शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

एनएचएआयचे वरातीमागून डीपीआरचे घोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:48 IST

अजनी वाचवा नागपूर : अजनीवन परिसरात हाेऊ घातलेल्या इंटर माॅडेल स्टेशन (आयएमएस) अनेक प्रकारच्या अतार्किक बाबी समाेर येत आहेत. ...

अजनी वाचवा

नागपूर : अजनीवन परिसरात हाेऊ घातलेल्या इंटर माॅडेल स्टेशन (आयएमएस) अनेक प्रकारच्या अतार्किक बाबी समाेर येत आहेत. काेणताही प्रकल्प साकार करण्यापूर्वी त्याचा नियाेजन आराखडा तयार करणे आवश्यक असते. नंतरच वर्क ऑर्डर काढले जातात. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा (एनएचएआय) कारभार उलट्या दिशेने चालत असल्याचे दिसते. संस्थेने गेल्या वर्षीच आयएमएसच्या कामाचे कंत्राट एका कंपनीला दिलेले असताना आता संपूर्ण प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्यासाठी टेंडर काढण्यात येत आहेत. या प्रकाराला कुणी न्यायालयात आव्हान दिले तर मुळ प्रकल्पच अडचणित येऊ शकतो.

आयएमएस प्रकल्पाबाबत पीआयएल दाखल करणारे जाेसेफ जाॅर्ज यांनी एनएचएआयच्या कामातील त्रुटी मांडल्या. एनएचएआयने नुकतेच जानेवारी २०२१ मध्ये आयएमएसचा डीपीआर तयार करण्यासाठी सल्लागार नेमणुकीबाबत ऑनलाईन कंत्राट मागविले आहे. नियुक्त झालेली सल्लागार कंपनी आयएमएसचा नियाेजन आराखडा तयार करेल. यातही घाेळ म्हणजे संस्थेने २५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत टेंडर भरण्याची मुदत दिली आहे आणि टेंडर डाक्यूमेंट्स डाऊनलाेड करण्यासाठी २६ फेब्रुवारीची मुदत दिली आहे. उल्लेखनीय म्हणजे एनएचएआयने माॅडेल स्टेशनच्या कामाचे कंत्राट एका कंपनीला दिले आहेत. मात्र प्रकल्पाचा आराखडाच तयार नसताना काेणत्या आधारावर कामाचे कंत्राट दिले, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.

जाेसेफ जाॅर्ज यांनी आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. एनएचएआयने जून २०१७ मध्ये नाेएडास्थित ऑफलिंका नामक कंपनीला आयएमएस प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्याचे कंत्राट दिले हाेते व सप्टेंबर २०१७ मध्ये त्यांनी रिपाेर्ट सादर केला हाेता. एवढ्या माेठ्या प्रकल्पाचा रिपाेर्ट चारच महिन्यात कसा तयार झाला, हाही प्रश्न आहे. त्यावेळी सल्लागार नियुक्तीसाठी सदर कंपनीचा वार्षिक कारभार ५० काेटींचा असावा, अशी अट हाेती. मात्र कंत्राट मिळालेली कंपनी जलशुद्धीकरणाचे काम करणारी असून त्यांच्या वेबसाईटवरून त्यांचा कारभार केवळ ५ काेटी असल्याचे दिसून येते. याबाबत आरटीआयमध्ये माहिती मागवली असता एनएचएआयने कुठलीही माहिती सादर केली नसल्याचे जाॅर्ज यांनी सांगितले.

प्रकल्पाची व्यवहार्यता काय?

आयएमएस प्रकल्प १०५३ काेटींचा असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या जागेवर ताे हाेत आहे, त्या जागेचे बाजारमूल्य जवळपास १० ते १२ हजार काेटी रुपये आहे. कंत्राटदार कंपनी आपले पैसे लावून प्रकल्प साकार करेल आणि पुढचे १०-१५ वर्षे वापरेल. मात्र यातून शासनाला काय लाभ हाेईल, याचा उल्लेख नाही. शिवाय काेट्यवधीचा ऑक्सिजन देणारी झाडे कापली तर पर्यावरणाचे किती नुकसान हाेईल, प्रकल्प झाल्यानंतर पर्यावरणाला काय फायदा हाेईल, याचे उत्तर द्यायला कुणी तयार नाही. डीपीआरच नसल्याने प्रकल्पाची विश्वसनीयता व व्यवहार्यता काय, असा प्रश्न पर्यावरण अभ्यासकांनी उपस्थित केला आहे.