शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कारवाई नको, लग्नच लावून द्या!

By admin | Updated: November 27, 2015 03:05 IST

वर्षभरापासून आमचे संबंध आहेत. त्याने लग्न करू असे सांगितले होते. त्यामुळे आमच्यात शरीरसंबंध प्रस्थापित झाले.

प्रेमसंबंधाचा अतिरेक : तक्रारकर्तीच्या मागणीने पोलीस पेचातनरेश डोंगरे नागपूरवर्षभरापासून आमचे संबंध आहेत. त्याने लग्न करू असे सांगितले होते. त्यामुळे आमच्यात शरीरसंबंध प्रस्थापित झाले. अगदी पती-पत्नीसारखे आम्ही वागत होतो. आता मात्र तो लग्नास नकार देतो. त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करता येईल का, असा प्रश्न करणाऱ्या महिलेला पोलीस लगेच हो म्हणून उत्तर देतात. यानंतर काही वेळेतच ती महिला ‘साहेब, कारवाई नका करू, त्यापेक्षा त्याला चार-दोन ठेवून आमचे लग्नच लावून द्या’ , अशी मागणी करते. एमआयडीसी आणि इमामवाड्यातील ताज्या प्रकरणात अशाच प्रकारची मागणी झाली आहे. बलात्काराच्या प्रकरणात अलीकडे ही मागणी वाढल्याने पोलिसांची चांगलीच गोची होत आहे. अविवाहित तरुण-तरुणीच नव्हे तर विवाहित महिला-पुरुषही ‘प्रेमसंबंधाच्या नावाखाली’ मर्यादा सोडतात. दोन्हीकडून वाजवी अपेक्षा असेपर्यंत महिनोमहिने हे मधुर (अनैतिक !) संबंध सुरू राहतात. मन भरले किंवा अवाजवी मागण्या झाल्या की संबंधात कटुता येते. नंतर हे प्रकरण भलत्याच वळणावर जाते. ‘त्याला‘ धडा शिकविण्याच्या हेतूने ती पोलीस ठाण्यात पोहचते. पोलीस तिची तक्रार ऐकून गुन्हा दाखल करण्याची, अर्थात कारवाईची प्रक्रिया सुरू करतातचार दिवसांपूर्वी घडलेल्या दोन प्रकरणातून पुन्हा ही मागणी पुढे आल्यामुळे पोलिसांची चांगलीच गोची झाली आहे.ते पती-पत्नीसारखे राहायचेकारवाई नको, लग्नच लावून द्या!नागपूर : दुसरे प्रकरण इमामवाड्यातील दोघेही तेथेच राहतात. त्यांचे प्रेमप्रकरण वर्ष-दीड वर्षांपासून सुरू होते. सहा महिन्यांपूर्वी घरच्यांचा विरोध पत्करून तिने त्याचा हात धरत आपले घर सोडले. तेव्हापासून ते पती-पत्नीसारखे राहात होते. आता मात्र दोघांचे बिनसले. त्यामुळे ही तरुणी चार दिवसांपासून इमामवाडा पोलीस ठाण्याच्या चकरा मारत आहे. तिच्या तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकतो, याची कल्पना आल्यामुळे ती घुटमळत आहे. बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याऐवजी त्याने आपल्याशी लग्न केले तर त्याला अन् मलाही त्रास होणार नाही, असा युक्तिवाद करून ती पोलिसांना ‘त्याला‘ लग्न करण्यासाठी तयार करण्याची मागणी करीत आहे. तिसरे प्रकरण : अंबाझरीत असेच एक प्रकरण घडले होते. दोघेही एकत्र राहत होते. काही दिवसानंतर त्यांच्यात कटुता आली. त्यामुळे तिने तक्रार नोंदवली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. तेव्हा त्याच्यापेक्षा हीच जास्त अस्वस्थ झाली. त्याला तात्काळ बाहेर काढा, अशी मागणी त्यावेळी तिने नोंदवली होती. त्याच्यासाठी ती घरून जेवणाचा डबाही आणत होती. दोन आठवड्यांपूर्वी एमआयडीसीतही असाच प्रकार घडला होता. ही चार उदाहरणे प्रातिनिधिक आहेत. बलात्काराची तक्रार घेऊन येणारी महिला किंवा तरुणी ‘साहेब, आमचे लग्नच लावून द्या’, अशी आग्रही मागणी बहुतांश प्रकरणात करतात. अशा केसेस अनेक पोलीस ठाण्यात येत असल्याचा अनुभव अनेक पोलीस अधिकारी सांगतात. युवतींच्या अशा मागणीमुळे आमची मानसिक कोंडी होते अन् पुढे नोकरीवर गदा येण्याचा धोकाही असतो. मात्र, माणुसकी आणि ‘त्या‘ दोघांचे भविष्य लक्षात घेत काही वेळा त्यांची जन्मगाठ बांधून देण्याची व्यवस्था आम्हाला करावी लागते, असेही काही पोलीस अधिकारी सांगतात.पालकांची भूमिका महत्त्वाची !असे प्रकरण प्रसंगी कोणत्याही वळणावर जाऊ शकते. बदनामीच्या धाकापोटी किंवा पश्चातापामुळे नंतर संबंधित तरुण, तरुणी किंवा महिला, पुरुष यापैकी कुणी आत्महत्याही करू शकतो. त्यामुळे अशा प्रकरणात पालकांची भूमिका महत्त्वाची ठरते, अशी प्रतिक्रिया महिला, मुलींसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. प्राची बागडे यांनी नोंदविली आहे. असेच एक प्रकरण बागडे गेल्या पाच दिवसांपासून हाताळत आहेत. त्यांच्या समुपदेशनामुळेच एका तरुणीचा जीवही वाचला अन् दोन्ही कुटुंबातील तेढही कमी झाली आहे. पालकांनी आपल्या तरुण पाल्यांवर आणि समाजाने आपल्या आजूबाजूच्यांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. कुणाचे पाऊल वाकडे पडत असेल आणि वेळीच त्याचे योग्य समुपदेशन झाल्यास त्याला सावरता येते, असेही बागडे म्हणतात.१) ती सावनेरची. तो सौंसर (छिंदवाड्याचा). दोघेही वेगवेगळ्या कंपनीत फिल्ड जॉब करणारे. नोव्हेंबर २०१४ मध्ये छिंदवाड्यात त्यांची बसमध्ये ओळख झाली. ही ओळख मैत्रीत रुपांतरित झाली. मैत्री बहरतच गेली अन्..‘ लग्न करू‘ असे म्हणत त्यांनी मर्यादा ओलांडली. तिने कंपनी सोडून नर्सचे प्रशिक्षण सुरू केले तर, त्यानेही आपले गाव, कंपनी सोडून बुटीबोरीत नवीन काम धरले. हे दोघेही भाड्याच्या खोलीत पती-पत्नीसारखे वागत होते. काही दिवसांपूर्वी तो बाहेरगावी जातो, असे म्हणत नागपुरातून गेला. चुकून त्याचा मोबाईल तिच्या रूमवर राहिला. त्यावर वारंवार एका तरुणीचे फोन, मेसेज येत असल्याने ‘तो दुसरीकडे कनेक्ट‘ असल्याचे ‘हिच्या‘ लक्षात आले. त्यामुळे तिने लग्नासाठी तगादा लावला. पोलिसांकडेही जाण्याचा धाक दाखवला. त्याने दाद दिली नसल्यामुळे ती ठाण्यात पोहचली. बलात्काराची तक्रार देतानाच ‘त्याने लग्न केले तर त्याच्यावर कारवाई करू नये, असे स्पष्ट करतानाच त्याला समजावण्याची जबाबदारीही पोलिसांवर टाकण्याचा प्रयत्न केला. ते पती-पत्नीसारखे राहायचेनागपूर : दुसरे प्रकरण इमामवाड्यातील दोघेही तेथेच राहतात. त्यांचे प्रेमप्रकरण वर्ष-दीड वर्षांपासून सुरू होते. सहा महिन्यांपूर्वी घरच्यांचा विरोध पत्करून तिने त्याचा हात धरत आपले घर सोडले. तेव्हापासून ते पती-पत्नीसारखे राहात होते. आता मात्र दोघांचे बिनसले. त्यामुळे ही तरुणी चार दिवसांपासून इमामवाडा पोलीस ठाण्याच्या चकरा मारत आहे. तिच्या तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकतो, याची कल्पना आल्यामुळे ती घुटमळत आहे. बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याऐवजी त्याने आपल्याशी लग्न केले तर त्याला अन् मलाही त्रास होणार नाही, असा युक्तिवाद करून ती पोलिसांना ‘त्याला‘ लग्न करण्यासाठी तयार करण्याची मागणी करीत आहे. तिसरे प्रकरण : अंबाझरीत असेच एक प्रकरण घडले होते. दोघेही एकत्र राहत होते. काही दिवसानंतर त्यांच्यात कटुता आली. त्यामुळे तिने तक्रार नोंदवली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. तेव्हा त्याच्यापेक्षा हीच जास्त अस्वस्थ झाली. त्याला तात्काळ बाहेर काढा, अशी मागणी त्यावेळी तिने नोंदवली होती. त्याच्यासाठी ती घरून जेवणाचा डबाही आणत होती. दोन आठवड्यांपूर्वी एमआयडीसीतही असाच प्रकार घडला होता. ही चार उदाहरणे प्रातिनिधिक आहेत. बलात्काराची तक्रार घेऊन येणारी महिला किंवा तरुणी ‘साहेब, आमचे लग्नच लावून द्या’, अशी आग्रही मागणी बहुतांश प्रकरणात करतात. अशा केसेस अनेक पोलीस ठाण्यात येत असल्याचा अनुभव अनेक पोलीस अधिकारी सांगतात. युवतींच्या अशा मागणीमुळे आमची मानसिक कोंडी होते अन् पुढे नोकरीवर गदा येण्याचा धोकाही असतो. मात्र, माणुसकी आणि ‘त्या‘ दोघांचे भविष्य लक्षात घेत काही वेळा त्यांची जन्मगाठ बांधून देण्याची व्यवस्था आम्हाला करावी लागते, असेही काही पोलीस अधिकारी सांगतात.(प्रतिनिधी)पालकांची भूमिका महत्त्वाची !असे प्रकरण प्रसंगी कोणत्याही वळणावर जाऊ शकते. बदनामीच्या धाकापोटी किंवा पश्चातापामुळे नंतर संबंधित तरुण, तरुणी किंवा महिला, पुरुष यापैकी कुणी आत्महत्याही करू शकतो. त्यामुळे अशा प्रकरणात पालकांची भूमिका महत्त्वाची ठरते, अशी प्रतिक्रिया महिला, मुलींसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. प्राची बागडे यांनी नोंदविली आहे. असेच एक प्रकरण बागडे गेल्या पाच दिवसांपासून हाताळत आहेत. त्यांच्या समुपदेशनामुळेच एका तरुणीचा जीवही वाचला अन् दोन्ही कुटुंबातील तेढही कमी झाली आहे. पालकांनी आपल्या तरुण पाल्यांवर आणि समाजाने आपल्या आजूबाजूच्यांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. कुणाचे पाऊल वाकडे पडत असेल आणि वेळीच त्याचे योग्य समुपदेशन झाल्यास त्याला सावरता येते, असेही बागडे म्हणतात.