शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

संधीच्या बंधनामुळे एमपीएससी परीक्षार्थ्यांची नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:09 IST

एमपीएससीच्या व्यवस्थापनावर आक्षेप : वेळेत परीक्षा घेण्याची मागणी नागपूर : एमपीएससीच्या परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने खुल्या गटासाठी ६, ...

एमपीएससीच्या व्यवस्थापनावर आक्षेप : वेळेत परीक्षा घेण्याची मागणी

नागपूर : एमपीएससीच्या परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने खुल्या गटासाठी ६, ओबीसीसाठी ९ संधी ठरवून दिल्या आहेत. यानुसार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केला आणि तो अर्ज आयोगाला मिळाला किंवा परीक्षार्थी परीक्षेला गैरहजर राहिला तरी ती संधी समजली जाईल. संधीचे बंधन लावल्यामुळे विद्यार्थ्यांवर दबाव वाढणार असून संधीची अट काढून टाकावी, अशा प्रतिक्रिया एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना संधीचे बंधन घालून देण्यात आले आहे. परंतु यूपीएससीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यानंतर पूर्व, मुख्य आणि मुलाखत एका वर्षात पार पडते. परंतु एमपीएससीच्या परीक्षा वेळेत होत नाहीत. पूर्व, मुख्य आणि मुलाखतीसाठी दीड वर्ष लागते. एखाद्या वेळी परीक्षा पुढे ढकलल्यास अडीच वर्षाचा कालावधी लागतो. निवड झालेल्या उमेदवारांना दीड वर्षापर्यंत नेमणूक देण्यात येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. नेमणूक न दिल्यामुळे त्यांना आंदोलन करण्याची गरज भासते. त्यामुळे एमपीएससीच्या परीक्षा यूपीएससी प्रमाणे वर्षभरात पूर्ण करण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे.

..............

अशी होईल संधीची गणना

एखाद्याने एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास ही संबंधित परीक्षेची संधी समजली जाईल. एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एक पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजली जाईल. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवार कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास ती परीक्षेची उपस्थिती समजली जाईल.

आधीच्या संधी ग्राह्य धरणे चुकीचे

‘एमपीएससीच्या परीक्षेसाठी संधी ठरवून देण्याचा निर्णय चांगला आहे. यामुळे विद्यार्थी अधिक मेहनत करून परीक्षेची तयारी करतील. परंतु विद्यार्थ्याने आधीचे केलेले प्रयत्न मोजणे चुकीचे आहे. नियम लावल्यापासून संधी मोजण्याची गरज आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.’

-उमा देशमुख, एमपीएससी परीक्षार्थी

गरीब विद्यार्थ्यांचे नुकसान होणार

‘संधीमुळे पार्टटाईम जॉब करून एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. त्यांना मोजक्याच संधीत तयारी करावी लागेल. आधी भरपूर संधी असल्यामुळे त्यांच्यावर दबाव राहत नव्हता. परंतु आता जशजशा संधी कमी होतील तसा त्यांच्यावर दबाव वाढणार आहे. याशिवाय सर्वांना समान संधी उपलब्ध करून द्याव्यात आणि पेपरला विद्यार्थी गैरहजर राहिल्यास ती संधी समजू नये.’

-शुभांगी इंजेवार, एमपीएससी परीक्षार्थी

संधीची अट काढून टाकावी

‘पूर्वी एमपीएससीच्या परीक्षेसाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करण्याची संधी होती. परंतु आता मोजक्याच संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांवर दबाव वाढणार आहे. संधी कमी होतील तसी विद्यार्थ्यांना धडकी भरणार आहे. यामुळे गरीब विद्यार्थ्यांमध्ये निराशा वाढीस लागणार असल्यामुळे एमपीएससीसाठी संधीची अट काढून टाकणे आवश्यक आहे.’

-अक्षय वरघणे, एमपीएससी परीक्षार्थी

संधीची अट चुकीची

‘एमपीएससी दरवर्षी परीक्षा घेत नाही. त्यामुळे संधी असूनही अनेक विद्यार्थ्यांचे वय निघून जाते. शिवाय संधी असल्यास विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेत तरी त्यापासून अनुभव घेऊन पुढील परीक्षेत चांगली तयारी करतील. त्यामुळे संधीची अट चुकीची आहे. एमपीएससीने ही अट रद्द करावी.’

-नीतेश गेडाम, एमपीएससी परीक्षार्थी

............