शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

सर्व्हर डाऊन, ग्राहकांना मनस्ताप

By admin | Updated: August 15, 2014 00:41 IST

बँक आॅफ इंडियाच्या हजारो ग्राहकांना गुरुवारी बँकेतून आल्यापावली परतावे लागले. डाटा सेंटरमधून सर्व्हरमध्येच बिघाड असल्याने पैशाचे व्यवहार ठप्प होते. पैसे देणेही बंद आणि घेणेही बंद

बँक आॅफ इंडिया : डाटा सेंटरमधूनच होता बिघाडनागपूर : बँक आॅफ इंडियाच्या हजारो ग्राहकांना गुरुवारी बँकेतून आल्यापावली परतावे लागले. डाटा सेंटरमधून सर्व्हरमध्येच बिघाड असल्याने पैशाचे व्यवहार ठप्प होते. पैसे देणेही बंद आणि घेणेही बंद असल्यामुळे ग्राहकांनी बँकेच्या कारभाराविषयी रोष व्यक्त केला. लाखो ग्राहकांशी नाते जोडलेल्या बँक आॅफ इंडियाच्या सर्वच शाखांमधील सर्व्हरमध्ये आज सकाळी ८ वाजेपासूनच बिघाड झाला. या तांत्रिक दोषामुळे व्यवहारावर परिणाम झाला. प्रत्येक ग्राहक विचारपूस करून परतत होता. बँक बंद होईस्तोवर ही परिस्थिती राहिल्याने अनेकांना ताटकळत उभे राहूनही काहीच फायदा झाला नाही. बँकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले की, सकाळपासूनच डाटा सेंटरमधून बिघाड झाला. त्यामुळे या ठिकाणी सर्व्हरची लिंकिंग नव्हती. प्रत्येक शाखेमध्येच हा बिघाड झाला होता; कारण तांत्रिक दोष मुंबईच्या कार्यालयातून होता. दुपारपर्यंत सर्व्हर सुरू होण्याची शक्यता होती. परंतु तांत्रिक दोष मोठा असल्याने दुरुस्ती होऊ शकली नाही. ही परिस्थिती निर्माण झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रत्येकालाच उत्तर द्यावे लागत होते. सकाळी बँकेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दुपारी १ पर्यंत येऊन पाहा, असे उत्तर दिले. मात्र, तोपर्यंत हा बिघाड कायमच होता. या बँकेत व्यापारी, कर्मचाऱ्यांसह हजारो ग्राहकांची खाती आहेत. शहरातील सर्वच शाखांमध्ये सकाळपासून ही परिस्थिती असल्याने, अनेकांना या त्रासाला सामोरे जावे लागले. पुन्हा दुपारी ३ वाजेपर्यंत हा दोष दुरुस्त होण्याची शक्यता काही कर्मचाऱ्यांनी वर्तविली होती. मात्र, नंतरही तीच परिस्थिती कायम राहिली. परिणामी, बँकेतील रोखपालांनी आपल्या काऊंटरवर बंदचाच फलक लावला. मात्र, बँकेतील कर्मचाऱ्यांना ग्राहकांच्या प्रश्नाला उत्तर देणे अनिवार्य झाले होते. आज कामकाजाचा दिवस, उद्या स्वातंत्र्यदिनाची सुटी आणि परवा शनिवार अर्धवेळ कामकाजाचा दिवस व नंतर रविवारची सुटी यामुळे अनेक ग्राहकांना बँकेच्या या तांत्रिक बिघाडामुळे पैशाविनाच सुटीचे आणि खरेदीचे बेत आखावे लागणार आहेत.(प्रतिनिधी)