शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

मुलांना जन्म द्यायचा नाही, अशी लग्नं काय कामाची? विष्णू कोकजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 09:44 IST

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिंदू हक्कांसाठी आमचा लढा सुरूच राहणार असल्याची भूमिका स्पष्ट करत असताना विश्व हिंदू परिषदे चे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष विष्णू कोकजे यांनी लग्नसंस्थेच्या वर्तमान बदलांवर जोरदार टीका केली आहे. संस्कारविहीन शिक्षणामुळे पाश्चिमात्य विकृती देशात फोफावत आहेत. यातूनच लग्न करूनदेखील वर्षानुवर्षे अपत्य होऊ न देण्याचा ‘ट्रेन्ड’ आला आहे. ...

ठळक मुद्दे‘विहिंप’ची आक्रमकता कमी होणार नाहीशिक्षणपद्धतीत बदलांचा आग्रह

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिंदू हक्कांसाठी आमचा लढा सुरूच राहणार असल्याची भूमिका स्पष्ट करत असताना विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष विष्णू कोकजे यांनी लग्नसंस्थेच्या वर्तमान बदलांवर जोरदार टीका केली आहे. संस्कारविहीन शिक्षणामुळे पाश्चिमात्य विकृती देशात फोफावत आहेत. यातूनच लग्न करूनदेखील वर्षानुवर्षे अपत्य होऊ न देण्याचा ‘ट्रेन्ड’ आला आहे. जर मुलांना जन्मच द्यायचा नाही तर मग अशी लग्न काय कामाची असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच नागपुरात आले असताना त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.संस्कारविहीन शिक्षणामुळे कुटुंबपद्धतीत बदल होत असून संस्कारांचा अभाव जाणवायला लागला आहे. समलैंगिक विवाह, लग्नापूर्वी लैंगिक संबंध आणि ‘लिव्ह इन रिलेशनशीप’सारख्या पाश्चिमात्य विकृती यातूनच आपल्या देशात फोफावत आहेत. लग्नप्रणाली ही खरे तर एका विचारातून उदयाला आली. संततीला सामाजिक ओळख मिळावी व संस्कारांचे बीजारोपण व्हावे, हा त्यामागचा उद्देश होता. मात्र पाश्चात्त्य देशांप्रमाणे आपल्याकडेदेखील आता लग्न झाल्यानंतर मुले होऊ न देणे किंवा लग्नाशिवायच एकत्र राहणे असले प्रकार सुरू झाले. यावर समाजात मंथन होणे आवश्यक आहे, असे कोकजे यांनी प्रतिपादन केले.

बलात्कारी मुलांचे समर्थन का?यावेळी विष्णू कोकजे यांनी देशात वाढत असलेल्या बलात्कारांच्या घटनांवर चिंता व्यक्त केली. बलात्कार कोणावरही होवो तो निंदनीयच प्रकार आहे. मात्र हे प्रकार वाढले याला कुटुंबव्यवस्थेतील संस्कारांचा अभाव कारणीभूत आहे. घरात संस्कार मिळत नसल्यामुळे लहान वयातच अशा गोष्टींकडे मुले आकर्षित होतात. आश्चर्याची बाब म्हणजे जो मुलगा बलात्कार करतो, त्याला घरचे घराबाहेर न काढता त्याला वाचविण्यासाठी धावपळ करतात. अशा बलात्कारी मुलांचे समर्थनच कशाला हवे, असा प्रश्न कोकजे यांनी उपस्थित केला.

‘विहिंप’ आक्रमकता सोडणार नाहीस्वातंत्र्यानंतर आपल्या देशात सातत्याने हिंदू विचारधारेचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र जेथे जेथे हिंदूंवर अन्याय होईल तेथे ‘विहिंप’ व बजरंग दलाचे कार्यकर्ते खंबीरपणे उभे ठाकतील. ‘विहिंंप’ आपली आक्रमकता सोडणार नाही. ‘विहिंप’च्या स्थापनेचा उद्देश सामाजिक समरसता होता. मात्र वेळेनुरुप ‘विहिंप’ला ध्येयधोरणांमध्ये बदल करावा लागला. परंतु अयोध्येत राममंदिर उभारल्यानंतर ‘विहिंप’ परत मूळ कामांकडे वळणार असल्याचे कोकजे यांनी सांगितले.

नवीन पिढीपर्यंत योग्य इतिहास जावास्वातंत्र्यानंतर काँग्रेस व डाव्या विचारधारेने हिंदूंचे नियोजनबद्ध पद्धतीने खच्चीकरण केले. विशेषत: अभ्यासप्रणालीत नको ते बदल केले. मात्र हाच बदल देशासाठी दुर्दैवी ठरला. अभ्यासक्रमांत विद्या आहे, मात्र संस्कार नाही. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमात संस्कारयुक्त शिक्षणाची आवश्यकता आहे. योग्य इतिहास नवीन पिढ्यांपर्यंत गेला पाहिजे व त्यादृष्टीने बदल झाले पाहिजे, असे विष्णू कोकजे यांनी मत मांडले.

‘विहिंप’ला कुठलाही धोका नाहीडॉ.प्रवीण तोगडिया यांच्यावर यावेळी थेट भाष्य करण्याचे विष्णू कोकजे यांनी टाळले. सध्या ‘विहिंप’चे काही कार्यकर्ते नाराज आहेत. मात्र ही नाराजी जास्त दिवस टिकणार नाही. इतकी वर्षे ‘विहिंप’चे काम करत आहेत, ते परत येतील. ‘विहिंप’ला कुठलाही धोका नाही व समाजाच्या हितासाठी आणखी जोमाने कार्य करु, असे विष्णू कोकजे यांनी सांगितले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ