शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विधेयकाबाबत संघप्रणीत किसान संघाकडून नाराजीचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 11:20 IST

. काँग्रेसने दिल्ली ते गल्ली विरोध करण्याची भूमिका घेतली असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत भारतीय किसान संघानेदेखील सरकारला घरचा अहेर दिला आहे.

ठळक मुद्देसूचना विचारात घेतल्या नसल्याचा दावाशेतकरी हिताचा सर्वंकष विचार व्हावा

योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संसदेत संमत झालेल्या कृषीसंबंधी तीन विधेयकांना राजकीय पातळीवर विरोध सुरू झाला आहे. काँग्रेसने दिल्ली ते गल्ली विरोध करण्याची भूमिका घेतली असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत भारतीय किसान संघानेदेखील सरकारला घरचा अहेर दिला आहे. या विधेयकाबाबत किसान संघाकडून नाराजीचा सूर व्यक्त करण्यात आला आहे. या विधेयकाबाबत आमच्या सूचना केंद्र सरकारने विचारात घेतल्या नाहीत. दुरुस्तीसह हे विधेयक का संमत करण्यात आले नाही, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.संसदेत कृषी उत्पादन, व्यापार आणि वाणिज्य सुधार विधेयक, शेतमाल हमीभाव विधेयक व अत्यावश्यक वस्तू विधेयक ही तीन विधेयके संमत झाली. ५ जून २०२० रोजीच्या अध्यादेशानंतर भारतीय किसान संघाने केंद्र, राज्य व गावपातळीवर ग्रामसमितींच्या माध्यमातून १ जुलै ते १५ आॅगस्ट २०२० या ४५ दिवसात पंतप्रधान व केंद्रीय कृषिमंत्र्यांना ई-मेल केले होते. याशिवाय १५ हजार गावांतून पत्रेदेखील पाठविण्यात आली व अध्यादेशात सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली. किसान संघाच्या पदाधिकाऱ्यांना सरकारी पातळीवर अपेक्षित सुधारणादेखील पोहोचविल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात विधेयकाच्या मसुद्यात या सुधारणांचा समावेशच झाला नाही. त्यामुळे किसान संघामध्ये नाराजीचा सूर आहे.सर्वच पातळींवर धोरणात्मक बदल हवाभारतीय किसान संघाने सरकारसमोर काही प्रमुख मागण्या ठेवल्या होत्या. पीक खरेदी करणाºया व्यापाऱ्यांची किसान पोर्टलवर नोंदणी व्हावी, सरकारने एमएसपी खरेदीची कायदेशीर व्यवस्था लागू करावी व नियमभंग करणाºयांविरोधात शिक्षेची तरतूद करावी, खासगी खरेदीवर नियंत्रण हवे, वादविवाद निपटाºयासाठी कृषी न्यायालय स्थापित करावे, कराराच्या शेतीसाठी नियम बनवावे व जमाखोरी करायला वाव राहणार नाही यादृष्टीने नियम बनवावेत या प्रमुख मागण्या होत्या. तुकड्या-तुकड्यांनी विचार करून काम होणार नाही. सगळ्याच पातळींवर धोरणात्मक बदल हवा. कांद्यावर निर्यातबंदी लावणे हे सोयीचे नाही, असे मत किसान संघाचे राष्ट्रीय संघटनमंत्री दिनेश कुळकर्णी यांनी व्यक्त केले.रस्त्यांवर उतरणार नाही, चर्चेस तयारकृषी विधेयकातील अर्ध्या तरतुदींशी भारतीय किसान संघ सहमत आहे. बाजार खुले होणे आवश्यक आहे व दलालांवर नियंत्रण येणेदेखील गरजेचे आहे. खासगी खरेदीवरदेखील नियंत्रण हवेच. परंतु सुधारणांचा विचारदेखील व्हायला हवा होता. आम्ही रस्त्यांवर उतरून, धान्य फेकून आंदोलन करणार नाही. आम्ही सरकारशी चर्चेला तयार आहो, असे प्रतिपादन भारतीय किसान संघाचे विदर्भ प्रांत अध्यक्ष नाना आखरे यांनी केले.

 

टॅग्स :agricultureशेती