शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

अत्यल्प पाणीपुरवठा व चोक झालेल्या गडरलाईनचा मनस्ताप ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:07 IST

नागपूर : वाठोडा परिसरातील गोपालकृष्णनगर, दर्शन कॉलनीत नागरिकांना विविध समस्या भेडसावत आहेत. या भागात पाणी, रस्ते, गडरलाईनच्या समस्येमुळे नागरिक ...

नागपूर : वाठोडा परिसरातील गोपालकृष्णनगर, दर्शन कॉलनीत नागरिकांना विविध समस्या भेडसावत आहेत. या भागात पाणी, रस्ते, गडरलाईनच्या समस्येमुळे नागरिक कंटाळले आहेत. मूलभूत सुविधा नागरिकांना मिळाव्यात, अशी मागणी अनेकदा महापालिकेकडे करूनही काहीच कारवाई न करण्यात आल्यामुळे त्यांचा नाईलाज होत आहे. आपल्या समस्यांना त्यांनी ‘लोकमत’कडे वाट मोकळी करून दिली.

गोपालकृष्णनगरात अपुरा पाणीपुरवठा

गोपालकृष्णनगरात रात्री ८ वाजता नळाला पाणी येते. त्यातही केवळ अर्धा तास नळाला पाणी राहते. एवढ्या कमी कालावधीत नागरिकांना पिण्याचे पाणीही मिळत नाही. दिवसभर वापरण्यासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते. त्यासाठी लोकप्रतिनिधींकडे चकरा मारून टँकरची वाट पाहावी लागते. ही समस्या रोजचीच झाल्यामुळे नागरिक कंटाळले आहेत. त्यामुळे नळाला किमान एक तास पाणी सोडण्याची मागणी ते करीत आहेत.

अरुंद रस्त्यामुळे वाढले अपघात

गोपालकृष्णनगर परिसरात १० फुटांचा अरुंद पांधन रस्ता आहे. हा रस्ता नागरिकांना रहदारीसाठी अपुरा पडत आहे. यातही या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. हा रस्ता रुंद करण्याची नागरिकांची मागणी अनेक वर्षांपासून आहे. तरीसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी नागरिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे रहदारीसाठी रस्ता उरत नाही. याशिवाय वाठोडा टी पॉईंट चौकात रस्त्यात इलेक्ट्रिकचे खांब लावण्यात आल्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होत आहे. रात्रीच्या वेळी हे खांब दिसत नसल्यामुळे या चौकात अनेकदा अपघात झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे हे खांब त्वरित काढण्याची नागरिकांची मागणी आहे. या भागात रिकाम्या प्लॉटमध्ये कचरा, पाणी साचत असल्यामुळे दुर्गंधी पसरते. डासांचा प्रादुर्भाव होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे रिकाम्या प्लॉटधारकांवर कारवाई करून या भागात नियमित फवारणी करण्याची गरज आहे. या भागात स्पीड ब्रेकर नसल्यामुळे वाहनचालक वेगात वाहने चालवितात. तसेच चेनस्नॅचिंगच्या घटनाही या भागात घडल्या आहेत. त्यामुळे येथे स्पीड ब्रेकर लावण्याची मागणी होत आहे.

दर्शन कॉलनीत गडरलाईनमुळे नागरिक त्रस्त

दर्शन कॉलनीतील गडरलाईन जीर्ण झाली आहे. ही गडरलाईन नेहमीच चोक होत असल्यामुळे नागरिकांना मनस्ताप होत आहे. गडरलाईन चोक झाल्याने घाण पाणी नळाच्या लाईनमध्ये शिरुन नळाला दूषित पाणी येते. गडरलाईनचे चेंबर खचले असून दुरुस्तीसाठी येणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी गडरलाईनवर नागरिकांनी बांधकाम केल्यामुळे गडरलाईन दुरुस्त करण्यासाठी त्रास होतो. या भागातील जीर्ण झालेली गडरलाईन बदलण्याची नागरिकांची मागणी आहे. या भागातील आरोग्य केंद्राला हॉस्पिटलमध्ये रूपांतरित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. त्यासाठी महापालिकेच्या बंद पडलेल्या शाळेत २५ खाटांचे रुग्णालय सुरू करण्यासाठी महापालिकेला निवेदन देण्यात आले आहे. याशिवाय जगनाडे चौक ते केडीके कॉलेजपर्यंत स्पीड ब्रेकर आणि वाहतूक दिवे बसविण्याची मागणी आहे.

गडरलाईन बदलविण्याची गरज

‘गडरलाईन जीर्ण झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. या भागात महानगरपालिकेने नवी गडरलाईन टाकून नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे.’

-शीला राठोड, महिला

स्पीड ब्रेकर बसवावे

‘जगनाडे चौक ते केडिके कॉलेजपर्यंत स्पीड ब्रेकर नसल्यामुळे वाहनचालक वेगाने वाहने चालवितात. या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले असल्यामुळे स्पीड ब्रेकर आणि वाहतूक दिवे लावण्याची गरज आहे.’

-रेखा वारजुरकर, महिला

नळाला पुरेसे पाणी सोडावे

‘गोपालकृष्णनगर परिसरात नळाला केवळ अर्धा तास पाणी येते. नागरिकांना पिण्यासाठीही पाणी मिळत नाही. त्यामुळे महानगरपालिकेने या भागात नळाला एक तास पाणी सोडण्याची गरज आहे. यासोबतच परिसरात डासांचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी फवारणी करण्याची मागणी आहे.’

-राजेश पौनीकर, नागरिक

रस्ता रुंदीकरण महत्त्वाचे

‘गोपालकृष्णनगरकडे येणारा पांधन रस्ता केवळ १० फुटांचा आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असून या रस्त्याचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे.’

-राजू भेंडे, नागरिक

...............