शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

आबादी जागेवरील भूखंड वाटपात घोळ?

By admin | Updated: January 4, 2015 00:54 IST

नजीकच्या पाली-उमरी गटग्रामपंचायत अंतर्गत आबादी जागेवरील भूखंडांचे वाटप करण्यात आले. या भूखंड वाटपात घोळ करण्यात आला असून, काही लाभार्थ्यांकडून भूखंडाची दुप्पट रक्कम वसूल

मनसर : नजीकच्या पाली-उमरी गटग्रामपंचायत अंतर्गत आबादी जागेवरील भूखंडांचे वाटप करण्यात आले. या भूखंड वाटपात घोळ करण्यात आला असून, काही लाभार्थ्यांकडून भूखंडाची दुप्पट रक्कम वसूल करण्यात आल्याचा आरोप लाभार्थ्यांनीच केला आहे. यासंदर्भात काहींनी पारशिवनीच्या तहसीलदारांकडे तक्रार केली आहे. पाली-उमरी पटवारी हलका क्रमांक-४ मधील उमरीतील नवीन आबादी जागेवरील सर्व्हे क्रमांक-३०/१ (आराजी-०.९१ हेक्टर आर.)ची विभागणी करून त्यातील जमिनीचे पट्टे ३० लाभार्थ्यांना वाटप करावयाचे होते. ही वाटप प्रक्रिया १० वर्षांपासून रखडली होती. या जमिनीवर ३० बाय ५०, ३० बाय ३० याप्रमाणे एकूण ३० भूखंड तयार करण्यात आले आणि ते ३० लाभार्थ्यांना वाटायचे होते. यातील नऊ भूखंडाची मागणी नागरिकांनी केली नाही. त्यामुळे सदर नऊ भूखंड राखीव ठेवण्यात आले होते. उर्वरित २१ भूखंड नायब तहसीलदार पी. आर. आडे यांच्या आदेशान्वये २०१३-१४ मध्ये वाटण्यात आले. सदर भूखंडाचे वाटप ईश्वर चिठ्ठीने करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवाय, ते भूखंड रहिवासी प्रयोजनासाठी देण्यात आले होते. या आबादी जमीन भोगाधिकार मूल्य ३० बाय ५० फूट शासकीय कर आकारणी अथवा खंड ३,७८० रुपये चालान क्रमांक-५१ आणि भूखंड क्रमांक-३१, ८३, ६१ चौरस मीटर जमिनीवरील ८३.६१ चौरस मीटर, ९०० चौरस फूट जमिनीवरील कर आकारणी २६ हजार २६८ रुपये चालान क्रमांक-३२ अन्वये एकूण २१ लाभार्थ्यांकडून प्रत्येकी सहा ते सात हजार रुपयांप्रमाणे एकूण ८९ हजार रुपये वसूल करण्यात आल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे. ही रक्कम दुप्पट असल्याचेही काहींनी सांगितले. सदर रक्कम तत्कालीन तलाठी ढोरे यांच्या तोंडी आदेशान्वये तत्कालीन सरपंच ईश्वर खंगार यांनी वसूल केल्याचा आरोप तहसीलदार तेढे यांना दिलेल्या तक्रारीत लाभार्थ्यांनी केला आहे.शासकीय आबादी जागेवर पाडण्यात आलेल्या भूखंड वाटपात घोळ झाल्याचा आरोपही करण्यात आला. उपासराव केवट, दामोदर खडसे, इंदिरा ठाकरे, प्रल्हाद उकुंडे, राजू शेंडे सर्व रा. उमरी या लाभार्थ्यांना मूळ कर भरणा आकारणीनुुसार ३,७८० रुपये आणि २,२६८ रुपयांच्या ताबा पावती देण्यात आल्या. प्रत्यक्षात या लाभार्थ्यांकडून दुप्पट रक्कम घेण्यात आली, असेही या लाभार्थ्यांनी सांगितले. यासंदर्भात लाभार्थ्यांनी पारशिवनीचे तहसीलदार तेढे, रामटेकचे उपविभागीय अधिकारी (महसूल) शेखर सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दीपक साळुंके, पारशिवनीचे ठाणेदार दिलीप मसराम यांच्याकडे तक्रारी केल्या असून, सदर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)