शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

परदेशी विद्यापीठे महाराष्ट्राकडून अधिक पैसा घेतात का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 11:23 IST

Nagpur News परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या मात्र राज्यापेक्षा कितीतरी अधिक आहे. त्यामुळे परदेशी विद्यापीठे राज्य शासनाकडून अधिक पैसा घेतात की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देकेंद्राचा खर्च कमी लाभार्थी अधिकराज्याचा खर्च अधिक लाभार्थी कमी

आनंद डेकाटे

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन स्वतंत्रपणे परदेशी शिष्यवृत्ती प्रदान करते. या शिष्यवृत्तीवर राज्य सरकार जितका निधी दरवर्षी खर्च करते त्याच्या तुलनेत केंद्र सरकारचा खर्च कमी आहे. परंतु परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या मात्र राज्यापेक्षा कितीतरी अधिक आहे. त्यामुळे परदेशी विद्यापीठे राज्य शासनाकडून अधिक पैसा घेतात की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील मुलामुलींना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना प्रदान केली जाते. दरवर्षी ७५ विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो. मागील पाच वर्षाचा विचार केला तर राज्य सरकारने परदेशात शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थ्यांवर दरवर्षी २२ ते ३५ कोटी रुपये खर्च केले आहे.

केंद्र सरकारतर्फेसुद्धा परदेशी शिक्षणासाठी आदिवासी व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. केंद्र सरकार दरवर्षी १०० विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी पाठवते. मागील पाच वर्षाचा विचार केला तर केंद्र सरकारने या १०० विद्यार्थ्यांवर साडेचार कोटी ते २८ कोटी रुपयापर्यंत दरवर्षी खर्च केले. त्यामुळे केंद्राला जे शक्य झाले ते राज्य सरकारला शक्य नाही का, असा प्रश्न आहे.

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र