शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

रोख मदत देण्यापेक्षा जलसंधारणाची कामे करा

By admin | Updated: May 25, 2016 02:50 IST

राज्यातील दुष्काळग्रस्त भागाला शासनाने रोख मदत करण्यापेक्षा जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे घेऊन शेतकऱ्यांसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे

कळंभातील शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या पालकमंत्र्यांकडे भावनानागपूर : राज्यातील दुष्काळग्रस्त भागाला शासनाने रोख मदत करण्यापेक्षा जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे घेऊन शेतकऱ्यांसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे व शेतकऱ्यांची जमीन सुजलाम सुफलाम करावी, अशी मागणीवजा स्पष्ट भावना काटोल तालुक्यातील कळंभा या गावातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली. याप्रसंगी आमदार डॉ. आशिष देशमुखही सोबत होते. काटोल तालुक्यातील कळंभा येथे लांडगी नदीवर जलयुक्त शिवार योजनेतून विस्तीर्ण असा बंधारा तयार करण्यात आला आहे. पावसाळयात या बंधाऱ्यातील पाणी अनेक गावांचे जलस्रोत जिवंत ठेवणार आहे. या कामामुळे गावातील शेतकरी समाधानी असून भीषण पाणीटंचाईचा सामना करीत असलेल्या या शेतकऱ्यांना बंधाऱ्यातून आशेचा किरण दिसला आहे. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पैसा नको पण जलसंधारणाची अशी कामे करा की पुन्हा गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही, अशी प्रतिक्रया या बंधाऱ्याची पाहणी करताना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. याशिवाय जलयुक्त शिवारअंतर्गत अनेक बंधाऱ्यांची कामे सुरू असून छोट्या बंधाऱ्यांची कामेही जवळजवळ पूर्ण झाली आहे. पाणीटंचाईचा ‘डार्क झोन’ मध्ये गणना होणाऱ्या काटोल-नरखेड या भागाला जलसंधारणांच्या कामांचा चांगला फायदा होणार असल्याचा विश्वास पालकमंत्री बावनकुळे यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)भीषण पाणीटंचाईकळंभा भागात सध्या भीषण पाणीटंचाईची स्थिती आहे. लांडगी नदी पावसाळयात चांगला पाऊस झाला तरच वाहते. जानेवारीपर्यंत या परिसरातील विहिरींना पाणी असते. त्यानंतर या विहिरींमध्ये अजिबात पाणी पाहायला मिळत नाही. अक्षरश: या विहिरी कोरड्या झाल्या आहेत. बंधाऱ्यामुळे व पाऊस चांगला पडल्यावर या विहिरींना बारा महिने पाणी उपलब्ध राहणार आहे. सूर्य ४६ अंशाची आग ओकत असताना या भागातील जलस्रोतांना आता बंधाऱ्याशिवाय जलसंधारणाच्या कामांमुळे दिलासा मिळणार आहे.