शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
3
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
4
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
5
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
6
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
7
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
8
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
9
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
10
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
11
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
12
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
13
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
14
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
15
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
16
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
17
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
18
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
19
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
20
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?

सत्तेची गुर्मी येऊ देऊ नको

By admin | Updated: May 17, 2017 02:27 IST

ज्या शेतकऱ्यांनी तुम्हाला मते दिली, सत्तेवर बसविले, त्यांना तुम्ही लाथा, शिव्या देत आहात. लक्षात घ्या,

साहित्यिक, समाजसेवक, चळवळीतील कार्यकर्त्यांचा सरकारला सल्ला : शेतकरी अपमान निषेध सभा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ज्या शेतकऱ्यांनी तुम्हाला मते दिली, सत्तेवर बसविले, त्यांना तुम्ही लाथा, शिव्या देत आहात. लक्षात घ्या, सत्तेचा माज चढू देऊ नका, नाहीतर पायउतार व्हायला वेळ लागणार नाही, असा सल्ला ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांनी दिला. दक्षिणायनतर्फे संविधान चौकात शेतकरी अपमान निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी तूर खरेदीवरून शेतकऱ्यांना ‘साले’ असा शब्दप्रयोग केला. देशाच्या पोशिंदाच्या बाबतीत असा शब्दप्रयोग करणे म्हणजे त्याचा अपमान करणे होय. दानवेंनी केलेल्या शेतकऱ्यांच्या अपमानाचा यावेळी जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी शेतकरी नेते विजय जावंधिया, माजी कुलगुरू हरिभाऊ केदार, सामाजिक कार्यकर्त्या लीलाताई चितळे, निवृत्त सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे, प्राचार्य बबनराव तायवाडे, अमिताभ पावडे, डॉ. प्रकाश तोवर, शरद निंबाळकर, रणजित मेश्राम, प्रा. प्रमोद मुनघाटे, नरेंद्र पलांदूरकर, हरीश धुरट, सुनिती देव, रमेश बोरकुटे, प्रभू राजगडकर, प्रभाकर कोन्डबत्तूनवार, बबन नाखले, डॉ. यशोदीप केदार, कौशिक वासनिक, सुजित जाधव, संजिवनी पावडे, सुभाष तुलसीता, स्नेहल वाघमारे, सुजित जाधव, मारोती वानखेडे, नितीन रोंघे, अरुण मोरघडे, संगीता महाजन, तन्हा नागपुरी, धरम पाटील, राजश्री पाटील आदी उपस्थित होते. याप्रसंगी शेतकऱ्यांच्या अपमान केल्याबद्दल शासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी बोलताना विजय जावंधिया म्हणाले की, सरकारने तूर विकत घेतली म्हणून काही उपकार केले नाही. सत्तेचा माज आल्यासारखे वागू नका, सावध व्हा, असा इशारा दिला. एकूणच शेतकऱ्यांची अवस्था व शेतकऱ्यांच्या धोरणावर अमिताभ पावडे म्हणाले की, घरची करते देवा देवा, बाहेरचीला चोळी शिवा असे सरकारचे झाले आहे. लीलाताई चितळे म्हणाल्या की अन्नदाता आत्महत्या करतो आहे, अशावेळी त्यांची परिस्थिती सुधारायला हवी. पंतप्रधानांनी स्वत: लक्ष घालावे, परदेशी दौरे थांबावावे. शेतकऱ्यांचा अपमान होईल, असे वक्तव्य करू नका, हा प्रकार ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ आहे. शरद निंबाळकर म्हणाले की दानवेच्या रूपात सरकारचा हा उन्माद बोलतोय. बबनराव तायवाडे म्हणाले की शेतकऱ्यांबद्दल असे अपशब्द भाजपाच्या संस्कृतीला शोभत नाही. हरिभाऊ केदार यांनी या सभेला शोकसभा संबोधून, दानवेच्या मगरुरीचा निषेध केला. दानवेंचे उद्गार शेतकऱ्यांबरोबर कामगार व मजूरांच्या विरोधात आहे. तन्हा नागपुरी यांनी सत्ता की नशे में, भाजपा अपनी हालात भूल चूकी है... असा टोमणा हाणला. सभेचे संचालन अरुणा सबाने यांनी केले.