शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
4
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
5
मतचोरीविरोधात काँग्रेसची "वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ" स्वाक्षरी मोहीम 
6
TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात; कारण आलं समोर
7
क्रूझ कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा... जे नव्हते तेच आणले...! Citroen C3X लाँच झाली, १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स...
8
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
9
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
10
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
11
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
12
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
13
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
14
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
15
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
16
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
17
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
18
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
19
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
20
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...

या ‘गुरू’ला बगलेत मारून घेऊन जाऊ नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:07 IST

‘वाचाल तर वाचाल’, ‘ग्रंथ हेच गुरू’, ‘पुस्तकासारखा मित्र नाही’, असे सुविचार, सुभाषिते अमलात आणायचा प्रयत्न अनेक जण करतात. त्यासाठी ...

‘वाचाल तर वाचाल’, ‘ग्रंथ हेच गुरू’, ‘पुस्तकासारखा मित्र नाही’, असे सुविचार, सुभाषिते अमलात आणायचा प्रयत्न अनेक जण करतात. त्यासाठी पुस्तकांशी दोस्ती करतात. अनेकांना पुस्तके विकत घेऊन वाचायची सवय नसते. त्यावर ग्रंथालय नावाचा उपाय हाताशी असतोच. त्याशिवाय, ज्यांना महिन्यात विशिष्ट रक्कम पुस्तकांच्या खरेदीवर खर्च करायची दुर्मीळ सवय असते, त्यांच्याशी वाचनप्रेमापोटी अनेक जण दोस्ती वाढवितात. बरेच जण वाचायला नेलेले पुस्तक परत देण्याचे नाव काढत नाहीत. ग्रंथालयांनाही अशा परत न मिळालेल्या पुस्तकांचा प्रश्न भेडसावतो. ग्रंथपालनाचे प्रशिक्षण घेतलेल्यांनाही पुस्तक परत न करणाऱ्या वाचनप्रेमींवर तोडगा सापडत नाहीत. बहुतेक वेळा तशी पुस्तके बुडीतखाती नोंद करावी लागतात. पुस्तकचोरी हा असा अनेक अंगांनी आपल्या वाचनविश्वाचा विषय आहे; पण पुण्याच्या नगरवाचन मंदिराने यावर नामी उपाय शोधला. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुखांनी स्थापन केलेले अन् शतकोत्तर अमृत महोत्सवाकडे वाटचाल करणारे हे वाचनालय ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन’ तंत्र वापरून आता नोंद न करता गुपचूप पुस्तक वाचनालयाबाहेर नेण्याचा प्रयत्न केला तर तो पकडण्याची व्यवस्था करीत आहे. हे तंत्रज्ञान तसे नवे नाही. अनेकांनी शाळा-महाविद्यालयात भौतिकशास्त्राच्या प्रयोगात ते वापरलेले असते. मागे नोटाबंदी झाल्यानंतर बाजारात आलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटेला नॅनो चिप असल्याची टूम सोडून देण्यात आली होती. जमिनीखाली गाडून ठेवल्या तरी त्या नोटांच्या पुडक्याचा पत्ता सरकारला लागणारच, असा दावा करणारी न्यूज चॅनलची निवेदिका अजूनही त्यासाठी ट्रोल होत राहते. तेव्हा, नॅनो नसेल; पण या आरएफआयडीच्या निमित्ताने पुस्तकात इलेक्ट्रॉनिक चीप आली, हे महत्त्वाचे. तंत्रज्ञानाने वाचन कमी झाले, असे म्हणणाऱ्यांसाठी महत्त्वाचे हे, की तंत्रज्ञानाचा पुस्तकांना फायदाही होतो.

क्षेत्र कोणतेही असो, तंत्रज्ञानाचा वापर आपण थांबवू शकत नाही. ते वापरायचे कसे, हे ठरविण्याचा अधिकार आपल्याला आहे. पुण्यासारखा इलेक्ट्रॉनिक चीपचा वापर आता इतरत्र नक्की होईल. वर्तमानपत्रात क्यूआर कोड, तसे पुस्तकाला, प्रश्नपत्रिकांनाही बारकोड आले. ग्रंथव्यवहारांमध्ये आयएसबीएनप्रणाली सगळीकडे वापरली जाते. वाचन चळवळ बळकट करण्यासाठी अनेक संस्था तंत्रज्ञानाच्या मदतीने पुढाकार घेताहेत. गेल्या वर्ष-दोन वर्षांत नवी मुंबईत ‘लेटस् रीड इंडिया’ नावाची चळवळ एका उद्योजकांच्या पुढाकाराने खेड्यापाड्यात पुस्तके पोहोचविते. पुस्तकांच्या परिचयासाठी सोशल मीडिया वापरला जातो. पुस्तके भेट दिली जातात. त्यातून अधिकाधिक लोकांना वाचनासाठी प्रोत्साहित केले जाते. केरळमधल्या एलिक्कुलमची पांबोली नवभारत लायब्ररी हव्या त्या वेळी पुस्तक उपलब्ध करून देते, तर तिरुवअनंतपुरममध्ये ‘अक्षरानीधी’ नावाची खुल्या ग्रंथालयाची चळवळ अगदी सकाळी गरम चहाचे घोट घेत असतानाही आपल्या दारात पुस्तके घेऊन उभी असते. तरीही पुस्तकचोरी होतेच. आपला ग्रंथरूपी गुरू, दोस्त, मार्गदर्शक हळूच बगलेत मारून घेऊन जाणारे सर्वत्र असतातच असतात. ही चोरी अशी की अनेकांची इच्छा असेल की तिला प्रोत्साहन द्यायला हवे; पण ज्याचे पुस्तक चोरी जाते त्यालाच त्या चोरीच्या वेदना ठाऊक. असे एकटेदुकटे पुस्तकच चोरी जाते असे नाही. काही दरोडेही असतात. पाच वर्षांपूर्वी पिंपरी चिंचवड येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अखेरच्या दिवशी आयोजकांनी ग्रंथविक्री दालनाची सुरक्षा काढून घेतली अन् साहित्य अकादमीच्या पुस्तकांची नऊ पार्सले चोरीला गेली. तिकडे इंग्लंडमध्ये तर अक्षरश: दरोडा पडला होता. जानेवारी २०१७ मध्ये पश्चिम लंडनच्या फेलथॅम भागात एका गोदामातून २४० दुर्मीळ पुस्तके चोरीला गेली. त्यांची किंमत होती तब्बल २२ कोटी. गॅलिलिओ, न्यूटन हे शास्त्रज्ञ किंवा स्पॅनिश चित्रकार फ्रान्सिस्को दे गोया यासारख्या दिग्गजांची पुस्तके अमेरिकेत बौद्धिक वारसा म्हणून लिलावासाठी नेली जाणार होती. त्यावर दरोडा पडला व साडेतीन वर्षांनंतर तो साठा रोमानियात जमिनीखाली पुरलेला सापडला. अशी दुर्मीळ पुस्तके मुंबई, पुण्यातल्या फुटपाथवर पूर्वी मिळायची. अनेकांसाठी तो उघडा खजिना होता. त्यातूनच अनेकांच्या घरात पुस्तकांचा खजिना उभा राहिला. तो सांभाळायचा कसा, ही काळजी तुम्हाआम्हाला असते, ती पुस्तक चोरी करणाऱ्यांच्या वाचनप्रेमामुळे!

--------------------------------------------------