शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सैनिक शाळेतील २५ मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शाळा साेडावी लागणार?

By निशांत वानखेडे | Updated: July 9, 2023 18:37 IST

शासनाच्या जीआरपूर्वी समाज कल्याण विभागाने दिले प्रवेश, ५५ लाखाची शिष्यवृत्ती रखडली

निशांत वानखेडे, नागपूर: चंद्रपूर येथील शासकीय सैनिकी शाळेत शिकणाऱ्या २५ मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर शाळा साेडण्याचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने स्वत:च घेतलेल्या निर्णयाची जीआर काढून अंमलबजावणी केली नसल्याने चार वर्षापासून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मिळाली नाही. परिणामी शाळेने शिक्षण शुल्क भरा अथवा शाळा साेडा, असा आदेश दिला आहे. ऐन नववी-दहावीच्या वर्षात या विद्यार्थ्यांना शाळा साेडावी लागण्याची भीती आहे.

चंद्रपूर येथे शासकीय सैनिकी शाळा सेना व संरक्षण क्षेत्रात जाण्यासाठी महत्त्वाची संस्था आहे. सध्या या संस्थेची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या संस्थेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती याेजना सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाने २०१९ साली घेतला हाेता. मात्र या निर्णयाबाबत कुठलेही परिपत्रक काढून अंमलबजावणी शासनाने केली नाही.

दरम्यान शासनाचा निर्णय झाल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयाने अनुसूचित जातीच्या शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्याचे व शिक्षण शुल्क न आकारण्याचे निर्देश सैनिकी शाळेला दिले हाेते. शासन स्तरावरून शासन निर्णय निर्गमित करण्याची कारवाई सुरू असून तसे परिपत्रक प्राप्त हाेताच शिष्यवृत्ती अदा करण्यात येईल, असे निर्देशित पत्रात नमूद करण्यात आले. या पत्राच्या आधारे अनुसूचित जातीच्या २५ विद्यार्थ्यांना ईयत्ता पाचवीपासून प्रवेश देण्यात आला. यंदा या विद्यार्थ्यांनी आठवी उत्तीर्ण करून ईयत्ता नववीत प्रवेश केला हाेता. मात्र चार वर्षे लाेटूनही शासनाने निर्णयाचा जीआर काढलाच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली असून त्यांचे पुढचे शिक्षण अडचणीत आले आहे.

थकित ५५ लाख द्या, अन्यथा...

तीन वर्षापासून या २५ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे ५५ लाख १५ हजार ४६ रुपये सामाजिक न्याय विभागाकडे थकित आहेत. ही थकित रक्कम त्वरीत भरा अन्यथा या विद्यार्थ्यांना शाळेतून निलंबित करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा सैनिक शाळेने सामाजिक न्याय विभागाला दिला आहे.

राज्य शासनाचा असा दुर्लक्षितपणा व सामाजिक न्याय विभागाच्या बेजबाबदार कारभारामुळे विद्यार्थ्यांचे भविष्यच संकटात सापडले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने परिपत्रक काढून शिष्यवृत्तीची थकित रक्कम भरावी, जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेणार नाही. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. - डाॅ. सिद्धांत भरणे, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल स्टूडंट फेडरेशन

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर