शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

सार्वजनिक हिताची कामे सांगा

By admin | Updated: June 22, 2015 02:33 IST

भाजपच्या शहर कार्यकारिणीची बैठक रविवारी क्रीडा चौकातील संत रविदास सभागृहात आयोजित करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांचा कार्यकर्त्यांना सल्ला : मनपात दीडपट जागा जिंकायच्या भाजपच्या शहर कार्यकारिणीची बैठक रविवारी क्रीडा चौकातील संत रविदास सभागृहात आयोजित करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी केंद्रीय परिवहन व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. संजय धोत्रे, माजी खा. बनवारीलाल पुरोहित, महापौर प्रवीण दटके, शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकर देशमुख, आ. अनिल सोले, आ. सुधाकर कोहळे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. विकास कुंभारे, मायाताई इवनाते, माजी आ. अशोक मानकर, स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, १९९५ मध्ये राज्यात युतीचे सरकार आले तेव्हा आपण जवळून पाहिले आहे, सत्ता येताच अनेक लोक एका रात्रीत भाजपचे होतात, जे कधीच आपले नसतात. त्यामुळे येत्या काळात आपले लोक लक्षात ठेवा व आपले काम लक्षात ठेवा, असा सल्ला त्यांनी दिला. निवडणुका कार्यकर्त्यांच्या नेटवर्कच्या बळावर जिंकल्या आहेत. आता कार्यकर्ते शांत झाल्यासारखे वाटतात. मंडळ, महामंडळाचा उल्लेख केला तरच टाळ्या वाजतात, असे चिमटे काढत जुलैमध्ये याद्या तयार होऊन आॅगस्टमध्ये त्यावर शिक्कामोर्तब होईल. सर्वांना संधी मिळेल, असे त्यांनी आश्वस्त केले. पण हेच पद, मंडळ हवे, असा आग्रह धरू नका. तसे करणे शक्य नाही. आपल्याला सत्ता सामान्यांचा सेतू बनण्यासाठी हवी आहे, याची जाणीवही त्यांनी कार्यकर्त्यांना करून दिली. जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. राज्य सरकारने सहा महिन्यात ४४ आश्वासने पूर्ण केली आहेत. आपले माध्यम मीडिया नाही तर कार्यकर्ता आहे. दीड वर्षांनी महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे विकासाचा अजेंडा लोकांपर्यंत घेऊन जा, लोकांचा विश्वास जिंका, असे आवाहन करीत आपल्याला महापालिकेत आहे त्यापेक्षा दीडपट जास्त जागा जिंकायच्या आहेत, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला. नागपूर : काही लोक विशिष्ट अधिकाऱ्यांची, व्यक्तिगत स्वरूपाची कामे घेऊन येतात. ही कामे झाली नाही तर नाराज होतात. अशी कामे स्वीकारताना तुम्हीच विचार करा. तुमच्याकडे येणारे काम सार्वजनिक हिताचे असेल तर ते त्वरित स्वीकारा. मला सांगा, मी मार्गी लावतो. अशा कामांसाठी नाराज होण्याचा अधिकार तुम्हाला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लाभा’च्या कामांसाठी चकरा मारणाऱ्या कार्यकर्त्यांना भानावर आणले.