शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
4
MS धोनीला कायदेशीर चॅलेंज! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
5
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
6
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
7
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
8
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
9
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
10
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
11
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
12
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
13
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
14
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
15
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?
16
"मी गौरीसोबत लग्न केलंय...", आमिर खानचा मोठा खुलासा, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का
17
"माझे हात थरथरत होते, ऐश्वर्या रायच्या ब्लाउजचं हूक..."; अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
Realme: आवाज ऐकताच फोटो एडीट करून देईल रिअलमीचा 'हा' फोन, लवकरच बाजारात करतोय एन्ट्री!
20
Gold Silver Price 8 July: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; किंमत लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

सार्वजनिक हिताची कामे सांगा

By admin | Updated: June 22, 2015 02:33 IST

भाजपच्या शहर कार्यकारिणीची बैठक रविवारी क्रीडा चौकातील संत रविदास सभागृहात आयोजित करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांचा कार्यकर्त्यांना सल्ला : मनपात दीडपट जागा जिंकायच्या भाजपच्या शहर कार्यकारिणीची बैठक रविवारी क्रीडा चौकातील संत रविदास सभागृहात आयोजित करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी केंद्रीय परिवहन व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. संजय धोत्रे, माजी खा. बनवारीलाल पुरोहित, महापौर प्रवीण दटके, शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकर देशमुख, आ. अनिल सोले, आ. सुधाकर कोहळे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. विकास कुंभारे, मायाताई इवनाते, माजी आ. अशोक मानकर, स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, १९९५ मध्ये राज्यात युतीचे सरकार आले तेव्हा आपण जवळून पाहिले आहे, सत्ता येताच अनेक लोक एका रात्रीत भाजपचे होतात, जे कधीच आपले नसतात. त्यामुळे येत्या काळात आपले लोक लक्षात ठेवा व आपले काम लक्षात ठेवा, असा सल्ला त्यांनी दिला. निवडणुका कार्यकर्त्यांच्या नेटवर्कच्या बळावर जिंकल्या आहेत. आता कार्यकर्ते शांत झाल्यासारखे वाटतात. मंडळ, महामंडळाचा उल्लेख केला तरच टाळ्या वाजतात, असे चिमटे काढत जुलैमध्ये याद्या तयार होऊन आॅगस्टमध्ये त्यावर शिक्कामोर्तब होईल. सर्वांना संधी मिळेल, असे त्यांनी आश्वस्त केले. पण हेच पद, मंडळ हवे, असा आग्रह धरू नका. तसे करणे शक्य नाही. आपल्याला सत्ता सामान्यांचा सेतू बनण्यासाठी हवी आहे, याची जाणीवही त्यांनी कार्यकर्त्यांना करून दिली. जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. राज्य सरकारने सहा महिन्यात ४४ आश्वासने पूर्ण केली आहेत. आपले माध्यम मीडिया नाही तर कार्यकर्ता आहे. दीड वर्षांनी महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे विकासाचा अजेंडा लोकांपर्यंत घेऊन जा, लोकांचा विश्वास जिंका, असे आवाहन करीत आपल्याला महापालिकेत आहे त्यापेक्षा दीडपट जास्त जागा जिंकायच्या आहेत, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला. नागपूर : काही लोक विशिष्ट अधिकाऱ्यांची, व्यक्तिगत स्वरूपाची कामे घेऊन येतात. ही कामे झाली नाही तर नाराज होतात. अशी कामे स्वीकारताना तुम्हीच विचार करा. तुमच्याकडे येणारे काम सार्वजनिक हिताचे असेल तर ते त्वरित स्वीकारा. मला सांगा, मी मार्गी लावतो. अशा कामांसाठी नाराज होण्याचा अधिकार तुम्हाला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लाभा’च्या कामांसाठी चकरा मारणाऱ्या कार्यकर्त्यांना भानावर आणले.