शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

‘लॉकडाऊन’मध्ये मनरेगातून श्रमिकांना २८५ कोटींचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 00:35 IST

‘लॉकडाऊन’च्या कालावधीत ‘मनरेगा’अंतर्गत (महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना) मोठ्या प्रमाणात कामे घेण्यात आली. राज्यातील विविध जिल्ह्यात ५७ हजार ५५० कामे पूर्ण करण्यात आली. या माध्यमातून श्रमिकांना २८५ कोटी ३६ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ‘लॉकडाऊन’च्या कालावधीत ‘मनरेगा’अंतर्गत (महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना) मोठ्या प्रमाणात कामे घेण्यात आली. राज्यातील विविध जिल्ह्यात ५७ हजार ५५० कामे पूर्ण करण्यात आली. या माध्यमातून श्रमिकांना २८५ कोटी ३६ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. श्रमिकांना गावातच रोजगार उपलब्ध करुन देण्यावर भर आहे, अशी माहिती ‘मनरेगा’ आयुक्त ए.एस.आर.नायक यांनी दिली.मनरेगाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर तसेच ज्यांना रोजगाराची आवश्यकता आहे अशा सर्व श्रमिकांना रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. यासाठी १९ प्रकारच्या कामांसाठी साधारणत: ५ लाख ८७ हजार ३६० कामे तयार ठेवण्यात आली आहेत. या कामांमध्ये ग्रामपंचायत क्षेत्रात सर्वाधिक कामे उपलब्ध करुन देण्यात आली असून त्यासोबतच कृषी फलोत्पादन, जलसंधारण, प्रधानमंत्री आवास योजना, जलसिंचन विहिरी आदी कामांचा समावेश आहे. ‘जॉबकार्ड’ असलेल्या मजुरांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आल्या होत्या, असे नायक यांनी सांगितले.जलसिंचन विहिरींतर्गत नागपूर विभागात १६९ विहिरी पूर्ण झाल्या असून मजुरीपोटी १ कोटी ३६ लाख रुपयांचा खर्च झाला. मनरेगांतर्गत फळबाग योजना ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. विदर्भात १ हजार ४२६ लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत मजुरी तसेच साहित्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.नागपूर विभागात सव्वाचार हजार घरे बांधलीप्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मनरेगाच्या माध्यमातून राज्यात २६ हजार ९८४ घरांचे काम पूर्ण झाले आहे. यासाठी लाभार्थ्यांना ४७ कोटी ३ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. नागपूर विभागात ४ हजार २६७ घरांचे बांधकाम पूर्ण झाले असून त्यावर ७ कोटी ८९ लाख ४३ हजारांचा निधी खर्च झाला आहे. चंद्रपूर (१,०६६), नागपूर (६०५), भंडारा (५३७), गोंदिया (२४१), वर्धा (३३८) व गडचिरोली (४४५) यांचा यात समावेश आहे, असे प्रतिपादन नायक यांनी केले.

टॅग्स :jobनोकरीLabourकामगारGovernmentसरकार