शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विधेयकाबाबत संघप्रणीत किसान संघाकडून नाराजीचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 11:20 IST

. काँग्रेसने दिल्ली ते गल्ली विरोध करण्याची भूमिका घेतली असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत भारतीय किसान संघानेदेखील सरकारला घरचा अहेर दिला आहे.

ठळक मुद्देसूचना विचारात घेतल्या नसल्याचा दावाशेतकरी हिताचा सर्वंकष विचार व्हावा

योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संसदेत संमत झालेल्या कृषीसंबंधी तीन विधेयकांना राजकीय पातळीवर विरोध सुरू झाला आहे. काँग्रेसने दिल्ली ते गल्ली विरोध करण्याची भूमिका घेतली असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत भारतीय किसान संघानेदेखील सरकारला घरचा अहेर दिला आहे. या विधेयकाबाबत किसान संघाकडून नाराजीचा सूर व्यक्त करण्यात आला आहे. या विधेयकाबाबत आमच्या सूचना केंद्र सरकारने विचारात घेतल्या नाहीत. दुरुस्तीसह हे विधेयक का संमत करण्यात आले नाही, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.संसदेत कृषी उत्पादन, व्यापार आणि वाणिज्य सुधार विधेयक, शेतमाल हमीभाव विधेयक व अत्यावश्यक वस्तू विधेयक ही तीन विधेयके संमत झाली. ५ जून २०२० रोजीच्या अध्यादेशानंतर भारतीय किसान संघाने केंद्र, राज्य व गावपातळीवर ग्रामसमितींच्या माध्यमातून १ जुलै ते १५ आॅगस्ट २०२० या ४५ दिवसात पंतप्रधान व केंद्रीय कृषिमंत्र्यांना ई-मेल केले होते. याशिवाय १५ हजार गावांतून पत्रेदेखील पाठविण्यात आली व अध्यादेशात सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली. किसान संघाच्या पदाधिकाऱ्यांना सरकारी पातळीवर अपेक्षित सुधारणादेखील पोहोचविल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात विधेयकाच्या मसुद्यात या सुधारणांचा समावेशच झाला नाही. त्यामुळे किसान संघामध्ये नाराजीचा सूर आहे.सर्वच पातळींवर धोरणात्मक बदल हवाभारतीय किसान संघाने सरकारसमोर काही प्रमुख मागण्या ठेवल्या होत्या. पीक खरेदी करणाºया व्यापाऱ्यांची किसान पोर्टलवर नोंदणी व्हावी, सरकारने एमएसपी खरेदीची कायदेशीर व्यवस्था लागू करावी व नियमभंग करणाºयांविरोधात शिक्षेची तरतूद करावी, खासगी खरेदीवर नियंत्रण हवे, वादविवाद निपटाºयासाठी कृषी न्यायालय स्थापित करावे, कराराच्या शेतीसाठी नियम बनवावे व जमाखोरी करायला वाव राहणार नाही यादृष्टीने नियम बनवावेत या प्रमुख मागण्या होत्या. तुकड्या-तुकड्यांनी विचार करून काम होणार नाही. सगळ्याच पातळींवर धोरणात्मक बदल हवा. कांद्यावर निर्यातबंदी लावणे हे सोयीचे नाही, असे मत किसान संघाचे राष्ट्रीय संघटनमंत्री दिनेश कुळकर्णी यांनी व्यक्त केले.रस्त्यांवर उतरणार नाही, चर्चेस तयारकृषी विधेयकातील अर्ध्या तरतुदींशी भारतीय किसान संघ सहमत आहे. बाजार खुले होणे आवश्यक आहे व दलालांवर नियंत्रण येणेदेखील गरजेचे आहे. खासगी खरेदीवरदेखील नियंत्रण हवेच. परंतु सुधारणांचा विचारदेखील व्हायला हवा होता. आम्ही रस्त्यांवर उतरून, धान्य फेकून आंदोलन करणार नाही. आम्ही सरकारशी चर्चेला तयार आहो, असे प्रतिपादन भारतीय किसान संघाचे विदर्भ प्रांत अध्यक्ष नाना आखरे यांनी केले.

 

टॅग्स :agricultureशेती