शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

कुठल्याही समाजाविरोधात शत्रूत्व बाळगू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 18:53 IST

काही लोकांच्या चुकीमुळे संपूर्ण समाजाला दोषी मानून त्यापासून अंतर ठेवणे अयोग्य आहे. कुठल्याही समाजाविरोधात द्वेष किंवा शत्रूत्व बाळगू नका, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले आहे.

ठळक मुद्दे'कोरोना'नंतर विकासाच्या नवीन 'मॉडेल'ची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाशी संपूर्ण देश सामना करत असताना काही भडकविणारे लोक काही समूहात क्रोध व भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातून अतिवादी कृत्य होत आहेत. मात्र काही लोकांच्या चुकीमुळे संपूर्ण समाजाला दोषी मानून त्यापासून अंतर ठेवणे अयोग्य आहे. कुठल्याही समाजाविरोधात द्वेष किंवा शत्रूत्व बाळगू नका, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले आहे. कुठल्याही समाजाचे नाव न घेता त्यांनी हे सूचक वक्तव्य केले आहे. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने त्यांनी रविवारी ऑनलाईन बौद्धिकातून आपली भूमिका मांडलीकोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी शिस्तीचे पालन अत्यावश्यक आहे. देशातील काही भागात शिस्तपालनाची सवयच नसल्याने तेथे अद्याप स्थिती नियंत्रणात आलेली नाही. कोरोनाविरोधातील लढ्यात भारताचे काम चांगले होत आहे. शासन व प्रशासनाने तत्परतापूर्वक उपाययोजना लागू केल्या. समाजानेदेखील त्याचे पालन केले. आणखी काही काळ सर्वांनीच सकारात्मकपणे सहकार्य करावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भडकविणाऱ्या लोकांच्या बोलण्यात न फसता भय व क्रोध दूर ठेवून एकत्रितपणे कार्य करावे. समाजात सद्भाव व शांतीचे वातवारण बनवावे, असे डॉ. भागवत म्हणाले. संघ स्वयंसेवक व समाजातील दात्यांनी कुठलाही भेदभाव न बाळगता प्रत्येक गरजूला मदत करावी, असे आवाहनदेखील त्यांनी केले.संकटातून संधी शोधा, स्वदेशीवर भर द्याकोरोनाचे संकट सरल्यानंतर स्थिती बदललेली असेल. अनेक जण ग्रामीण भागात परतले आहेत. त्यांच्या रोजगारासाठीदेखील व्यवस्था करावी लागेल. हे संकट असले तरी यातून संधी शोधण्याची गरज आहे. विकासाचे नवीन मॉडेल शासनाला निर्माण करावे लागेल. विशेष म्हणजे स्वावलंबी होण्यासाठी स्वदेशीवरच भर द्यावा लागेल. त्यामुळे देशातच दर्जेदार उत्पादने तयार व्हावीत, यादृष्टीने नियोजन करण्याची गरज आहे. या संकटातून नवीन भारत घडवू शकतो, असे मत डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.पालघरप्रकरणी पोलिसांनी आपले काम करावेपालघर येथे संतांची झालेली हत्या ही दुर्दैवी बाब आहे. दोघेही संन्यासी धर्माचे आचरण करणारे होते. कायद्याला हातात घेणे कितपत योग्य आहे व पोलिसांनी काय करायला हवे, यावर विचार व्हायला हवा. पोलिसांनी याप्रकरणात आपले काम करावे. २८ तारखेला हिंदू धर्म आचार्य सभेने त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आवाहन केले आहे. त्याचे आम्ही पण पालन करू, असे सरसंघचालकांनी सांगितले.प्रसिद्धीसाठी काम नकोलॉकडाऊन असले तरी संघ स्वयंसेवकांचे समाजात काम सुरू आहे. समाजानेदेखील गरजूंच्या मदतीसाठी तत्परतेने पुढाकार घ्यायला हवा. गरजूंची मदत करत असताना प्रसिद्धीसाठी कुठलेही काम करू नका. समाज व देश आपला आहे, या विचारातून स्वत:च्या आरोग्याचीदेखील काळजी घेऊन काम करा, असे सरसंघचालकांनी सांगितले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतAkshaya Tritiyaअक्षय तृतीया