शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

आबादी जागेवरील भूखंड वाटपात घोळ?

By admin | Updated: January 4, 2015 00:54 IST

नजीकच्या पाली-उमरी गटग्रामपंचायत अंतर्गत आबादी जागेवरील भूखंडांचे वाटप करण्यात आले. या भूखंड वाटपात घोळ करण्यात आला असून, काही लाभार्थ्यांकडून भूखंडाची दुप्पट रक्कम वसूल

मनसर : नजीकच्या पाली-उमरी गटग्रामपंचायत अंतर्गत आबादी जागेवरील भूखंडांचे वाटप करण्यात आले. या भूखंड वाटपात घोळ करण्यात आला असून, काही लाभार्थ्यांकडून भूखंडाची दुप्पट रक्कम वसूल करण्यात आल्याचा आरोप लाभार्थ्यांनीच केला आहे. यासंदर्भात काहींनी पारशिवनीच्या तहसीलदारांकडे तक्रार केली आहे. पाली-उमरी पटवारी हलका क्रमांक-४ मधील उमरीतील नवीन आबादी जागेवरील सर्व्हे क्रमांक-३०/१ (आराजी-०.९१ हेक्टर आर.)ची विभागणी करून त्यातील जमिनीचे पट्टे ३० लाभार्थ्यांना वाटप करावयाचे होते. ही वाटप प्रक्रिया १० वर्षांपासून रखडली होती. या जमिनीवर ३० बाय ५०, ३० बाय ३० याप्रमाणे एकूण ३० भूखंड तयार करण्यात आले आणि ते ३० लाभार्थ्यांना वाटायचे होते. यातील नऊ भूखंडाची मागणी नागरिकांनी केली नाही. त्यामुळे सदर नऊ भूखंड राखीव ठेवण्यात आले होते. उर्वरित २१ भूखंड नायब तहसीलदार पी. आर. आडे यांच्या आदेशान्वये २०१३-१४ मध्ये वाटण्यात आले. सदर भूखंडाचे वाटप ईश्वर चिठ्ठीने करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवाय, ते भूखंड रहिवासी प्रयोजनासाठी देण्यात आले होते. या आबादी जमीन भोगाधिकार मूल्य ३० बाय ५० फूट शासकीय कर आकारणी अथवा खंड ३,७८० रुपये चालान क्रमांक-५१ आणि भूखंड क्रमांक-३१, ८३, ६१ चौरस मीटर जमिनीवरील ८३.६१ चौरस मीटर, ९०० चौरस फूट जमिनीवरील कर आकारणी २६ हजार २६८ रुपये चालान क्रमांक-३२ अन्वये एकूण २१ लाभार्थ्यांकडून प्रत्येकी सहा ते सात हजार रुपयांप्रमाणे एकूण ८९ हजार रुपये वसूल करण्यात आल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे. ही रक्कम दुप्पट असल्याचेही काहींनी सांगितले. सदर रक्कम तत्कालीन तलाठी ढोरे यांच्या तोंडी आदेशान्वये तत्कालीन सरपंच ईश्वर खंगार यांनी वसूल केल्याचा आरोप तहसीलदार तेढे यांना दिलेल्या तक्रारीत लाभार्थ्यांनी केला आहे.शासकीय आबादी जागेवर पाडण्यात आलेल्या भूखंड वाटपात घोळ झाल्याचा आरोपही करण्यात आला. उपासराव केवट, दामोदर खडसे, इंदिरा ठाकरे, प्रल्हाद उकुंडे, राजू शेंडे सर्व रा. उमरी या लाभार्थ्यांना मूळ कर भरणा आकारणीनुुसार ३,७८० रुपये आणि २,२६८ रुपयांच्या ताबा पावती देण्यात आल्या. प्रत्यक्षात या लाभार्थ्यांकडून दुप्पट रक्कम घेण्यात आली, असेही या लाभार्थ्यांनी सांगितले. यासंदर्भात लाभार्थ्यांनी पारशिवनीचे तहसीलदार तेढे, रामटेकचे उपविभागीय अधिकारी (महसूल) शेखर सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दीपक साळुंके, पारशिवनीचे ठाणेदार दिलीप मसराम यांच्याकडे तक्रारी केल्या असून, सदर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)