शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
3
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
4
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
5
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
7
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
8
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
9
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
10
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
11
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
12
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
13
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
14
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
15
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
18
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
19
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
20
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?

कुठल्याही समाजाविरोधात शत्रूत्व बाळगू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 18:53 IST

काही लोकांच्या चुकीमुळे संपूर्ण समाजाला दोषी मानून त्यापासून अंतर ठेवणे अयोग्य आहे. कुठल्याही समाजाविरोधात द्वेष किंवा शत्रूत्व बाळगू नका, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले आहे.

ठळक मुद्दे'कोरोना'नंतर विकासाच्या नवीन 'मॉडेल'ची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाशी संपूर्ण देश सामना करत असताना काही भडकविणारे लोक काही समूहात क्रोध व भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातून अतिवादी कृत्य होत आहेत. मात्र काही लोकांच्या चुकीमुळे संपूर्ण समाजाला दोषी मानून त्यापासून अंतर ठेवणे अयोग्य आहे. कुठल्याही समाजाविरोधात द्वेष किंवा शत्रूत्व बाळगू नका, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले आहे. कुठल्याही समाजाचे नाव न घेता त्यांनी हे सूचक वक्तव्य केले आहे. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने त्यांनी रविवारी ऑनलाईन बौद्धिकातून आपली भूमिका मांडलीकोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी शिस्तीचे पालन अत्यावश्यक आहे. देशातील काही भागात शिस्तपालनाची सवयच नसल्याने तेथे अद्याप स्थिती नियंत्रणात आलेली नाही. कोरोनाविरोधातील लढ्यात भारताचे काम चांगले होत आहे. शासन व प्रशासनाने तत्परतापूर्वक उपाययोजना लागू केल्या. समाजानेदेखील त्याचे पालन केले. आणखी काही काळ सर्वांनीच सकारात्मकपणे सहकार्य करावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भडकविणाऱ्या लोकांच्या बोलण्यात न फसता भय व क्रोध दूर ठेवून एकत्रितपणे कार्य करावे. समाजात सद्भाव व शांतीचे वातवारण बनवावे, असे डॉ. भागवत म्हणाले. संघ स्वयंसेवक व समाजातील दात्यांनी कुठलाही भेदभाव न बाळगता प्रत्येक गरजूला मदत करावी, असे आवाहनदेखील त्यांनी केले.संकटातून संधी शोधा, स्वदेशीवर भर द्याकोरोनाचे संकट सरल्यानंतर स्थिती बदललेली असेल. अनेक जण ग्रामीण भागात परतले आहेत. त्यांच्या रोजगारासाठीदेखील व्यवस्था करावी लागेल. हे संकट असले तरी यातून संधी शोधण्याची गरज आहे. विकासाचे नवीन मॉडेल शासनाला निर्माण करावे लागेल. विशेष म्हणजे स्वावलंबी होण्यासाठी स्वदेशीवरच भर द्यावा लागेल. त्यामुळे देशातच दर्जेदार उत्पादने तयार व्हावीत, यादृष्टीने नियोजन करण्याची गरज आहे. या संकटातून नवीन भारत घडवू शकतो, असे मत डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.पालघरप्रकरणी पोलिसांनी आपले काम करावेपालघर येथे संतांची झालेली हत्या ही दुर्दैवी बाब आहे. दोघेही संन्यासी धर्माचे आचरण करणारे होते. कायद्याला हातात घेणे कितपत योग्य आहे व पोलिसांनी काय करायला हवे, यावर विचार व्हायला हवा. पोलिसांनी याप्रकरणात आपले काम करावे. २८ तारखेला हिंदू धर्म आचार्य सभेने त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आवाहन केले आहे. त्याचे आम्ही पण पालन करू, असे सरसंघचालकांनी सांगितले.प्रसिद्धीसाठी काम नकोलॉकडाऊन असले तरी संघ स्वयंसेवकांचे समाजात काम सुरू आहे. समाजानेदेखील गरजूंच्या मदतीसाठी तत्परतेने पुढाकार घ्यायला हवा. गरजूंची मदत करत असताना प्रसिद्धीसाठी कुठलेही काम करू नका. समाज व देश आपला आहे, या विचारातून स्वत:च्या आरोग्याचीदेखील काळजी घेऊन काम करा, असे सरसंघचालकांनी सांगितले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतAkshaya Tritiyaअक्षय तृतीया