शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

पोषण आहारात मसुर डाळ, हरभऱ्याचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:07 IST

नागपूर : शाळा बंद असल्या तरी शासनाने विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा पुरवठा सातत्याने सुरू ठेवला. उन्हाळ्याच्या सुट्यामध्येसुद्धा विद्यार्थ्यांना पोषण आहार ...

नागपूर : शाळा बंद असल्या तरी शासनाने विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा पुरवठा सातत्याने सुरू ठेवला. उन्हाळ्याच्या सुट्यामध्येसुद्धा विद्यार्थ्यांना पोषण आहार वितरित केला. शासन विद्यार्थ्यांना धान्याच्या स्वरूपात पोषण आहार देत आहे. आता पुन्हा ५० दिवसांच्या पोषण आहाराचे वितरण विद्यार्थ्यांना होणार आहे. यंदा शासनाने धान्याच्या मेन्यूमध्ये बदल केला असून, तांदळासोबत मसूर डाळ व हरभरा वितरित केला जाणार आहे.

उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये शासनाने ३४ दिवसांचे धान्य विद्यार्थ्यांना वितरित केले. त्यात तांदळासोबत चणा आणि मूग डाळ वितरित केली. त्यानंतर ६० दिवसांचा पोषण आहाराच्या वितरणाचे आदेश आले. त्यात मटकी व मुंगाची डाळ वितरित करण्यात आली. आता पुन्हा शासनाने डिसेंबर व जानेवारीचे ५० दिवसांच्या पोषण आहाराचे वितरण करण्याचे आदेश काढले. यात मसूर व हरभऱ्याची डाळ विद्यार्थ्यांना मिळणार आहे. नागपूर जिल्ह्यातील १३६१ शाळांमधील जवळपास ७० हजारांवर विद्यार्थ्यांना लाभ मिळतो आहे. डिसेंबर ते जानेवारी २०२१ या कालावधीतील ५० दिवसांचे धान्य वितरित करण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी जिल्हा परिषदेच्या शालेय पोषण आहाराकडे मागणी नोंदविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पोषण आहार विभागाने संचालकांकडे मागणी नोंदविली आहे. यानुसार आता पुढे ५० दिवसांसाठी मिळणाऱ्या धान्यामध्ये इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना यापूर्वी तांदूळ पाच किलो, मसूर डाळ ९०० ग्रॅम व हरभरा १ किलो ९०० ग्रॅम मिळणार आहे. वर्ग सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ७ किलो ५०० ग्रॅम तांदूळ तसेच पॅकिंग स्वरूपातील मसूर डाळ १ किलो ३०० ग्रॅम व हरभरा २ किलो ९०० ग्रॅम या स्वरूपात वितरित करण्यात येणार आहे.