शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

संमेलनाच्या आवश्यक खर्चाला उधळपट्टी संबोधू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 01:42 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या खर्चावरून सध्या रणकंदन माजले आहे. शेतकरी संघटनेच्या एका नेत्याने संमेलनावर शृंगारीक उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप केल्यानंतर साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. मराठी अस्मितेशी जुळलेले साहित्य संमेलन यशस्वीपणे पार पाडावे यासाठी केलेल्या आवश्यक खर्चाला उधळपट्टी संबोधणे योग्य नसल्याची टीका त्यांनी केली. उपाशी लेकरांबाबत सर्व सारखेच संवेदनशील असून यवतमाळ येथील संमेलन साधेपणानेच केले जात आहे. मात्र माहिती न घेता अवांछित आरोप करून संस्थेची जाणिवपूर्वक बदनामी करण्यात येत असल्याची टीकाही त्यांनी केली.

ठळक मुद्देश्रीपाद जोशी यांचे उत्तर : संस्थेबाबत जाणिवपूर्वक बदनामीचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या खर्चावरून सध्या रणकंदन माजले आहे. शेतकरी संघटनेच्या एका नेत्याने संमेलनावर शृंगारीक उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप केल्यानंतर साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. मराठी अस्मितेशी जुळलेले साहित्य संमेलन यशस्वीपणे पार पाडावे यासाठी केलेल्या आवश्यक खर्चाला उधळपट्टी संबोधणे योग्य नसल्याची टीका त्यांनी केली. उपाशी लेकरांबाबत सर्व सारखेच संवेदनशील असून यवतमाळ येथील संमेलन साधेपणानेच केले जात आहे. मात्र माहिती न घेता अवांछित आरोप करून संस्थेची जाणिवपूर्वक बदनामी करण्यात येत असल्याची टीकाही त्यांनी केली.संमेलनात अनावश्यक राजकारण्यांचा भरणा नसावा, कोणताही बडेजाव नसावा, संमेलन हे ऐश्वर्याचे, संपत्तीचे, प्रदर्शन करण्यासाठी नसावे व ते वाङ्मयीन दर्जा, गुणवत्ता यावर भर देत साधेपणाने व्हावे या सूचना महामंडळाने या कार्यकाळात आधीच आयोजकांना दिलेल्या आहेत व त्यांचे पालन या अगोदरच्या आयोजकांनी केले तसेच यवतमाळचेही आयोजक करीत असल्याची स्पष्टोक्ती डॉ. जोशी यांनी केली. आपली व्यथा जरूर आणि ठामपणे मांडलीच पाहिजे, पण त्यासाठी महामंडळावर पारंपरिक पद्धतीने , मुळात माहिती न घेता शृंगारासारखे अनिष्ट व तथ्यहीन आरोप करण्यात अर्थ नसल्याचा आक्षेप त्यांनी घेतला. संमेलनात महिला देखील असतात याचे भानही बाळगले जावे. बाकीचे असंवेदनशील आहेत असे गृहीत धरूनच आरोप करणे व्यापक हिताचे नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.कोणताही खर्च अवाढव्य नसून जो एवढ्या मोठ्या आयोजनासाठी आवश्यक आहे तितकाच किमान खर्च आयोजक करीत आहेत. ती शेतकरी कुटुंबातीलच मंडळी व यवतमाळ जिल्ह्यातीलच आहेत. जिल्ह्यातील इतरांप्रमाणेच ती देखील स्थानिक समस्यांबाबत तेवढीच संवेदनशील आहेत. साहित्यिकांनी मानधन, प्रवासखर्च घ्यायचा की त्यागायचा हे ज्याचे त्यानेच ठरवायचे आहे. महामंडळ ते लादू शकत नाही. संमेलन आयोजकांकडून येणारे पैसे महामंडळाच्या खात्यात जमा होत नसतात. ते संमेलन निधीच्या स्वतंत्र खात्यात जमा होतात ते महामंडळाचे नसतात. तो स्वतंत्र व कायम निधी असून त्यातून कोणताच खर्च होत नसतो. ही माहिती करून न घेता आकारण आरोपबाजी करणे अर्थहीन व बेजबाबदारपणा दर्शविणारी असल्याची टीका डॉ. जोशी यांनी केली.धनदांडग्यांनी चालविलेल्या अब्जावधींच्या बडेजावाला खासगी म्हणून समर्थन करणे म्हणजे संपत्तीच्या विषम वाटणीचे समर्थन करणे ठरत असल्याचे सांगत विशिष्ट व्यक्ती व संस्थेबद्दल आकस बाळगून हा प्रयत्न केला जात असल्याची टीका त्यांनी केली.महामंडळ अध्यक्ष बेभान : देवानंद पवारसाहित्य संमेलनावर अवास्तव उधळपट्टी होत असल्याचा आरोप करणारे शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांनी डॉ. श्रीपाद जोशी यांच्या उत्तरावर प्रत्युत्तर देत महामंडळ अध्यक्ष बेभान झाल्याची टीका केली आहे. शृंगार हा शब्द संमेलनासाठी उभारण्यात येणारा अवाढव्य सभामंडप व त्याच्या सजावटीवर, स्वागत कमानी, मोठमोठ्या हॉटेलमध्ये महागडी निवास व्यवस्था, हारतुरे आणि भोजनावळीसाठी अभिप्रेत होता. मात्र या शब्दाचा महिलांशी संबंध जोडण्याचा केविलवाणा प्रयत्न एका ज्येष्ठ साहित्यिकाकडून होत असल्याबद्दल पवार यांनी आश्चर्य व्यक्त केले. अवाढव्य खर्चाला अत्यावश्यक खर्च ठरवतांना साहित्य महामंडळ अध्यक्षांनी नेमके कोणते निकष लावले, असा सवाल त्यांनी केला. इच्छा व प्रामाणिक हेतू असेल तर कार्यक्रमाचा खर्च नक्कीच कमी करता येतो. केवळ खर्च कमी करण्याच्या सूचना देऊन जबाबदारी झटकून ते करता येणार नाही, अशी टीका त्यांनी केली. कुणाबद्दलही आकस न ठेवता शेतकरी हितासाठीच या मुद्याला हात घातला असून त्याला अविवेकी म्हणणे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. संमेलनातून स्थानिक वस्तू व सेवा पुरविणाऱ्यांना थोडा लाभ होत असला तरी त्यांची उपजीविका संमेलनावर अवलंबून नाही. संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे कमीत कमी खर्च करण्याचा व वाचलेला खर्च शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना देण्याच्या सूचना आयोजकांना देतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनYavatmalयवतमाळ