शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

संधीच्या बंधनामुळे एमपीएससी परीक्षार्थ्यांची नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:09 IST

एमपीएससीच्या व्यवस्थापनावर आक्षेप : वेळेत परीक्षा घेण्याची मागणी नागपूर : एमपीएससीच्या परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने खुल्या गटासाठी ६, ...

एमपीएससीच्या व्यवस्थापनावर आक्षेप : वेळेत परीक्षा घेण्याची मागणी

नागपूर : एमपीएससीच्या परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने खुल्या गटासाठी ६, ओबीसीसाठी ९ संधी ठरवून दिल्या आहेत. यानुसार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केला आणि तो अर्ज आयोगाला मिळाला किंवा परीक्षार्थी परीक्षेला गैरहजर राहिला तरी ती संधी समजली जाईल. संधीचे बंधन लावल्यामुळे विद्यार्थ्यांवर दबाव वाढणार असून संधीची अट काढून टाकावी, अशा प्रतिक्रिया एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना संधीचे बंधन घालून देण्यात आले आहे. परंतु यूपीएससीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यानंतर पूर्व, मुख्य आणि मुलाखत एका वर्षात पार पडते. परंतु एमपीएससीच्या परीक्षा वेळेत होत नाहीत. पूर्व, मुख्य आणि मुलाखतीसाठी दीड वर्ष लागते. एखाद्या वेळी परीक्षा पुढे ढकलल्यास अडीच वर्षाचा कालावधी लागतो. निवड झालेल्या उमेदवारांना दीड वर्षापर्यंत नेमणूक देण्यात येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. नेमणूक न दिल्यामुळे त्यांना आंदोलन करण्याची गरज भासते. त्यामुळे एमपीएससीच्या परीक्षा यूपीएससी प्रमाणे वर्षभरात पूर्ण करण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे.

..............

अशी होईल संधीची गणना

एखाद्याने एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास ही संबंधित परीक्षेची संधी समजली जाईल. एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एक पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजली जाईल. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवार कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास ती परीक्षेची उपस्थिती समजली जाईल.

आधीच्या संधी ग्राह्य धरणे चुकीचे

‘एमपीएससीच्या परीक्षेसाठी संधी ठरवून देण्याचा निर्णय चांगला आहे. यामुळे विद्यार्थी अधिक मेहनत करून परीक्षेची तयारी करतील. परंतु विद्यार्थ्याने आधीचे केलेले प्रयत्न मोजणे चुकीचे आहे. नियम लावल्यापासून संधी मोजण्याची गरज आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.’

-उमा देशमुख, एमपीएससी परीक्षार्थी

गरीब विद्यार्थ्यांचे नुकसान होणार

‘संधीमुळे पार्टटाईम जॉब करून एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. त्यांना मोजक्याच संधीत तयारी करावी लागेल. आधी भरपूर संधी असल्यामुळे त्यांच्यावर दबाव राहत नव्हता. परंतु आता जशजशा संधी कमी होतील तसा त्यांच्यावर दबाव वाढणार आहे. याशिवाय सर्वांना समान संधी उपलब्ध करून द्याव्यात आणि पेपरला विद्यार्थी गैरहजर राहिल्यास ती संधी समजू नये.’

-शुभांगी इंजेवार, एमपीएससी परीक्षार्थी

संधीची अट काढून टाकावी

‘पूर्वी एमपीएससीच्या परीक्षेसाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करण्याची संधी होती. परंतु आता मोजक्याच संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांवर दबाव वाढणार आहे. संधी कमी होतील तसी विद्यार्थ्यांना धडकी भरणार आहे. यामुळे गरीब विद्यार्थ्यांमध्ये निराशा वाढीस लागणार असल्यामुळे एमपीएससीसाठी संधीची अट काढून टाकणे आवश्यक आहे.’

-अक्षय वरघणे, एमपीएससी परीक्षार्थी

संधीची अट चुकीची

‘एमपीएससी दरवर्षी परीक्षा घेत नाही. त्यामुळे संधी असूनही अनेक विद्यार्थ्यांचे वय निघून जाते. शिवाय संधी असल्यास विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेत तरी त्यापासून अनुभव घेऊन पुढील परीक्षेत चांगली तयारी करतील. त्यामुळे संधीची अट चुकीची आहे. एमपीएससीने ही अट रद्द करावी.’

-नीतेश गेडाम, एमपीएससी परीक्षार्थी

............