शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

लघुपटातून उलगडणार हमीद दलवाई यांच्या आयुष्याचा पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 12:08 IST

महाराष्ट्रासह देशातील पुरोगामी चळवळीत आपले नाव कोरणारे आणि विज्ञाननिष्ठ समाजनिर्मितीसाठी झटणारे हमीद दलवाई यांच्या आयुष्याचा पट उलगडणारा एक लघुपट दिग्दर्शिका ज्योती सुभाष यांनी तयार केला आहे.

ठळक मुद्देदिग्दर्शिका ज्योती सुभाष साधणार नागपूरकरांशी संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वादळी आणि संघर्षमय आयुष्य जगलेल्या हमीद दलवाई यांच्या आयुष्याचा पट उलगडणारा एक लघुपट दिग्दर्शिका ज्योती सुभाष यांनी तयार केला आहे. महाराष्ट्रासह देशातील पुरोगामी चळवळीत आपले नाव कोरणारे आणि विज्ञाननिष्ठ समाजनिर्मितीसाठी झटणारे हमीद दलवाई यांच्या आयुष्याची एक वेगळी बाजू या निमित्ताने प्रकाशझोतात येणार आहे.रविवारी १५ सप्टेंबरला सायंकाळी ६ वाजता धरमपेठ येथील वनामती परिसरातील सभागृहात या लघुपटाचे विशेष प्रदर्शन होणार आहे. ‘हमीद दलवाई-द अनसंग ह्युमनिस्ट’ असे या लघुपटाचे नाव असून ज्येष्ठ रंगकर्मी ज्योती सुभाष यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे. ‘टॉकटेल’ या संस्थेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये ज्योती सुभाष प्रेक्षकांशी संवादही साधणार आहेत. लघुपटात नसिरूद्दीन शाह, ज्योती सुभाष आणि हमीद दाभोळकर यांच्या प्रमुख भूमिका आहे.टॉकटेलचे अजेय गंपावार यांनी या आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे. कलेच्या माध्यमातून जुळलेल्या स्नेहाच्या धाग्यातूनच नागपुरात हे आयोजन होऊ घातले आहे. या संदर्भात ‘लोकमत’शी बोलताना अजेय गंपावार म्हणाले, महाराष्ट्राच्या व भारताच्या संदर्भात सत्तरचे दशक संतप्त तरुणाईचे होते. त्या काळात समतेच्या बाजूने व शोषणाच्या विरोधात अनेक महत्त्वाच्या चळवळी झाल्या. मुस्लिम समाजाच्या सुधारणांसाठी हमीद दलवाई एखाद्या झंझावातासारखे झगडले. तीन तलाक या संदर्भात केवळ सात मुस्लिम महिलांसह मुंबईला मंत्रालयावर नेलेला त्यांचा मोर्चा त्या काळात खूप गाजला होता. मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना ही त्यांच्या वादळी आयुष्यातील आणि पुरोगामी महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाची घटना ! धर्मश्रध्दांऐवजी विज्ञाननिष्ठ समाज देशासाठी प्रगतिकारक ठरतो हा विचार रुजवण्यासाठी ते अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आयुष्यभर झगडले. आज ५० वर्षांनंतर त्यांचे विचार समाजाला मान्य करावे लागत आहेत हेच त्यांचे असामान्यत्व म्हणावे. ते उत्तम लेखकही होते. चळवळींशी निगडित वैचारिक लिखाणासोबतच लाट, जमिला जावद हे कथासंग्रह व पुरस्कार प्राप्त इंधन ही त्यांची कादंबरी अस्सल साहित्याचा दाखलाच आहे. ज्येष्ठ रंगकर्मी ज्योती सुभाष यांनी सामाजिक जाणिवेतून या लघुपटाची निर्मिती व दिग्दर्शन केले आहे. नागपूरकरांसाठी ही वैचारिक मेजवानीच असणार आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिक