शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण नको, चौकशी करा

By admin | Updated: February 14, 2016 02:38 IST

गटबाजीचे राजकारण आणि स्वार्थी प्रवृत्तीमुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील ६६ शिक्षकेतर पदांच्या पदभरतीला ग्रहण लागले.

माजी सिनेट सदस्य आक्रमक : व्यवस्थापन परिषद सदस्यांचाही हल्लाबोलजितेंद्र ढवळे नागपूरगटबाजीचे राजकारण आणि स्वार्थी प्रवृत्तीमुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील ६६ शिक्षकेतर पदांच्या पदभरतीला ग्रहण लागले. प्रशासनाने यासंदर्भात अद्यापही भूमिका स्पष्ट केली नसली तरी गत तीन वर्षांत पाणी कुठ मुरलं, याची चौकशी करण्याची मागणी विद्यापीठातील माजी व्यवस्थापन परिषद आणि सिनेट सदस्यांनी केली. ‘विद्यापीठात अनुशेषाची कोंडी’ या वृत्तमालिकेत लोकमतने विद्यापीठातील शिक्षकेतर पदांच्या पदभरतीतील वास्तव पुढे आणले आहे. यासोबत पदभरती लांबविण्यासाठी दबावगटाकडंून वारंवार कसे अडथळे आणण्यात आले, याचा ऊहापोह केला होता. या पार्श्वभूमीवर विद्यापीठातील निवडक मान्यवरांनी यावर आपले मत व्यक्त केले आहे. राजकारणाचा फटका बेरोजगारांना का?नागपूर : व्यवस्थापन परिषद आणि कुलगुरूंच्या मान्यनेनंतरच विद्यापीठाने शिक्षकेतर पदांसाठी २०१३ मध्ये जाहिरात प्रकाशित केले होती. त्यावेळी सेवाप्रवेश नियम निर्देश क्रमांक २८/२०१२ हा अस्तित्वात होता. निर्देश क्रमांक २७/२०१४ ला तत्कालीन प्रभारी कुलगुरू डॉ.विनायक देशपांडे यांनी १९ नोव्हेंबर २०१४ रोजी यांनी मान्यता दिली होती. त्यामुळे पदभरती जुन्या नियमानुसार घ्यावी की नवीन नियमानुसार घ्यावी, हा प्रश्न येतो कुठे ? मुळात प्रशासनातला असमन्वय आणि अंतर्गत राजकारण यामागील मूळ कारण आहे. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने अशा प्रकारात दिलेल्या निर्वाळ्याचा आधार घेत पदभरतीचा प्रश्न निकालात काढावा, अशी मी वारंवार मागणी केली. स्थायी अधिवक्ता आणि अ‍ॅड. परचुरे यांचे मत विद्यापीठाने विचारात का घेतले नाही? मग प्रशासन जर या विषयात कोणतीही भूमिका मांडत नसेल तर बेरोजगार युवकांनी विद्यापीठात आंदोलन केले तर चालेल का ?, असा सवाल व्यवस्थापन परिषदचे मजी सदस्य डॉ.बबनराव तायवाडे यांनी केला. न्यायालयीन चौकशी करा परीक्षा झाल्यानंतर चार महिने निकाल लागत नाही. रिटायर्ड कर्मचाऱ्यांच्या फौैजेने विद्यापीठावर ताबा मिळविला आहे. परीक्षा विभागात सुधारासाठी मी स्वत: पुढाकार घेतला होता. मात्र कोणताही सुधार करण्यासाठी तज्ज्ञ यंत्रणा आणि कर्तबार अधिकाऱ्यांची आवश्यकता असते. नशिबाने या दोन्ही गोष्टी नागपूर विद्यापीठात होत नाही. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती झाली असती तर आज विद्यापीठ ‘टायर्ड’ नसते. मुळात काही स्वार्थी प्रवृत्तींच्या लोकांनी पदभरतीत खोळांबा निर्माण केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून दोषीवर कारवाई होणे गरजेचे आहे.-महेंद्र निंबार्तेमाजी व्यवस्थापन परिषद सदस्यआम्ही आग्रही, पण प्रशासन सुस्तशिक्षकेतर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची पदे भरण्यासंदर्भात आणि ही प्रक्रिया पारदर्शी राबविण्याची मागणी मी वेळीवेळी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत केली. मात्र प्रशासन या विषयावर नेहमीच सुस्त दिसले. त्यांच्यावर कुणाचा दबाव होता? एकदा व्यवस्थापन परिषद आणि कुलगुरूंनी एखाद्या विषयावर निर्णय घेतला असेल तर त्याची अंमलबजावणी करणे एवढेच प्रशासनाचे काम असते. तसे गत तीन वर्षांत घडले नाही, हे दुर्दैव आहे. -डॉ.किशोर देशमुखमाजी व्यवस्थापन परिषद सदस्य कुलगुरू खमका असावा विद्यापीठ हे स्वायत्त संस्था आहे. कायद्याने विविध प्राधिकरणाला अधिकार आहे. विद्यापीठात शिक्षकेतर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची पदभरती प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. विदर्भात प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा अनुशेष असता कामा नये, अशी माझी नेहमीच भूमिका राहिली आहे. एखाद्या विषयावर वाद असू शकतात. मात्र यावर तोडगा काढण्यासाठी कुलगुरू खमका असणे आवश्यक असते.-डॉ.संजय खडक्कार माजी व्यवस्थापन परिषद सदस्य आणि कुलपतींचे प्रतिनिधी