शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

जिल्हा सहकारी बँक रोखे घोटाळा प्रकरणात सरकारवर संशयाचे ढग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:07 IST

राकेश घानोडे नागपूर : काँग्रेसचे नेते आणि क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार हे मुख्य आरोपी असलेल्या नागपूर जिल्हा ...

राकेश घानोडे

नागपूर : काँग्रेसचे नेते आणि क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार हे मुख्य आरोपी असलेल्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रोखे घोटाळ्याचा खटला चालवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विधी, मानवाधिकार व माहिती अधिकार विभागाचे अध्यक्ष अ‍ॅड. आसिफ कुरेशी यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आल्यामुळे राज्य सरकारवर संशयाचे काळे ढग गोळा झाले आहेत. राजकीय हितसंबंधामुळे या खटल्याबाबत सरकार पारदर्शक नसल्याचा आरोप केला जात आहे.

राज्याच्या विधी व न्याय विभागाने गेल्या १४ मे रोजी अ‍ॅड. कुरेशी यांच्या नियुक्तीची अधिसूचना जारी केली आहे, तेव्हापासून सरकारच्या भूमिकेविषयी उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली आहे. हा खटला २००२ पासून प्रलंबित असून, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार त्यावर अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालयात सुनावणी केली जात आहे. हा खटला चालवण्यासाठी आधी अनुभवी महिला वकील अ‍ॅड. ज्योती वजानी यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी नोव्हेंबर-२०१९ ते मार्च-२०२० पर्यंत ४९ सरकारी साक्षीदार तपासले. त्यानंतर लॉकडाऊनमुळे खटल्याचे कामकाज बंद झाले. पुढे डिसेंबरमध्ये आणखी दोन सरकारी साक्षीदार तपासण्यात आले. आता केवळ तीन-चार सरकारी साक्षीदार तपासायचे बाकी आहेत. खटला अंतिम टप्प्यात आहे. अशावेळी सरकार वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. अ‍ॅड. कुरेशी यांच्या नियुक्तीमुळे येणाऱ्या काळात सरकारला विविध अडचणींना तोंड द्यावे लागेल, असे विधी जाणकारांचे म्हणणे आहे.

----------------

एकूण ११ आरोपींचा समावेश

हा १२५ कोटी रुपयांचा घोटाळा असून, व्याजासह रकमेचा आकडा १५० कोटी रुपयांवर गेला आहे. या प्रकरणात एकूण ११ आरोपी आहेत. त्यामध्ये बँकेचे माजी अध्यक्ष सुनील केदार यांच्यासह माजी महाव्यवस्थापक अशोक चौधरी (नागपूर), रोखे दलाल संजय अग्रवाल, केतन सेठ, सुबोध भंडारी, कानन मेवावाला, नंदकिशोर त्रिवेदी (सर्व मुंबई), अमित वर्मा (अहमदाबाद), महेंद्र अग्रवाल, श्रीप्रकाश पोद्दार (कोलकाता) व बँक कर्मचारी सुरेश पेशकर (नागपूर) यांचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ४०६ (विश्वासघात), ४०९ (सरकारी नोकर आदींद्वारे विश्वासघात), ४६८ (बनावट दस्तावेज तयार करणे), ४७१ (बनावट दस्तावेज खरे भासवणे) व १२०-ब (कट रचणे) अंतर्गत आरोप निश्चित झाले आहेत.

----------------

अ‍ॅड. ज्योती वजानी यांनी राजीनामा का दिला?

अ‍ॅड. ज्योती वजानी यांनी गेल्या ५ मार्च रोजी विशेष सरकारी वकील पदाचा राजीनामा दिला आहे. खटला अंतिम टप्प्यात असताना त्यांनी असा धक्कादायक निर्णय का घेतला हा प्रश्न अनेकांना भेडसावत आहे. यावरूनही सरकारकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे. यासंदर्भात वजानी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिल्याचे सांगितले.

---------------------

उच्च न्यायालयात दिले जाईल आव्हान

या घोटाळ्याविषयी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये शेतकरी ओमप्रकाश कामडी व इतरांची जनहित याचिका प्रलंबित आहे. या याचिकेचे कामकाज पहात असलेले अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी अ‍ॅड. कुरेशी यांच्या नियुक्तीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येईल, अशी माहिती दिली. या प्रकरणात सरकार पक्षपात करू पहात आहे, असा आरोपही त्यांनी केला.