शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

पाणी पिताय ना; मग काळजी घ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:12 IST

नागपूर : पावसाळ्यात होणारे सर्वाधिक आजार हे दूषित पाण्यामुळे होतात. त्यामुळे पावसाळ्यात आरोग्य टिकवून ठेवायचे असेल तर पाणी पिताना ...

नागपूर : पावसाळ्यात होणारे सर्वाधिक आजार हे दूषित पाण्यामुळे होतात. त्यामुळे पावसाळ्यात आरोग्य टिकवून ठेवायचे असेल तर पाणी पिताना काळजी घेतलेलीच बरी.

- दूषित पाण्यामुळे होणारे आजार

उलटी, टायफाईड, कॉलरा, गॅस्ट्रो, व्हायरल, इन्फेक्शन, काविळ

- अशा प्रकारे घ्यावी काळजी

पाण्याची भांडी दररोज स्वच्छ धुवून त्यात पाणी भरावे.

पिण्याचे पाणी हे नेहमी गाळून व उकळून प्यावे.

पाण्यामध्ये मेडिक्लोरचे काही थेंब टाकावे.

बाहेरील पाणीपुरी, भेळ अथवा इतर पदार्थ खाणे टाळावे.

नागरिकांनी पावसाळ्यात एवढी खबरदारी घेतल्यास अनेक आजार दूर राहू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

- आजारांची लक्षणे

१) गॅस्ट्रो या आजारात रुग्णाला उलटी, जुलाब होतात. दूषित पाणी पिल्यानंतर चार ते पाच तासात ही लक्षणे दिसू लागतात.

२) टायफाईड दूषित पाण्यामुळे होतो. रुग्णाला ताप येतो. पोटात दुखते, उपचार न घेतल्यास जंतू रक्तात मिसळतात.

३) उलट्या, ताप, लघवी पिवळी होणे, भूक न लागणे ही काविळची लक्षणे आहेत. डोळे पिवळे दिसायला लागतात. महिना ते दीड महिना आजाराची लक्षणे कायम राहतात.

- नागपूरला प्रतिव्यक्ती मिळते दीडशे लिटर पाणी

नागपूर शहरातील २७ लाख लोकसंख्येला दररोज ६५० एमएलडी पाणी पुरवठा केला जातो. पाणी पुरवठ्याच्या मानकानुसार प्रति व्यक्तीला दररोज १५० लिटर पाणी महापालिका देते. नागपूर शहराला पेंच व कन्हान प्रकल्पातून पाणी पुरवठा होतो.