्यांनी पाणीपट्टी न भरल्यास ७,५०० हजार हेक्टर क्षेत्राचे सिंचन थांबेल, हे निश्चित.

मधल्या काळात पावसाने दडी मारल्याने परिसरातील धानाचे पऱ्हे सुकण्याच्या मार्गावर आहे. काही ठिकाणी रोवणी खोळंबली आहे. शेतकऱ्यांना आंभोरा उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळणे शक्य आहे. मात्र देखभाल दुरुस्ती व विजेचे बिल भरण्यासाठी विभागाकडे पैसे नसल्याने शेतकऱ्यांना पाणी देणे शक्य नाही. यासंदर्भात कार्यकारी अभियंता के.डी.दमाये यांनी पदाधिकारी व शेतकऱ्यांची बैठक घेत दहा दिवसात पाणीपट्टी वसूल न झाल्यास सिंचनासाठी पाणी देणे शक्य होणार नसल्याचे स्पष्ट केले. यावर काही शेतकरी व लोकप्रतिनिधीनी ही योजना बंद करण्यात येऊ नये, अशी मागणी केली. यासोबतच थकीत पाणीपट्टी वसूल करण्यासाठी सिंचन विभागाला सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावर दमाये यांनी स्थानिक कर्मचाऱ्यांना जे शेतकरी पाणी पट्टी भरण्यास तयार नसतील त्यांचे पाणीबंद करण्याचे तसेच त्यांच्या सातबाऱ्यावर कर्जाचा बोझा चढविण्याचे आदेश दिले. बैठकीला सहायक अभियंता एस.एम.वाहाने, पं.स.सभापती अश्विनी शिवणकर. जि.प.सदस्य कविता साखरवाडे, मांढळ बाजार समितीचे सभापती मनोज तितरमारे, पं. स. सदस्य पंकज मेश्राम, माजी सरपंच ग्यानीवंत साखरवाडे, सुधीर बेले, गुणवंता लांजेवार आणि स्थानिक शेतकरी उपस्थित होते.