शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

गुण वाटपात भेदभाव, विद्यार्थिनी हायकोर्टात

By admin | Updated: June 15, 2017 02:16 IST

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीतील गणित, जीवशास्त्र व रसायनशास्त्र विषयाच्या परीक्षेमध्ये

सीबीएसईतील प्रकरण : १९ जूनपर्यंत मागितले उत्तर लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीतील गणित, जीवशास्त्र व रसायनशास्त्र विषयाच्या परीक्षेमध्ये चुकीचे प्रश्न विचारल्या गेल्यामुळे दिल्ली विभागातील सर्व विद्यार्थ्यांना सरसकट २६ गुण देण्यात आले आहेत. परंतु, इतर विभागातील विद्यार्थ्यांना या गुणांपासून वंचित ठेवण्यात आले, असा दावा एका विद्यार्थिनीने केला आहे. यासंदर्भात तिने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. आयुषी दीक्षित असे विद्यार्थिनीचे नाव आहे. न्यायालयाने बुधवारी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर मंडळाला नोटीस बजावून १९ जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. १० गुणांचे गणिताच्या तर, प्रत्येकी ८ गुणांचे जीवशास्त्र व रसायनशास्त्राच्या परीक्षेमध्ये चुकीचे प्रश्न विचारण्यात आले होते. परिणामी विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मंडळाने दिल्ली विभागातील विद्यार्थ्यांना सरसकट २६ गुण दिले आहे. परंतु, इतर विभागातील विद्यार्थ्यांना या गुणांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. मंडळाची ही वागणूक भेदभावपूर्ण आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. आयुषीतर्फे अ‍ॅड. भानुदास कुलकर्णी यांनी बाजू मांडली.