शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

सिंचनाच्या विजेसाठी सरकारवर अवलंबून राहू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2022 20:39 IST

Nagpur News विजेसाठी शेतकऱ्यांनी वीज मंडळ किंवा सरकारवर अवलंबून राहूच नये. त्याऐवजी सौर कृषी पंपांच्या माध्यमातून विजेची समस्या सोडवावी, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले.

ठळक मुद्दे शेतकऱ्यांनी सौर कृषी पंपांचा वापर वाढविण्याचे आवाहन

नागपूर : शेतकऱ्यांना सिंचनासाठी विजेची आवश्यकता भासते, परंतु अनेकदा वीज उपलब्ध होत नाही. विजेसाठी शेतकऱ्यांनी वीज मंडळ किंवा सरकारवर अवलंबून राहूच नये. त्याऐवजी सौर कृषी पंपांच्या माध्यमातून विजेची समस्या सोडवावी, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. विदर्भ शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या कार्यशाळेचे उद्घाटन करताना ते बोलत होते.

शेतकऱ्याना पाणी २४ तास उपलब्ध होण्यासाठी जलसंधारणाची कामे गावांमध्ये केली पाहिजेत. नाल्यांचे खोलीकरण व तलावांमधील गाळ काढून पाणी साठवण्याची क्षमता वाढविली तर पाणी उपलब्ध होईल. यासाठी गावातले पाणी गावात, शेतातले पाणी शेतात, घरातले पाणी घरातच मुरले पाहिजे. प्रत्येकाने वरीलप्रमाणे प्रयत्न केला तर विहिरींना २४ तास पाणी उपलब्ध होईल. सामूहिक माध्यमातून किंवा शासनाच्या मदतीने असे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे गडकरी म्हणाले.

ठिबक सिंचन व ग्रीन हाऊस या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपले उत्पादन दर्जेदार करावे. शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, मात्र त्यात शॉर्टकट मारू नये. उत्पादनाच्या दर्जाशी कोणतीही तडजोड करू नये. आगामी काळात सेंद्रिय शेती किंवा रासायनिक शेती दोन्हीचा वापर करून उत्पादन वाढवा आणि पिकाचा दर्जा चांगला ठेवा. शेतकऱ्याला आपल्या वस्तू निर्यात करायच्या असतील तर मालाचा दर्जा चांगले, आकर्षक पॅकेजिंग, वेळेवर डिलिव्हरी या गोष्टी कराव्या लागतील, असे गडकरी म्हणाले. यावेळी डॉ. सी. डी. मायी, मोरेश्वर वानखेडे, ठाकरे व इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीagricultureशेती