शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या बाजार विभागात गाळे वाटपात घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेची आर्थिक स्थिती मागील दोन-तीन वर्षांपासून बिकट आहे. तिजोरीत पैसा नसल्याने विकास कामांना ब्रेक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेची आर्थिक स्थिती मागील दोन-तीन वर्षांपासून बिकट आहे. तिजोरीत पैसा नसल्याने विकास कामांना ब्रेक लागले आहे. निधीवरून पदाधिकारी व अधिकारी यांच्यात वाद सुरू आहे. दुसरीकडे मनपा उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने प्रशासनही गंभीर नसल्याचे दिसत नाही. सक्करदरा येथील राष्ट्रीय गांधी मार्केटमधील गाळे वाटपात घोळ आहे. मागील अनेक वर्षांपासून येथील ३१ दुकाने व १६ ओटे वाटपाविना पडून आहेत. अशीच परिस्थिती शहरातील अन्य बाजारांतील गाळ्यांची आहे. अशा परिस्थितीत मनपाचे उत्पन्न कसे वाढणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सक्करदरा मार्केट येथे मनपाने गाळे बांधले आहे. यातून मनपा तिजोरीत मोठ्या प्रमाणात महसूल जमा होऊ शकतो. मात्र, गाळे वाटपात घोळ आहे. मनपा प्रशासन व बाजार विभागाने गाळे वाटपाचे नियम बनविताना गाळेधारकाचे ओळखपत्र घेण्याची नियमात तरतूद नाही. यामुळे अनेकांनी बोगस रजिस्ट्री करून गाळे बळकावले आहेत. लीज नूतनीकरणातही अनियमितता असल्याच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात १८ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या सभागृहात नगरसेवक सतीश होले यांनी प्रश्न मांडला होता. मात्र, सभा ऑनलाइन होत असल्याने हा मुद्दा चर्चेलाच आला नाही. प्रशासनाने दिलेल्या लेखी उत्तरात गाळे वाटपासाठी ओेळखपत्राची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे सक्करदरा बाजारातील काही गाळे मनपातील एका पदाधिकाऱ्याने दुसऱ्याच्या नावावर घेऊन भाड्याने दिल्याची माहिती आहे. या प्रकरणाची चौकशी झाल्यास अधिकारी व पदाधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. ऑनलाइन सभेच्या नावाखाली महत्त्वाच्या विषयावरील चर्चा टाळली जात असल्याचा नगरसेवकांचा आरोप आहे.

...

कसे वाढणार बाजार विभागाचे उत्पन्न?

बाजार विभागाचे उत्पन्न गेल्या वर्षी ५ मार्चपर्यंत ९.५९ कोटी होते. यावर्षी याच कालावधीत ७.११ कोटी जमा झाले. बाजार विभाग २.४८ कोटींनी मागे आहे. मनपाच्या जागेवर शहरात विविध भागात बाजार आहेत. सक्करदरा, इतवारी, सदर भागातील बाजारांतील गाळे व ओट्यांपासून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकते. मात्र, मोक्याच्या जागांवरील गाळे व ओटे नाममात्र भाड्याने दिले आहेत. गाळे वाटपाही गोंधळ आहे. वर्षानुवर्षे भाड्यात वाढ करण्यात आलेली नाही..

...

प्रशासन हतबल

मनपाची बिकट आर्थिक स्थिती विचारात घेता उत्पन्नवाढीच्या दृष्टीने पदाधिकारी व प्रशासनाने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे; परंतु मनपात सोयीचे निर्णय घेतले जातात. मनपाच्या खाली जागा, इमारती, बाजारातील गाळे, बंद शाळा यातून उत्पन्न मिळू शकते; परंतु पदाधिकाऱ्यांचे हितसंबंध लक्षात घेता प्रशासनही हतबल दिसत आहे.