शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

आबादी जागेवरील भूखंड वाटपात घोळ?

By admin | Updated: January 4, 2015 00:54 IST

नजीकच्या पाली-उमरी गटग्रामपंचायत अंतर्गत आबादी जागेवरील भूखंडांचे वाटप करण्यात आले. या भूखंड वाटपात घोळ करण्यात आला असून, काही लाभार्थ्यांकडून भूखंडाची दुप्पट रक्कम वसूल

मनसर : नजीकच्या पाली-उमरी गटग्रामपंचायत अंतर्गत आबादी जागेवरील भूखंडांचे वाटप करण्यात आले. या भूखंड वाटपात घोळ करण्यात आला असून, काही लाभार्थ्यांकडून भूखंडाची दुप्पट रक्कम वसूल करण्यात आल्याचा आरोप लाभार्थ्यांनीच केला आहे. यासंदर्भात काहींनी पारशिवनीच्या तहसीलदारांकडे तक्रार केली आहे. पाली-उमरी पटवारी हलका क्रमांक-४ मधील उमरीतील नवीन आबादी जागेवरील सर्व्हे क्रमांक-३०/१ (आराजी-०.९१ हेक्टर आर.)ची विभागणी करून त्यातील जमिनीचे पट्टे ३० लाभार्थ्यांना वाटप करावयाचे होते. ही वाटप प्रक्रिया १० वर्षांपासून रखडली होती. या जमिनीवर ३० बाय ५०, ३० बाय ३० याप्रमाणे एकूण ३० भूखंड तयार करण्यात आले आणि ते ३० लाभार्थ्यांना वाटायचे होते. यातील नऊ भूखंडाची मागणी नागरिकांनी केली नाही. त्यामुळे सदर नऊ भूखंड राखीव ठेवण्यात आले होते. उर्वरित २१ भूखंड नायब तहसीलदार पी. आर. आडे यांच्या आदेशान्वये २०१३-१४ मध्ये वाटण्यात आले. सदर भूखंडाचे वाटप ईश्वर चिठ्ठीने करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवाय, ते भूखंड रहिवासी प्रयोजनासाठी देण्यात आले होते. या आबादी जमीन भोगाधिकार मूल्य ३० बाय ५० फूट शासकीय कर आकारणी अथवा खंड ३,७८० रुपये चालान क्रमांक-५१ आणि भूखंड क्रमांक-३१, ८३, ६१ चौरस मीटर जमिनीवरील ८३.६१ चौरस मीटर, ९०० चौरस फूट जमिनीवरील कर आकारणी २६ हजार २६८ रुपये चालान क्रमांक-३२ अन्वये एकूण २१ लाभार्थ्यांकडून प्रत्येकी सहा ते सात हजार रुपयांप्रमाणे एकूण ८९ हजार रुपये वसूल करण्यात आल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे. ही रक्कम दुप्पट असल्याचेही काहींनी सांगितले. सदर रक्कम तत्कालीन तलाठी ढोरे यांच्या तोंडी आदेशान्वये तत्कालीन सरपंच ईश्वर खंगार यांनी वसूल केल्याचा आरोप तहसीलदार तेढे यांना दिलेल्या तक्रारीत लाभार्थ्यांनी केला आहे.शासकीय आबादी जागेवर पाडण्यात आलेल्या भूखंड वाटपात घोळ झाल्याचा आरोपही करण्यात आला. उपासराव केवट, दामोदर खडसे, इंदिरा ठाकरे, प्रल्हाद उकुंडे, राजू शेंडे सर्व रा. उमरी या लाभार्थ्यांना मूळ कर भरणा आकारणीनुुसार ३,७८० रुपये आणि २,२६८ रुपयांच्या ताबा पावती देण्यात आल्या. प्रत्यक्षात या लाभार्थ्यांकडून दुप्पट रक्कम घेण्यात आली, असेही या लाभार्थ्यांनी सांगितले. यासंदर्भात लाभार्थ्यांनी पारशिवनीचे तहसीलदार तेढे, रामटेकचे उपविभागीय अधिकारी (महसूल) शेखर सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दीपक साळुंके, पारशिवनीचे ठाणेदार दिलीप मसराम यांच्याकडे तक्रारी केल्या असून, सदर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)