शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

नासुप्र जलतरण कक्ष बंद करू नका

By admin | Updated: September 28, 2015 03:25 IST

अंबाझरी मार्गावरील सर्वसामान्यांना माफक दरात उपलब्ध होणारा जलतरण कक्ष विकास कामाच्या नावाखाली येत्या १ आॅक्टोबरपासून सहा महिन्यांसाठी बंद करण्यात येत आहे.

मुख्यमंत्र्यांना निवेदन : अनिस अहमद यांनी वेधले लक्षनागपूर : अंबाझरी मार्गावरील सर्वसामान्यांना माफक दरात उपलब्ध होणारा जलतरण कक्ष विकास कामाच्या नावाखाली येत्या १ आॅक्टोबरपासून सहा महिन्यांसाठी बंद करण्यात येत आहे. हा पूल पुन्हा केव्हा सुरू होईल, याचा नेम नाही.गरीब आणि मध्यमवर्गीय जलतरणपटूंना आधार असलेला हा पूल ऐन स्पर्धांच्या दिवसांत बंद पाडू नये, अशा आशायाचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नुकतेच देण्यात आले. माजी मंत्री आणि पट्टीचे जलतरणपटू डॉ. अनिस अहमद यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन खेळाडूंना होणाऱ्या संभाव्य त्रासाबद्दल त्यांचे लक्ष वेधले. अहमद यांनी नागपूर शहरातील पूर्वीचे जलतरण तलाव मोडित निघाल्याचे निदर्शनास आणून नवे जलतरण कक्ष निर्माण करण्याची कुठलीही व्यवस्था झाली नसल्याचे सांगितले. शहराशिवाय काटोल, कळमेश्वर, उमरेड, कामठी अशा ठिकाणांहून जलतरणपटू आणि पालक अंबाझरी कक्षावर येतात. येथे स्थानिकपासून राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांचे आयोजन होत असते. सध्या शालेय, महाविद्यालयीन आणि संघटनेद्वारा आयोजित होणाऱ्या जलतरण स्पर्धांचा हंगाम आहे. पण कक्ष बंद होणार असल्याने सरावास मुकण्याची वेळ येईल. त्यामुळे हा पूल बंद करू नये, अशी विनंती केली.रातुम नागपूर विद्यापीठाकडे स्वत:चा जलतरण कक्ष नाही. विद्यापीठाकडे जलतरण कक्ष असावा यासाठी शासनाने निधी मंजूर करण्याची तसेच मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलतरण कक्षाची उभारणी करण्यासाठी आवश्यक तो निधी लवकर मंजूर करण्याची विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली. मुख्यमंत्र्यांनी अनिस अहमद यांच्या सूचना लक्षात घेत आवश्यक पावले उचलण्याचे आश्वासन दिले.(क्रीडा प्रतिनिधी)