शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

सक्तीची कारवाई करू नका

By admin | Updated: March 5, 2016 03:01 IST

सिंचन घोटाळाप्रकरणी भ्रष्टाचारविरोधी विभाग (एसीबी) ने सुरू केलेल्या कारवाईविरुद्ध एफए कन्स्ट्रक्शन कंपनीने दाखल केलेल्या याचिकेवर

हायकोर्टाचे निर्देश : सिंचन घोटाळा प्रकरण, एसीबी विरुद्ध एफए कन्स्ट्रक्शनची याचिकानागपूर : सिंचन घोटाळाप्रकरणी भ्रष्टाचारविरोधी विभाग (एसीबी) ने सुरू केलेल्या कारवाईविरुद्ध एफए कन्स्ट्रक्शन कंपनीने दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाचे न्या. भूषण गवई आणि न्या. प्रदीप देशमुख यांच्या खंडपीठाने कंपनीच्या एका भागीदाराने तपासात सहकार्य करावे, या अटीवर कंपनीविरुद्ध सक्तीची कारवाई करू नये, असे निर्देश दिले आहे. न्यायालयाने प्रतिवादींना एक आठवड्यात उत्तर मागणारी नोटीस जारी केली आहे. राज्यातील राजकीय सत्ता बदलताच राजकीय वैरत्व म्हणून भ्रष्टाचारविरोधी विभाग (एसीबी) ने सिंचन घोटाळ्यात एफए कन्स्ट्रक्शन आणि भागीदारांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. त्यांची नावे एसीबीने दाखल केलेल्या प्रथम खबरी अहवालात आहेत. ही कारवाई थांबावी म्हणून एफए कन्स्ट्रक्शनने उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहे. गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाचा एक भाग असलेल्या घोडाझरी कालव्याच्या बांधकामातील कथित घोटाळाप्रकरणी एसीबीने आपल्या पहिल्या प्रथम खबरी अहवालात एफए कन्स्ट्रक्शन आणि विदर्भ सिंचन विकास महामंडळाच्या दोन निवृत्त अधिकाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३ (१) (सी), १३ (१) (डी), १३ (२) आणि भादंविच्या १२०-ब, १०९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. सरकारचे आरोप बिनबुडाचेनागपूर : एफए कन्स्ट्रक्शन आणि कंपनी संचालक जैतून फतेह मोहम्मद खत्री, निसार फतेह मोहम्मद खत्री, आबिद फतेह मोहम्मद खत्री आणि झहीद फतेह मोहम्मद खत्री यांनी २४ फेब्रुवारी रोजी मुंबईच्या सत्र न्यायालयात धाव घेऊन कारवाईवर ७२ तासांची स्थगिती मिळवून घेतली. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य पीठाकडे धाव घेऊन एक आठवड्याच्या प्रवास जामिनासाठी प्रार्थना केली. याचिकाकर्त्यांनी एसीबीवर आरोप करताना याचिकेत असे म्हटले की, यापूर्वीच्या सरकारसोबत आमचे नजीकचे संबंध असल्याने आम्हाला भक्ष्य ठरवण्यात आले. आमच्याविरुद्धच्या आरोपाची कोणतीही प्रत्यक्षरीत्या पडताळणी न करता आमच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही फौजदारी कारवाई म्हणजे आधीचे सरकार आणि सरकारातील अधिकारी यांची प्रतिमा मलीन करण्याचा हा प्रयत्न असल्याचा दावाही याचिकाकर्त्यांनी केला. लोकप्रियता प्राप्त करण्यातून सरकार आणि एसीबी निष्पाप व्यक्तींना बळीचा बकरा बनवित असल्याचा दावाही करण्यात आला आहे. या कंत्राटदारांनी असाही दावा केला की, कंपनीचे दोन भागीदार खूपच वृद्ध आणि आजारी आहेत. अन्य दोघांचा तात्पुरता सहभाग आहे केवळ निसार खत्री हेच दैनंदिन कारभार पाहतात. घोडाझरी कालव्याच्या प्रकरणात एफए कन्स्ट्रक्शनचे निसार खत्री यांचा समावेश असलेल्या भागीदारांविरुद्ध दस्तावेजात हेराफेरी करणे, माहिती दडवणे, सरकार आणि व्हीएडीसीची फसवणूक करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. कंत्राट आणि व्यवसायाशी संबंधित बरेच दस्तावेज एफए कन्स्ट्रक्शनकडून एसीबीने जप्त केलेले आहेत. याचिकाकर्त्यांनी सर्व आरोप बिनबुडाचे, अयोग्य आणि कलुषित भावनेतून करण्यात आल्याचे म्हटले आहे. न्यायालयात याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. शशांक मनोहर, अ‍ॅड. श्याम देवाणी तर सरकारच्या वतीने सहयोगी महाधिवक्ता रोहित देव यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)