शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

भारतीय संविधान हक्क व अधिकारांचे दस्तऐवज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:14 IST

भारतीय संविधान हे आपल्या हक्क व अधिकारांचे दस्तऐवज आहे. हे समजून घ्या. संविधानाला पवित्र ग्रंथ बनवू नका. त्याचे दैवीकरण करू नका, कारण त्याला दैवत्व बहाल केले तर सर्वच काही संपून जाईल.

ठळक मुद्देवैशाली डोळस : संविधान व महापुरुषांचे दैवीकरण करू नका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय संविधान हे आपल्या हक्क व अधिकारांचे दस्तऐवज आहे. हे समजून घ्या. संविधानाला पवित्र ग्रंथ बनवू नका. त्याचे दैवीकरण करू नका, कारण त्याला दैवत्व बहाल केले तर सर्वच काही संपून जाईल. तसेच तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा दैवत्व बहाल करण्याच्या नादी लागू नका. ते महापुरुष आहेत. त्यांना महापुरुषच राहू द्या, असे रोखठोक मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा वैशाली डोळस यांनी येथे केले.१९४२ च्या महिला क्रांती परिषदेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लॉर्ड बुद्धा मैत्री संघ व संथागार फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दीक्षाभूमीवर तीन दिवसीय अ.भा. महिला क्रांती परिषद आयोजित करण्यात आली आहे. सोमवारी या परिषदेच्या दुसºया दिवशी मागासवर्गीय व अल्पसंख्याक महिला आणि भारतीय संविधान या विषयावर पहिले चर्चासत्र पार पडले. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.वैशाली डोळस म्हणाल्या, प्रगतशील समजल्या जाणाºया इंग्लंडमधील महिलांना मतदानाचा अधिकार मिळविण्यासाठी आंदोलन करावे लागले. परंतु भारतातील महिलांना हा अधिकार संविधानाने न मागता बहाल केलेला आहे, ही महत्त्वाची बाब समजून घेतली पाहिजे. भारतीय संविधानाने आपल्याला सर्व काही दिले आहे. महिलांनी संविधानाचा अभ्यास करावा. आपले अधिकारी व हक्क काय हे जाणून घ्यावे तेव्हाच खºया अर्थाने आपल्याला स्वातंत्र्याचा अर्थ समजेल. संविधानाने अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिले आहे. हे स्वातंत्र्य कुणी हिरावून घेत असेल तर त्याच्याविरुद्ध आवाज उचला, असे आवाहनही त्यांनी यावेळी केलेयवतमाळच्या सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सुनंदा वालदे यांनी महिलांचे अधिकार आपल्या घरातही नाकारले जात असल्याचा मुद्द उपस्थित करीत याविरुद्ध घारापासूनच आवाज उचलण्याचे आवाहन केले. दिल्लीतील सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. निर्मला सोनी यांनी महिलांनी मानसिक व धार्मिक गुलामीतून स्वतंत्र होण्याचे आवाहन केले.कर्नाटकच्या ज्योती सत्यशीला यांनी देशात विविध भागात दलितांवर अन्याय हेतो, अशावेळी देशभरातील दलितांनी एकत्र येऊन आवाज उचलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.माजी अतिरिक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखेडे यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले.ममता बोदेले यांनी संचालन केले डॉ. वृषाली रणधीर यांनी आभार मानले.