शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

जिल्हा प्रशासनाचे मिशन मान्सून

By admin | Updated: June 13, 2014 01:23 IST

पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती आल्यास त्याला तोंड देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. अतिरिक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखेडे व जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांच्याकडे

अधिकाऱ्यांची नियुक्ती : कामांचे वाटपनागपूर : पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती आल्यास त्याला तोंड देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.अतिरिक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखेडे व जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांच्याकडे तहसील आणि उपविभागातील नुकसानाची माहिती घेणे आणि मदत व पुनर्वसनाची सोय करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांच्याकडे नैसर्गिक आपत्तीचा अहवाल शासनाकडे पाठविणे, तसेच सर्व विभागाशी समन्वय राखण्याचे काम सोपविण्यात आले आहे. उपजिल्हाधिकारी निशिकांत सुके यांच्याकडे पात्र लाभार्थ्यांना मदतीचे वाटप व त्याचा अहवाल शासनाकडे पाठविणे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी प्रकाश पाटील यांच्याकडे पूरग्रस्तांसाठी मदत, पुनर्वसनाची सोय करणे, तसेच सैन्याच्या मदतीची गरज भासल्यास किंवा हेलिकॉप्टरची गरज पडल्यास त्याची व्यवस्था करणे आणि मंत्र्यांचे दौरे असतील तर त्याची तयारी करणे आदी कामे सोपविण्यात आली आहेत. उपजिल्हाधिकारी प्रदीप डांगे हे पाटील यांना सहकार्य करणार आहेत. जिल्हा नियोजन अधिकारी कृष्णा फिरके व जिल्हा खनिकर्म अधिकारी गोसावी यांच्याकडे पूरग्रस्तांना मदत पुरविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी आशा पठाण व सुजाता गंधे यांच्याकडे पूरग्रस्त भागात मागणीनुसार टँकरने पाणीपुरवठा करणे तसेच पिकांची हानी, रस्ते व पुलांच्या हानीची माहिती घेण्याचे काम सोपविण्यात आले आहे. उपजिल्हाधिकारी जगदीश संगीतराव आणि प्रकाश वर्मा यांच्याकडे वेळोवळी उद््भवणाऱ्या कामांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी कळविले आहे.(प्रतिनिधी)