शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा
2
Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज
3
एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ!
4
Corona Virus : कोरोनामुळे भीषण परिस्थिती?; जपानी बाबा वेंगा यांची 'भयावह' भविष्यवाणी, सांगितली 'ती' वेळ
5
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
6
IPL 2025: कोण संपवणार विजेतेपदाचा १८ वर्षांचा दुष्काळ? आज अंतिम लढतीचा रंगणार थरार
7
कमालीची आहे ही स्कीम, महिन्याला ₹४५०० गुंतवा; ६० व्या वर्षी मिळतील ₹१.५६ कोटी, ₹५१,८४८ चं मंथली पेन्शन
8
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी; राहुल गांधीचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली
9
कधीही निराश झालो नाही, ब्रेक घेत कसून अभ्यास केला... ‘जेईई’च्या दोन टॉपरचे ‘गुपित’
10
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
11
एकीकडे लष्करी छावणीवर कोसळला डोंगर, दुसरीकडे चिखलातून वाट तुडवत जवानांचे मदतकार्य
12
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
13
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
14
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
15
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
16
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
17
१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस
18
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
19
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश
20
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले

रोख मदत देण्यापेक्षा जलसंधारणाची कामे करा

By admin | Updated: May 25, 2016 02:50 IST

राज्यातील दुष्काळग्रस्त भागाला शासनाने रोख मदत करण्यापेक्षा जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे घेऊन शेतकऱ्यांसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे

कळंभातील शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या पालकमंत्र्यांकडे भावनानागपूर : राज्यातील दुष्काळग्रस्त भागाला शासनाने रोख मदत करण्यापेक्षा जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे घेऊन शेतकऱ्यांसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे व शेतकऱ्यांची जमीन सुजलाम सुफलाम करावी, अशी मागणीवजा स्पष्ट भावना काटोल तालुक्यातील कळंभा या गावातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली. याप्रसंगी आमदार डॉ. आशिष देशमुखही सोबत होते. काटोल तालुक्यातील कळंभा येथे लांडगी नदीवर जलयुक्त शिवार योजनेतून विस्तीर्ण असा बंधारा तयार करण्यात आला आहे. पावसाळयात या बंधाऱ्यातील पाणी अनेक गावांचे जलस्रोत जिवंत ठेवणार आहे. या कामामुळे गावातील शेतकरी समाधानी असून भीषण पाणीटंचाईचा सामना करीत असलेल्या या शेतकऱ्यांना बंधाऱ्यातून आशेचा किरण दिसला आहे. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पैसा नको पण जलसंधारणाची अशी कामे करा की पुन्हा गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही, अशी प्रतिक्रया या बंधाऱ्याची पाहणी करताना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. याशिवाय जलयुक्त शिवारअंतर्गत अनेक बंधाऱ्यांची कामे सुरू असून छोट्या बंधाऱ्यांची कामेही जवळजवळ पूर्ण झाली आहे. पाणीटंचाईचा ‘डार्क झोन’ मध्ये गणना होणाऱ्या काटोल-नरखेड या भागाला जलसंधारणांच्या कामांचा चांगला फायदा होणार असल्याचा विश्वास पालकमंत्री बावनकुळे यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)भीषण पाणीटंचाईकळंभा भागात सध्या भीषण पाणीटंचाईची स्थिती आहे. लांडगी नदी पावसाळयात चांगला पाऊस झाला तरच वाहते. जानेवारीपर्यंत या परिसरातील विहिरींना पाणी असते. त्यानंतर या विहिरींमध्ये अजिबात पाणी पाहायला मिळत नाही. अक्षरश: या विहिरी कोरड्या झाल्या आहेत. बंधाऱ्यामुळे व पाऊस चांगला पडल्यावर या विहिरींना बारा महिने पाणी उपलब्ध राहणार आहे. सूर्य ४६ अंशाची आग ओकत असताना या भागातील जलस्रोतांना आता बंधाऱ्याशिवाय जलसंधारणाच्या कामांमुळे दिलासा मिळणार आहे.