शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
2
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
3
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
4
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
5
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले
6
ब्रेकअपचं खोटं अन् हत्येनंतरचा बनाव...कानपूर सुटकेस 'कांड' प्रकरणात ट्विस्ट, २ आरोपींना अटक
7
Accident: पाण्याचा टँकर आणि दुचाकीत भीषण धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
8
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
9
VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...
10
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
11
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात मराठी मालिकाविश्वातील 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, स्वतः दिली माहिती
12
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
13
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
14
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार
15
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
16
Viral News: एका उंदरामुळं इंडिगोच्या विमानाला साडेतीन तास उशीर, नेमकं काय घडलं?
17
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
18
अमूलनं बटर, तूप, चीज, आईस्क्रीम आणि चॉकलेटच्या किमती केल्या कमी; प्रत्येक वस्तूवर किती बचत होणार? जाणून घ्या
19
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
20
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री

सिंचनाच्या विजेसाठी सरकारवर अवलंबून राहू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2022 20:39 IST

Nagpur News विजेसाठी शेतकऱ्यांनी वीज मंडळ किंवा सरकारवर अवलंबून राहूच नये. त्याऐवजी सौर कृषी पंपांच्या माध्यमातून विजेची समस्या सोडवावी, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले.

ठळक मुद्दे शेतकऱ्यांनी सौर कृषी पंपांचा वापर वाढविण्याचे आवाहन

नागपूर : शेतकऱ्यांना सिंचनासाठी विजेची आवश्यकता भासते, परंतु अनेकदा वीज उपलब्ध होत नाही. विजेसाठी शेतकऱ्यांनी वीज मंडळ किंवा सरकारवर अवलंबून राहूच नये. त्याऐवजी सौर कृषी पंपांच्या माध्यमातून विजेची समस्या सोडवावी, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. विदर्भ शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या कार्यशाळेचे उद्घाटन करताना ते बोलत होते.

शेतकऱ्याना पाणी २४ तास उपलब्ध होण्यासाठी जलसंधारणाची कामे गावांमध्ये केली पाहिजेत. नाल्यांचे खोलीकरण व तलावांमधील गाळ काढून पाणी साठवण्याची क्षमता वाढविली तर पाणी उपलब्ध होईल. यासाठी गावातले पाणी गावात, शेतातले पाणी शेतात, घरातले पाणी घरातच मुरले पाहिजे. प्रत्येकाने वरीलप्रमाणे प्रयत्न केला तर विहिरींना २४ तास पाणी उपलब्ध होईल. सामूहिक माध्यमातून किंवा शासनाच्या मदतीने असे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे गडकरी म्हणाले.

ठिबक सिंचन व ग्रीन हाऊस या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपले उत्पादन दर्जेदार करावे. शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, मात्र त्यात शॉर्टकट मारू नये. उत्पादनाच्या दर्जाशी कोणतीही तडजोड करू नये. आगामी काळात सेंद्रिय शेती किंवा रासायनिक शेती दोन्हीचा वापर करून उत्पादन वाढवा आणि पिकाचा दर्जा चांगला ठेवा. शेतकऱ्याला आपल्या वस्तू निर्यात करायच्या असतील तर मालाचा दर्जा चांगले, आकर्षक पॅकेजिंग, वेळेवर डिलिव्हरी या गोष्टी कराव्या लागतील, असे गडकरी म्हणाले. यावेळी डॉ. सी. डी. मायी, मोरेश्वर वानखेडे, ठाकरे व इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीagricultureशेती