शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

‘काळे’ पाणी प्यायचे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 01:33 IST

औद्योगिकीकरणामुळे बुटीबोरीची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. संपूर्ण गावाला ग्रामपंचायत प्रशासनामार्फत पाणीपुरवठा केला जातो.

ठळक मुद्देबुटीबोरीच्या दोन वॉर्डातील नागरिकांचा सवाल : नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा, नागरिक संतप्त

लोकमत न्यूज नेटवर्कबुटीबोरी : औद्योगिकीकरणामुळे बुटीबोरीची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. संपूर्ण गावाला ग्रामपंचायत प्रशासनामार्फत पाणीपुरवठा केला जातो. मागील काही दिवसांपासून वॉर्ड क्रमांक-१ आणि २ मधील नागरिकांच्या घरी असलेल्या नळांना काळेकुट्ट पाणी येत असल्याने तसेच सदर पाणी पिण्यासाठी तर सोडाच कोणत्याही कामासाठी वापरण्यायोग्य नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. हे ‘काळे पाणी प्यायचे का’, असा सवाल यानिमित्ताने नागरिकांनी उपस्थित केला आहे.बुटीबोरी येथीन वॉर्ड क्रमांक-१ व २ मधील घरांमध्ये असलेल्या नळांना मागील काही दिवसांपासून काळ्या रंगाचे पाणी येत आहे. सुरुवातीला नागरिकांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र, नळाला रोजच काळे पाणी येत असल्याने तसेच पिण्यासह वापरण्यासाठी लागणारे पाणी आणायला भटकंती करावी लागत असल्याने नागरिकांनी याबाबत त्यांच्या वॉर्डातील ग्रामपंचायत सदस्यांना कळविले तसेच ग्रामपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. मात्र, प्रशासनाने यावर कुठलीही ठोस उपाययोजना केली नाही, असा आरोप नागरिकांनी केला.ही समस्या सोडविण्यासाठी बुटीबोरी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष युसूफ शेख यांनी पुढाकार घेत ग्रामपंचायत सरपंच व ग्रामविकास अधिकाºयाला मागण्यांचे निवेदन देऊन ग्रामविकास अधिकारी एस. व्ही. जोशी यांच्याशी या समस्येवर चर्चा केली आणि ती सोडविण्याची मागणी केली.या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांना पाठविण्यात आल्याचे युसूफ शेख यांनी सांगितले. बुटीबोरी येथे डेंग्यू, टायफाईड, मलेरिया तसेच स्वाईन फ्लूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात नळाच्या काळ्या पाण्याने भर टाकली आहे. या पाण्याचा वापर कपडे किंवा भांडी धुण्यासाठी करणे शक्य नाही. मग ते पिण्यासाठी कसे वापरायचे, असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी केला.या सर्व समस्यांकडे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे, असा आरोप काही नागरिकांनी केला असून, नळाला येणाºया काळ्या पाण्याचा पुरवठा तत्काळ बंद करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शिष्टमंडळात युसूफ शेख, राजू गावंडे, राहुल पटले, रोहित कुकडे आदीेंचा समावेश होता.या आहेत मागण्यासर्व हॅण्डपंपजवळील परिसराची साफसफाई करून पिण्याच्या पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकण्यात यावे, सार्वजनिक विहिरींची व विहिरींच्या परिसराची साफसफाई करून विहिरींमधील पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकावे, प्रत्येक वॉर्डात डासांची पैदास वाढल्याने डास प्रतिबंधक औषधांची फवारणी अथवा धुरळणी करावी, नळाला येणाºया दूषित पाण्याचा पुरवठा तत्काळ बंद करून शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, गावातील नाल्यांची साफसफाई करून सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावावी, जुन्या वस्तीतील गोदामाजवळ साचलेल्या कचºयाची विल्हेवाट लावून त्या परिसराची साफसफाई करावी, जुन्या वस्तीतील काही रस्त्यांलगत कचरा साचला असून, त्याची विल्हेवाट लावावी, रोडवरील खड्डे बुजवावे आदी मागण्यांचा समावेश निवेदनात आहे.