शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' माशांना वाचवण्यासाठी बांगलादेशनं उतरवलं सैन्य दल; बंगालच्या खाडीत पाठवल्या १७ युद्धनौका
2
‘कोस्टल’वर थेट १४० चा हायस्पीड: ...तर मग गुन्हाच होईल दाखल; वाहतूक पोलिसांकडून दिवसाला ५०० ई-चालानची कारवाई
3
FD करुन तुम्ही कधीही श्रीमंत होणार नाही? CA ने दिला इशारा, म्हणाले खऱ्या कमाईसाठी गुंतवणूक धोरण बदला
4
Video - अरे बापरे! ऑर्डर केला iPhone 16; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत अजब भानगड
5
Tata Capital IPO: प्रतीक्षा संपली! तुमच्या खिशात आहेत का १४,९९६ रुपये? तर बनू शकता टाटांच्या कंपनीचे प्रॉफिट पार्टनर
6
इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर...
7
"प्यार मे सौदेबाजी...", अरबाज खान दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर मलायका अरोराची क्रिप्टिक पोस्ट
8
सोनम वांगचुक यांच्या अटकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, पत्नीने दाखल केली याचिका
9
Kantara Chapter 1: साऊथने पुन्हा एकदा करून दाखवलं! फक्त ४ दिवसांत 'कांतारा'ने कमावले ३०० कोटी
10
पतीच्या मृत्यूनंतर पुन्हा जोडीदाराची इच्छा पडली महागात; मॅट्रिमोनियल साइटवरून शिक्षिकेला कोट्यवधींचा गंडा!
11
Post Office Scheme: दर महिन्याला होईल ₹६१,००० ची कमाई; जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, कोट्यधीशही बनवेल
12
Jaipur Hospital Fire: जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
13
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २४,९१० च्या वर; सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी
14
Jaipur Hospital Fire: '२० मिनिटांपूर्वी आगीची माहिती दिली, पण डॉक्टर पळून गेले'; SMS रुग्णालयातील प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक दावा
15
Video:...तर भारताच्या 'या' खेळाडूला मारायचंय; पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमदचं विधान चर्चेत
16
पती अन् दोन मुलांना सोडून शेजाऱ्यासोबत सुरू होतं अफेअर; 'ओयो'मध्ये प्रियकर गर्लफ्रेंडसोबत दिसला अन्...
17
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
18
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
19
उत्खनन क्षेत्रात छत्तीसगडची ऐतिहासिक झेप; खनिज महसूल २५ वर्षांत ३४ पटीने वाढला!
20
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा

लॉकडाऊन कठोर नकोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:07 IST

नागपूर : राज्य शासनाने ३१ मेपर्यंत पुन्हा लॉकडाऊन लावले आहे. लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वच बाजारपेठा बंद आहेत. सव्वा ...

नागपूर : राज्य शासनाने ३१ मेपर्यंत पुन्हा लॉकडाऊन लावले आहे. लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वच बाजारपेठा बंद आहेत. सव्वा महिन्यापासून दुकाने बंद असल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. कठोर नियमांतर्गत वेळेचे बंधन ठेवून दुकाने सुरू करण्याची व्यापाऱ्यांची मागणी आहे. कोरोनाशी लढताना व्यवसाय वाचविणेही आवश्यक आहे. या संदर्भात नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविले आहे. सर्वच वर्गवारीतील दुकाने नियमित सुरू करा, अशी मागणी विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

व्यवसाय बंद असल्यानंतरही व्यापारी कर्मचाऱ्यांना नियमित वेतन देत आहेत. वीजबिल, बँकेचे व्याज, मासिक हप्त्याचा नियमित भरणा करीत आहेत. गेल्या वर्षीही ५ महिने व्यवसाय बंद होता. सध्या व्यापाऱ्यांना अनेक समस्या आणि अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोनापासून बचाव करण्यासोबतच व्यवसाय वाचविणे गरजेचे आहे. व्यापारी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर संकट आले आहे.

चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अ‍ॅण्ड ट्रेडचे (कॅमिट) अध्यक्ष दीपेन अग्रवाल म्हणाले, सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. नागपूरचा संपूर्ण व्यवसाय ६ एप्रिलपासून बंद आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांची आर्थिक स्थिती गंभीर झाली आहे. दिवसरात्र व्यस्त राहणारे व्यापारी सव्वा महिन्यापासून कामाविना बसले आहेत. त्यामुळे दुकाने सुरू करणे आवश्यक आहे.

नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया म्हणाले, सर्वच दुकाने सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे. मुख्यमंत्री यावर सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा आहे. दुकाने सुरू केल्यास व्यवसायाला चालना मिळणार आहे. बंद दुकाने सुरू करून ग्राहक येण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागेल. त्यानंतरच आर्थिक नुकसान भरून निघेल.

नागपूर चिल्लर किराणा संघाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख म्हणाले, किराणा दुकानदारांची वेळ सकाळी ११ पर्यंत असल्याने व्यापाऱ्याला व्यवसायाला वेळ मिळत नाही. शिवाय ठोक बाजारातून व्यापाऱ्यांची खरेदी होत नाही. त्यामुळे अनेक वस्तूंचा तुटवडा होत आहे. चिल्लर किराणा दुकाने सकाळी आणि सायंकाळी दोन वेळात सुरू ठेवल्यास व्यापारी व ग्राहकांच्या सोयीचे होईल.

नागपूर इतवारी ठोक किराणा असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष शिवप्रताप सिंह म्हणाले, इतवारी आणि मस्कासाथ येथील ठोक किराणा दुकाने सकाळी ११ पर्यंत सुरू असल्याने ग्राहकांची गर्दी होते. याशिवाय फोनवर ऑर्डर घेऊन पुरवठा करणे शक्य नसते. त्यामुळे इतवारीतील दुकाने सकाळी ७ ते ११ ऐवजी सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत सुरू ठेवावीत. हे सर्वांच्या फायद्याचे राहील.