शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
2
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
3
टाटा सन्समध्ये पदावरुन वाद वाढला; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांनी घेतली अमित शाहंची भेट, सरकारचं म्हणणं काय?
4
पुतिन यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचा फोन, काय बोलणं झालं?
5
सोन्या-चांदीला टक्कर! 'या' मौल्यवान धातूच्या किमतीत ७०% ची मोठी वाढ; दागिन्यातही होतो वापर
6
रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य
7
पुणे हादरलं! 'माझ्या आईला का मारलं?', घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला
8
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या चढ-उतारासह उघडले या कंपन्यांचे शेअर्स
9
आरबीआयनं महाराष्ट्रातील या सहकारी बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांना आपल्याच खात्यातून पैसे काढता येणार नाही
10
"त्याने दुसऱ्या महिन्यातच धोका दिला", अखेर धनश्रीच्या आरोपांवर युजवेंद्र चहलने सोडलं मौन, म्हणाला- "जर मी चीट केलं असतं..."
11
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
12
Video: १२० ग्रॅम सोने, १८ लाख देऊन युवकानं केलं घटस्फोटाचं सेलिब्रेशन; दुधानं केली आंघोळ, मग...
13
थरार! आरटीओला घाबरुन ट्रक पळवला, धडक झाली अन् २०० सिलेंडरांचा स्फोट झाला!
14
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
15
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
16
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
17
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
18
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
19
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश

कुठल्याही समाजाविरोधात शत्रूत्व बाळगू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 18:53 IST

काही लोकांच्या चुकीमुळे संपूर्ण समाजाला दोषी मानून त्यापासून अंतर ठेवणे अयोग्य आहे. कुठल्याही समाजाविरोधात द्वेष किंवा शत्रूत्व बाळगू नका, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले आहे.

ठळक मुद्दे'कोरोना'नंतर विकासाच्या नवीन 'मॉडेल'ची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाशी संपूर्ण देश सामना करत असताना काही भडकविणारे लोक काही समूहात क्रोध व भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातून अतिवादी कृत्य होत आहेत. मात्र काही लोकांच्या चुकीमुळे संपूर्ण समाजाला दोषी मानून त्यापासून अंतर ठेवणे अयोग्य आहे. कुठल्याही समाजाविरोधात द्वेष किंवा शत्रूत्व बाळगू नका, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले आहे. कुठल्याही समाजाचे नाव न घेता त्यांनी हे सूचक वक्तव्य केले आहे. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने त्यांनी रविवारी ऑनलाईन बौद्धिकातून आपली भूमिका मांडलीकोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी शिस्तीचे पालन अत्यावश्यक आहे. देशातील काही भागात शिस्तपालनाची सवयच नसल्याने तेथे अद्याप स्थिती नियंत्रणात आलेली नाही. कोरोनाविरोधातील लढ्यात भारताचे काम चांगले होत आहे. शासन व प्रशासनाने तत्परतापूर्वक उपाययोजना लागू केल्या. समाजानेदेखील त्याचे पालन केले. आणखी काही काळ सर्वांनीच सकारात्मकपणे सहकार्य करावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भडकविणाऱ्या लोकांच्या बोलण्यात न फसता भय व क्रोध दूर ठेवून एकत्रितपणे कार्य करावे. समाजात सद्भाव व शांतीचे वातवारण बनवावे, असे डॉ. भागवत म्हणाले. संघ स्वयंसेवक व समाजातील दात्यांनी कुठलाही भेदभाव न बाळगता प्रत्येक गरजूला मदत करावी, असे आवाहनदेखील त्यांनी केले.संकटातून संधी शोधा, स्वदेशीवर भर द्याकोरोनाचे संकट सरल्यानंतर स्थिती बदललेली असेल. अनेक जण ग्रामीण भागात परतले आहेत. त्यांच्या रोजगारासाठीदेखील व्यवस्था करावी लागेल. हे संकट असले तरी यातून संधी शोधण्याची गरज आहे. विकासाचे नवीन मॉडेल शासनाला निर्माण करावे लागेल. विशेष म्हणजे स्वावलंबी होण्यासाठी स्वदेशीवरच भर द्यावा लागेल. त्यामुळे देशातच दर्जेदार उत्पादने तयार व्हावीत, यादृष्टीने नियोजन करण्याची गरज आहे. या संकटातून नवीन भारत घडवू शकतो, असे मत डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.पालघरप्रकरणी पोलिसांनी आपले काम करावेपालघर येथे संतांची झालेली हत्या ही दुर्दैवी बाब आहे. दोघेही संन्यासी धर्माचे आचरण करणारे होते. कायद्याला हातात घेणे कितपत योग्य आहे व पोलिसांनी काय करायला हवे, यावर विचार व्हायला हवा. पोलिसांनी याप्रकरणात आपले काम करावे. २८ तारखेला हिंदू धर्म आचार्य सभेने त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आवाहन केले आहे. त्याचे आम्ही पण पालन करू, असे सरसंघचालकांनी सांगितले.प्रसिद्धीसाठी काम नकोलॉकडाऊन असले तरी संघ स्वयंसेवकांचे समाजात काम सुरू आहे. समाजानेदेखील गरजूंच्या मदतीसाठी तत्परतेने पुढाकार घ्यायला हवा. गरजूंची मदत करत असताना प्रसिद्धीसाठी कुठलेही काम करू नका. समाज व देश आपला आहे, या विचारातून स्वत:च्या आरोग्याचीदेखील काळजी घेऊन काम करा, असे सरसंघचालकांनी सांगितले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतAkshaya Tritiyaअक्षय तृतीया