शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
4
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
5
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
6
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
7
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
8
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
9
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
10
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
11
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
12
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
13
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
14
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
15
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
16
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
17
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
18
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
19
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
20
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)

फुलबाग बहरण्याच्या प्रतीक्षेत डोम फाटला ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भारतातील सर्वात जुन्या पाच कृषी महाविद्यालयात नागपूर कृषी महाविद्यालयाचा समावेश आहे. गौरवशाली इतिहास असलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : भारतातील सर्वात जुन्या पाच कृषी महाविद्यालयात नागपूर कृषी महाविद्यालयाचा समावेश आहे. गौरवशाली इतिहास असलेल्या या महाविद्यालयाची स्थापना १९०६ साली ब्रिटिश काळात झाली. या महाविद्यालयाकडून शेतकऱ्यांना मोठी आशा आहे. मागील काही वर्षांतील वातावणातील बदल, बेभरवशाचा मान्सून यामुळे शेतीचे गणित बिघडले आहे. निसर्गाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. कोरवडवाहू शेती बेभरवशाची झाली आहे. सिंचनाची सुविधा असली तरी उत्पन्नाची शाश्वती नाही. अशापरिस्थितीत संरक्षित शेती प्रकल्प, शेडनेट शेती वरदान ठरू शकते. मात्र शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण करण्याची अपेक्षा असलेल्या कृषी महाविद्यालयाने उभारलेला डोम वर्षानुवर्षे फुलबाग फुलेल या प्रतीक्षेत फाटला, पण बाग फुलली नाही. या प्रकल्पावर केलेला लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे.

शेडनेट शेती प्रकल्पासाठी कृषी महाविद्यालयाने आठ वर्षांपूर्वी आठ डोम उभारले होते. यावर ७२ लाखांचा खर्च करण्यात आला. यात जातीवंत फुलबाग, विविध प्रकारची फळझाडे, नर्सरी निर्माण होतील. शेतकऱ्यांना यातून प्रेरणा मिळेल, अशी आशा होती. परंतु असे काहीही घडले नाही. मागील आठ वर्षांपासून डोम वापराविना पडून होते. यात कुठल्याही प्रकारची नर्सरी वा फळझाडे निर्माण करण्यात आली नाही.

....

विद्यार्थ्यांना शिक्षण कसे मिळणार?

शेतकरी कुटुंबातील सदस्य वाढल्याने आज शेतीवर भार वाढला आहे. अशापरिस्थितीत कमी जागेत अधिक उत्पादन मिळण्यासाठी शेडनेट शेती प्रकल्प, पॉलिहाऊसच्या माध्यमातून शेती करणे गरजेचे झाले आहे. कृषी महाविद्यालयाची ही जबाबदारी आहे. याच हेतूने महाराज बागेजवळील कृषी महाविद्यालयाच्या जागेत शेडनेट उभारण्यात आले होते. परंतु आधुनिक पद्धतीने शेती करण्याच्या प्रयोगाकडे दुर्लक्ष केले. अशापरिस्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षण कसे मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

...

जरबेरा, गुलाब फुललाच नाही

आठ शेडनेटमध्ये जरबेरा, गुलाब अशा बाजारात मागणी असलेल्या फुलांच्या नवीन जाती, सोबतच ढोबळ मिरची, भाजीपाला, सुधारित फळझाडांची लागवड केली जाणार होती. मात्र महाविद्यालयाने याबाबत उत्सुकता दर्शविली नाही. यामुळे कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासनाने यासंदर्भात दखल घेण्याची गरज आहे.