शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
4
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
5
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
6
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
7
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
8
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
9
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
10
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
11
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
12
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
13
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
14
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
15
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
16
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
17
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
18
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
19
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
20
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

शहराचा नावलौकिक होईल असे कार्य करा : महापौर नंदा जिचकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 23:32 IST

शहराच्या स्वच्छतेमध्ये सफाई कामगारांचे महत्त्वाचे योगदान आहे. शहर स्वच्छतेच्या बाबतीत महापालिकेने मिळविलेले यश हे सफाई कामगारांच्या कार्याची फलश्रुती आहे. प्रामाणिकपणे कार्य करून आपल्या शहराचा नावलौकिक करणाऱ्या आईवडिलांच्या कार्याचा आदर्श पुढे ठेवून आपले शहर स्वच्छ भारत मिशनमध्ये क्रमांक एक वर यावे, यासाठी त्याच विश्वासाने व प्रामाणिकपणे कार्य करा, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी मनपा सेवेत रुजू होणाऱ्या ऐवजदार सफाई कामगारांना केले.

ठळक मुद्देमृत ऐवजदार सफाई कामगारांच्या वारसदारांना ऐवजी कार्ड प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहराच्या स्वच्छतेमध्ये सफाई कामगारांचे महत्त्वाचे योगदान आहे. शहर स्वच्छतेच्या बाबतीत महापालिकेने मिळविलेले यश हे सफाई कामगारांच्या कार्याची फलश्रुती आहे. प्रामाणिकपणे कार्य करून आपल्या शहराचा नावलौकिक करणाऱ्या आईवडिलांच्या कार्याचा आदर्श पुढे ठेवून आपले शहर स्वच्छ भारत मिशनमध्ये क्रमांक एक वर यावे, यासाठी त्याच विश्वासाने व प्रामाणिकपणे कार्य करा, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी मनपा सेवेत रुजू होणाऱ्या ऐवजदार सफाई कामगारांना केले.मनपा सेवेतील मृत ऐवजदार सफाई कमागारांच्या वारसदारांना बुधवारी महापालिका सभागृहात आयोजित कार्यक्रमात नंदा जिचकार यांच्यासह उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या हस्ते ऐवजी कार्ड प्रदान करण्यात आले. कार्यक्रमात आरोग्य समिती सभापती मनोज चापले, विधी समिती सभापती धर्मपाल मेश्राम, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, विभागीय अधिकारी रोहिदास राठोड, राजेश हाथीबेड, एसबीएम विकास संस्थेचे अध्यक्ष सतीश सिरसवान व झोनचे झोनल अधिकारी उपस्थित होते.अनेक वर्षांच्या प्रयत्नाला यशऐवजदार सफाई कामगारांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाची होणारी अवस्था लक्षात घेता त्यांच्या वारसदाराला ऐवजदार सफाई कर्मचारी म्हणून रुजू करावे यासाठी अनेक वर्षांपासून शासनस्तरावर प्रयत्न सुरू होते. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही वेळोवेळी दखल घेतली. प्रशासनातर्फे ही आयुक्तांनी योग्य निर्णय घेऊन हे कार्य पूर्णत्वास नेले व अनेक वर्षांच्या प्रयत्नांना यश आले आहे, असे सांगत सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांच्यासह आयुक्तांचेही अभिनंदन केले. ऐवजदार सफाई कामगारांच्या वारसांना सेवेत घेण्यात यावे यासाठी सत्तापक्षातर्फे सभागृहामध्ये भूमिका मांडण्यात आली. येणाऱ्याअडचणी सोडवून प्रशासनाने अखेर सेवेत नियुक्तीचा मार्ग मोकळा केला. शहरात स्वच्छतेबाबत येणाऱ्या तक्रारी लक्षात घेता सर्वांनी ठरवून दिलेल्या वेळेवर १०० टक्के काम करून कोणत्याही तक्रारीची संधी देऊ नका,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाEmployeeकर्मचारी