शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
3
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
4
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
5
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
6
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
7
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
8
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
9
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
10
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
11
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
12
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
13
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
14
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
15
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
16
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
17
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
18
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
19
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
20
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश

चर्चा नको, उपाय शोधा

By admin | Updated: December 18, 2015 03:15 IST

आज समाजात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या समस्यांवर विविध पातळ्यांवर मोठ्या प्रमाणात चर्चा करण्यात येतात.

भय्याजी जोशी यांची मंत्री-आमदारांना सूचना : शेतकऱ्यांवरील संकट ओळखा, वेळीच सावरायोगेश पांडे नागपूरआज समाजात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या समस्यांवर विविध पातळ्यांवर मोठ्या प्रमाणात चर्चा करण्यात येतात. परंतु चर्चांमध्ये वेळ घालविण्याऐवजी त्याचा उपाय व समाधान शोधणारी मंडळी संघाला उभी करायची आहेत. त्यामुळे समस्या सोडविण्यावर जास्त भर देण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी व्यक्त केले. विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानीत आलेले भाजपचे आमदार व मंत्र्यांनी गुरुवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग स्थित स्मृतिमंदिर परिसरास भेट दिली. यावेळी जोशी यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.आज राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. यामागची मूळ कारणे शोधण्याची आवश्यकता आहे. रासायनिक खतांमुळे जमिनीची सुपिकता कमी होत आहे. परंतु अनेक ठिकाणी या खतांची मात्रा वाढविण्यात येत आहे. सध्या स्थिती चांगली नसली तरी सावरण्यासाठी वेळ आहे. जर वेळीच शेतकऱ्यांना सावरण्यात आले नाही तर शेती संपायला वेळ लागणार नाही, असे परखड मत जोशी यांनी व्यक्त केले. पारंपरिक व जैविक पद्धतीच्या प्रयोगांना प्रोत्साहन द्यायला हवे. शिवाय गोपालनामुळेदेखील शेतकऱ्यांना खत मिळू शकते. आमदारांना बौद्धिकचर्चा नको, उपाय शोधानागपूर : नागपूर : एका गायीपासून पाच एकर शेतीला खत मिळणे शक्य आहे. त्यादृष्टीने प्रयत्न हवेत, असा सल्ला देत असताना गोहत्या बंदीच्या निर्णयाचे भय्याजी जोशी यांनी कौतुकदेखील केले. यावेळी त्यांनी उपस्थित आमदारांना संघविचारांशीदेखील अवगत करून दिले. तसेच प्रश्न विचारण्याचीदेखील संधी दिली.