शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

करा तिरंग्याचा सन्मान, राखा शहिदांचा मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 01:01 IST

जगात दोन तऱ्हेचे लोक असतात. समाजात ज्या गोष्टी घडत आहेत, त्यांना निमूटपणे पाहत आयुष्य जगणारे आणि दुसरे म्हणजे समाजात स्वत:च्या कृतीने प्रबोधन करुन नवा आदर्श प्रस्थापित करणारे. नागपुरातील हितेश डोर्लीकर हा तरुण हा याच दुसऱ्या गटात मोडणारा आहे. मागील आठ वर्षांपासून सातत्याने तो राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक असलेल्या तिरंग्याच्या सन्मानासाठी झटत आहे. स्वातंत्र्यदिवस व गणतंत्रदिवस या राष्ट्रीय सणांच्या दिवशी त्याच्या पुढाकारातून जमिनीवर पडलेले कागदी व प्लास्टिकचे झेंडे गोळा करणे व नागरिकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करुन देण्याची मोहीम त्याच्या नेतृत्वात राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे अवघ्या दोघांपासून सुरू झालेल्या या मोहिमेत आता २५ हून अधिक तरुण-तरुणी जुळले आहेत.

ठळक मुद्देहितेश डोर्लीकरची अनोखी साधना : रस्त्यावर पडलेले कागदी झेंडे उचलण्याची राबवतोय मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जगात दोन तऱ्हेचे लोक असतात. समाजात ज्या गोष्टी घडत आहेत, त्यांना निमूटपणे पाहत आयुष्य जगणारे आणि दुसरे म्हणजे समाजात स्वत:च्या कृतीने प्रबोधन करुन नवा आदर्श प्रस्थापित करणारे. नागपुरातील हितेश डोर्लीकर हा तरुण हा याच दुसऱ्या गटात मोडणारा आहे. मागील आठ वर्षांपासून सातत्याने तो राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक असलेल्या तिरंग्याच्या सन्मानासाठी झटत आहे. स्वातंत्र्यदिवस व गणतंत्रदिवस या राष्ट्रीय सणांच्या दिवशी त्याच्या पुढाकारातून जमिनीवर पडलेले कागदी व प्लास्टिकचे झेंडे गोळा करणे व नागरिकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करुन देण्याची मोहीम त्याच्या नेतृत्वात राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे अवघ्या दोघांपासून सुरू झालेल्या या मोहिमेत आता २५ हून अधिक तरुण-तरुणी जुळले आहेत.स्वातंत्र्यदिन किंवा गणतंत्रदिन आला की देशभरात देशभक्तीचे वारे वाहू लागतात. विविध संघटनांकडून हे राष्ट्रीय सण धूमधडाक्यात साजरे करण्यात येतात. मात्र स्वातंत्र्यदिनी जागोजागी तिरंग्याचा सार्वजनिकपणे अपमान होताना दिसतो. गाड्यांवर लावण्यासाठी, मोटारसायकल रॅलीवर मिरविण्यासाठी तिरंगे उत्साहाने घेतले जातात. मात्र अतिउत्साहात तिरंग्याचा अपमान होत असल्याची जाणदेखील राहत नाही. भरधाव वेगाने मोटारसायकल दामटत असताना तिरंगा कधी रस्त्यावर पडतो हे कळतदेखील नाही. विशेष म्हणजे रस्त्यावर तिरंगा पडलेला दिसला तरी त्याला उचलण्याची तसदी फारच कमी नागरिक घेतात.२०१० साली घराजवळच तिरंगा चुरगळल्या अवस्थेत पडलेला पाहून हितेशने मनाशी संकल्प केला आणि त्यानंतर त्याने स्वत: पासूनच एका नव्या मोहिमेची सुरुवात केली. स्वातंत्र्यदिवस व गणतंत्रदिवसानंतर चौकाचौकांमध्ये, रस्त्यांवर पडलेले, अनवधानाने फाटलेले किंवा चुरगळल्या गेलेले कागदी झेंडे गोळा करण्यास त्याने सुरुवात केली. ‘कामयाब फाऊंडेशन’, ‘हर दिन होंगे कामयाब’ आणि ‘नाग स्वराज फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून तरुण त्याच्याशी जुळत गेले. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील नागपूर शहरातील उद्याने, शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणावरील पडलेले, फाटलेले, कुजलेले कागदी व प्लास्टिकचे ध्वज कार्यकर्ते गोळा करतील. सोबतच नागरिकांना तिरंग्याचा सन्मान राखण्याचे आवाहन करीत जनप्रबोधनदेखील करण्यात येईल.तिरंग्यासाठी केलेल्या बलिदानाची आठवण ठेवारस्त्यावर जीर्ण झालेले, फाटलेले कागदी झेंडे पाहून मन विचलित होते. या अस्वस्थेतूनच मी ही मोहीम सुरू केली. ज्या तिरंग्याला घडविण्यासाठी, त्याला उंच करण्यासाठी अगणित स्वातंत्र्यसैनिक, सैन्याचे जवान यांनी भर तरुणाईत स्वत:च्या जीवाचे बलिदान दिले, त्याची आठवण नवीन पिढीने ठेवण्याची गरज आहे, अशी भावना हितेशने व्यक्त केली.

टॅग्स :National Flagराष्ट्रध्वजIndependence Dayस्वातंत्र्य दिवस