शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

जि.प.अध्यक्षा सावरकर अडचणीत !

By admin | Updated: September 22, 2016 02:52 IST

जिल्हाधिकारी कार्यालयाने जि.प. अध्यक्ष व त्यांच्या पतींना संपत्तीचे खोटे विवरण सादर केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली कारणे दाखवा नोटीस : निवडणूक शपथपत्रात संपत्ती लपविल्याचा प्रकार नागपूर : जिल्हाधिकारी कार्यालयाने जि.प. अध्यक्ष व त्यांच्या पतींना संपत्तीचे खोटे विवरण सादर केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यावर सात दिवसात उत्तर मागितले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी निवडणूक कार्यालयात झालेल्या सुनावणीत हा खुलासा झाल्याची माहिती माहिती जि.प.चे माजी उपाध्यक्ष तापेश्वर वैद्य यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या निवडणुका २०१२ साली झाल्या होत्या. या निवडणुकीत निशा सावरकर यांनी धानला सर्कल व त्यांचे पती टेकचंद सावरकर यांनी खात रेवरार सर्कलमधून निवडणूक लढविली होती. त्यांनी नामनिर्देशन पत्रात संपत्तीचे खोटे विवरण सादर केले होते. पती-पत्नी शपथपत्रात तफावत आढळली होती. यासंदर्भात पराभूत उमेदवार योगिता हटवार यांनी निशा सावरकर यांनी खोटे शपथपत्र सादर केल्याबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. आयोगाने २९ डिसेंबर २०१२ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश दिले होते. त्यावर जिल्हाधिकाऱ्याने मौदा तहसिलदाराला चौकशी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तहसिलदाराने ४ फेब्रुवारी २०१३ ला चौकशी अहवाल सादर केला होता. तहसिलदाराच्या अहवालाद्वारे संपत्तीचे खोटे विवरण दिल्याचे सिद्ध झाले होते. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावेळी कारवाई न करता ११ आॅगस्ट २०१४ ला आयोगाला मार्गदर्शनासाठी पत्र पाठविले. त्यावर आयोगाने १५ सप्टेंबर २०१४ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना तुमच्या पातळीवर कारवाई करण्याचे पत्र दिले होते. त्यानंतरही कारवाई झाली नाही. कारवाईत होत असलेली टाळाटाळ लक्षात घेता, माजी उपाध्यक्ष तापेश्वर वैद्य यांनी माहितीच्या अधिकारात या प्रकरणी काय कारवाई झाली, अशी विचारणा केली होती. तेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे अध्यक्षांना मालमत्ता लपविल्याबद्दल आपल्याविरुद्ध फौजदारी कारवाई का करण्यात येऊ नये, असे कारणे दाखवा नोटीस बजावून सात दिवसात उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहे, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)कारवाईला विलंब का?आयोगाने कारवाईचे आदेश दिल्यानंतरही जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करणे गरजेचे होते. या प्रकरणात कार्यकाळ संपत असताना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आयोगाच्या स्पष्ट सूचना असतानाही कारवाईस चार वर्षाचा कालावधी होतोच कसा असा सवाल तापेश्वर वैद्य यांनी केला आहे.