शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

अस्तित्वहीन विकास मंडळांना जिल्हाधिकारीही जुमेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:07 IST

कमल शर्मा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सुप्तावस्थेत पडलेल्या विदर्भ विकास मंडळाला आता जिल्हाधिकारीदेखील जुमानेसे झाले आहेत. विदर्भातील तीन ...

कमल शर्मा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सुप्तावस्थेत पडलेल्या विदर्भ विकास मंडळाला आता जिल्हाधिकारीदेखील जुमानेसे झाले आहेत. विदर्भातील तीन जिल्हाधिकाऱ्यांनी विकास मंडळांचा कार्यकाळ संपण्याआधी देण्यात आलेल्या विशेष निधीचा हिशेबच दिला नसल्याचे उजेडात आले आहे.

विदर्भ विकास मंडळाचा कार्यकाळ ३० एप्रिल २०२०ला संपला. त्याआधी २०१९मध्ये मानव विकास निदेशांकामध्ये मागे असलेल्या तालुक्यांमधील जीवनमान उंचावण्यासाठी वाटप करण्यात आलेल्या निधीमध्ये गडबड झाल्याची शंका आहे. हिशोब न देणाऱ्या जिल्ह्यांनी हा निधी अन्य कामांवर खर्च केला असेल, त्यामुळे मंडळाला ते उत्तर देत नसेल, अशी शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र अशा तिन्ही विकास मंडळांना प्रत्येकी ५० कोटींचा विशेष निधी देण्यात आला होता. त्या त्या प्रदेशांमध्ये त्याचे वाटप करण्यात आले. एप्रिल २०२०मध्ये कार्यकाळ समाप्त झाल्यापासून गेले चौदा महिने विदर्भ विकास मंडळ विदर्भातील जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून निधीचा हिशोब मागत आहे. परंतु, अमरावती, बुलढाणा आणि चंद्रपूरने अद्याप तो हिशोब दिलेला नाही. मंडळ दर तीन महिन्यांनी तेथील जिल्हाधिकाऱ्यांना स्मरणपत्रे देत आहे.

मंडळे कायदेशीरदृष्ट्या अस्तित्वात नाहीत. राजभवन पूर्वीप्रमाणे मंडळांच्या कामाबाबत सक्रिय नाही. विदर्भातील नेतेही उदासीन आहेत. त्यामुळे मंडळाचे पत्र जिल्हाधिकारी गांभीर्याने घेत नाहीत.

आधी तालुक्यांना झाला होता फायदा

विदर्भातील १२० तालुक्यांपैकी निम्मे म्हणजे ६० तालुके विशेष निधीसाठी पात्र ठरले होते. यात नागपूर जिल्ह्यातील केवळ सावनेर व रामटेक, बुलढाण्यातील ७ तहसील, अकोला १, अमरावती २, यवतमाळ ७, भंडारा ५, गोंदिया जिल्ह्यातील ८ तालुक्यांना फायदा झाला. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील सर्वाधिक तालुक्यांना लाभ मिळाला.

तत्पूर्वी तिन्ही मंडळांना दरवर्षी प्रत्येकी १०० कोटींचा निधी मिळत होता. परंतु २०१४ मध्ये तो निधी बंद करण्यात आला. फडणवीस सरकारच्या अखेरच्या वर्षी मात्र तो प्रत्येकी ५० कोटी या प्रमाणात देण्यात आला. पण पुढच्याच वर्षी मंडळांचा कार्यकाळ संपला.

जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा स्मरणपत्र : खत्री

विदर्भ विकास मंडळाच्या प्रभारी सदस्य सचिव मनीषा खत्री म्हणाल्या, की मानव विकास निर्देशांकात पिछाडीवर असलेल्या तालुक्यांसाठी दिलेल्या निधीचा सर्व जिल्ह्यांतून हिशेब घेत आहे. परंतु, काही जिल्हाधिकारी अजूनही ते गंभीरपणे घेत नाहीत. कारवाईचे अधिकार फक्त राज्यपालांना असल्याने पुन्हा स्मरणपत्र देण्याशिवाय मंडळाच्या हातात काही नाही.

--------------------