शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

नवजात गोंडस मुलीमुळे घटस्फोट घेतलेले दांपत्य पुन्हा एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2021 08:00 IST

Nagpur News एक दाम्पत्य भांडण विकोपाला गेल्यानंतर सहमतीने घटस्फोट घेऊन विभक्त झाले होते. दरम्यान, पत्नीने गोंडस मुलीला जन्म देताच या दाम्पत्यामधील ताणलेले संबंध हळूहळू सैल होत गेले आणि त्यांनी जुने सर्व वाद विसरून पुनर्विवाह केला.

ठळक मुद्देजुने सर्व वाद विसरले संसाराची घडी नीट केली

राकेश घानोडेनागपूर : आयुष्य केव्हा कोणते वळण घेईल, हे कुणीही सांगू शकत नाही. एक दाम्पत्य भांडण विकोपाला गेल्यानंतर सहमतीने घटस्फोट घेऊन विभक्त झाले होते. त्यावेळी पत्नी गर्भवती होती. दरम्यान, पत्नीने गोंडस मुलीला जन्म देताच या दाम्पत्यामधील ताणलेले संबंध हळूहळू सैल होत गेले आणि त्यांनी जुने सर्व वाद विसरून पुनर्विवाह केला. (Divorced couples reunite because of a newborn cute girl)प्रकरणातील पती-पत्नी अभियंते असून, ते दोघेही तोडीस तोड असल्यामुळे त्यांच्यामध्ये विविध कारणांवरून वाद व्हायचे. पतीने वारंवार पार्ट्या करणे, मित्रांसोबत रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहणे, दारू पिणे इत्यादी गोष्टी पत्नीला आवडत नव्हत्या, तर पत्नीचे सोशल मीडियावर सतत सक्रिय राहणे, माहेरी तासनतास फोनवर बोलणे, घराच्या देखभालीकडे दुर्लक्ष करणे इत्यादी गोष्टी पतीला पटत नव्हत्या. कुटुंबात दोघेच असल्यामुळे त्यांना समजावण्यासाठी तिसरे कोणीच राहत नसे.  परिणामी, दोघेही माघार घेत नव्हते.

त्यातून त्यांचे भावनिक बंध हळूहळू तुटायला सुरुवात झाली. लग्नानंतर आनंदात सुरू झालेला संसार दोन वर्षांतच विस्कटला. प्रेमाची जागा अहंकाराने घेतली. शेवटी एकमेकांसोबत पटतच नाही तर, एकत्र राहायचे कशाकरिता, असा प्रश्न त्यांना सतवायला लागला आणि त्यांनी सहमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी पत्नी गर्भवती होती; पण डोळ्यांवर मी पणाची पट्टी असल्यामुळे दोघांपैकी कुणीही याचा विचार केला नाही. ते घटस्फोट घेऊन वेगळे झाले; परंतु मुलीच्या जन्माने त्यांच्या आयुष्यातील प्रेमाचा ओलावा पुन्हा जिवंत केला. ती मुलगी त्यांच्यामधील प्रेमाचा पुरावा होती. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकत्र येऊन विस्कटलेली संसाराची घडी पुन्हा बसविली अन् नवीन प्रवासाला सुरुवात केली.प्रेमाची जाणीव गरजेचीपती-पत्नीमध्ये वाद होण्यात काहीच नवीन नाही; परंतु वाद वाढत असल्यास त्यांना एकमेकांवरील प्रेमाची जाणीव करून देणे गरजेचे असते. या प्रकरणात विभक्त दाम्पत्याच्या गोंडस मुलीने हेच केले. समीर सोनवणे, पत्नीचे वकील

 

टॅग्स :Courtन्यायालय