शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

दुपटीने वाढले प्राविण्य श्रेणीतील विद्यार्थी; वर्धा जिल्ह्यातील सर्वाधिक विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 12:20 IST

Nagpur News मूल्यांकनाच्या आधारावर जाहीर करण्यात आलेल्या यंदाच्या निकालांमध्ये प्रथम व प्राविण्य श्रेणीत सर्वात जास्त नियमित विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.

ठळक मुद्दे ८८ टक्के पुनर्परीक्षार्थी केवळ उत्तीर्ण

योगेश पांडे

 लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : दरवर्षी शालांत परीक्षेच्या निकालात प्रथम व द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त असते. मात्र मूल्यांकनाच्या आधारावर जाहीर करण्यात आलेल्या यंदाच्या निकालांमध्ये प्रथम व प्राविण्य श्रेणीत सर्वात जास्त नियमित विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. प्राविण्य श्रेणीतील विद्यार्थ्यांचे प्रमाण तर दुपटीने वाढले आहे. दुसरीकडे यंदा संधी असतानादेखील बहुतांश पुनर्परीक्षार्थी मात्र श्रेणींपासून दूर राहिले असून ८८ टक्के पुनर्परीक्षार्थी केवळ उत्तीर्ण झाले आहेत.

राज्यात नागपूर विभाग शेवटच्या स्थानी असला तरी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत वाढली आहे. यंदा जवळपास निम्म्या विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळविली आहे. मात्र प्राविण्य श्रेणीतील विद्यार्थ्यांची संख्या ३१.१० टक्के इतकी आहे.

विभागीय मंडळाच्या आकडेवारीनुसार यंदा नागपूर विभागात एकूण १ लाख २५ हजार ६६१ नियमित विद्यार्थ्यांना ६० टक्के किंवा अधिक गुण मिळाले आहेत. एकूण परीक्षार्थ्यांच्या तुलनेत ही टक्केवारी ८०.८० टक्के इतकी आहे. यातील ७७ हजार २८६ विद्यार्थी (४९.७० टक्के) केवळ प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. प्राविण्य श्रेणीत ४८ हजार ३७५ विद्यार्थी (३१.१० टक्के) उत्तीण झाले आहेत. मागील वर्षी हीच टक्केवारी १५.८९ टक्के इतकी होती. २८ हजार ७०५ विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी मिळाली.

सर्वाधिक कमी प्राविण्यप्राप्त विद्यार्थी चंद्रपूर जिल्ह्यात

वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक ३८.९७ टक्के विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले तर नागपूर जिल्ह्यात ३६.१० टक्के विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात कमी १९.५८ टक्के विद्यार्थ्यांना प्राविण्य श्रेणी मिळाली. गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक ५५.९५ टक्के विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी मिळाली. त्याखालोखाल भंडारा जिल्ह्याचा (५१.१६ टक्के) क्रमांक आहे.

०.७७ टक्के पुनर्परीक्षार्थी प्राविण्य श्रेणीत

पुनर्परीक्षार्थ्यांना यंदा चांगली श्रेणी मिळेल असा अंदाज होता. प्रत्यक्षात ६ हजार ६५४ पैकी केवळ ५१ (०.७७ टक्के) पुनर्परीक्षार्थ्यांना प्राविण्य श्रेणी प्राप्त झाली. तब्बल ८८ टक्के विद्यार्थी केवळ उत्तीर्ण झाले आहेत. ३.९१ टक्के विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ५.३८ टक्के विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.

 

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल