शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

रोख मदत देण्यापेक्षा जलसंधारणाची कामे करा

By admin | Updated: May 25, 2016 02:50 IST

राज्यातील दुष्काळग्रस्त भागाला शासनाने रोख मदत करण्यापेक्षा जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे घेऊन शेतकऱ्यांसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे

कळंभातील शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या पालकमंत्र्यांकडे भावनानागपूर : राज्यातील दुष्काळग्रस्त भागाला शासनाने रोख मदत करण्यापेक्षा जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे घेऊन शेतकऱ्यांसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे व शेतकऱ्यांची जमीन सुजलाम सुफलाम करावी, अशी मागणीवजा स्पष्ट भावना काटोल तालुक्यातील कळंभा या गावातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली. याप्रसंगी आमदार डॉ. आशिष देशमुखही सोबत होते. काटोल तालुक्यातील कळंभा येथे लांडगी नदीवर जलयुक्त शिवार योजनेतून विस्तीर्ण असा बंधारा तयार करण्यात आला आहे. पावसाळयात या बंधाऱ्यातील पाणी अनेक गावांचे जलस्रोत जिवंत ठेवणार आहे. या कामामुळे गावातील शेतकरी समाधानी असून भीषण पाणीटंचाईचा सामना करीत असलेल्या या शेतकऱ्यांना बंधाऱ्यातून आशेचा किरण दिसला आहे. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पैसा नको पण जलसंधारणाची अशी कामे करा की पुन्हा गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही, अशी प्रतिक्रया या बंधाऱ्याची पाहणी करताना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. याशिवाय जलयुक्त शिवारअंतर्गत अनेक बंधाऱ्यांची कामे सुरू असून छोट्या बंधाऱ्यांची कामेही जवळजवळ पूर्ण झाली आहे. पाणीटंचाईचा ‘डार्क झोन’ मध्ये गणना होणाऱ्या काटोल-नरखेड या भागाला जलसंधारणांच्या कामांचा चांगला फायदा होणार असल्याचा विश्वास पालकमंत्री बावनकुळे यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)भीषण पाणीटंचाईकळंभा भागात सध्या भीषण पाणीटंचाईची स्थिती आहे. लांडगी नदी पावसाळयात चांगला पाऊस झाला तरच वाहते. जानेवारीपर्यंत या परिसरातील विहिरींना पाणी असते. त्यानंतर या विहिरींमध्ये अजिबात पाणी पाहायला मिळत नाही. अक्षरश: या विहिरी कोरड्या झाल्या आहेत. बंधाऱ्यामुळे व पाऊस चांगला पडल्यावर या विहिरींना बारा महिने पाणी उपलब्ध राहणार आहे. सूर्य ४६ अंशाची आग ओकत असताना या भागातील जलस्रोतांना आता बंधाऱ्याशिवाय जलसंधारणाच्या कामांमुळे दिलासा मिळणार आहे.