शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

विघ्नहर्त्याच्या मूर्ती व्यवसायावर विघ्न; मूर्तीकारांमध्ये संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 23:00 IST

सरकारकडून टाळेबंदी शिथिल झाल्याने आणि मुर्तीकारांना सवलत दिल्याने चार फुटापर्यंतच्या मूर्तींना आकार दिला जात आहे. मात्र, उत्सवालाच परवानगी मिळाली नाही तर परिश्रमावर पाणी फेरले जाईल, अशी भितीही मुर्तीकारांमध्ये आहे.

ठळक मुद्देअजूनपर्यंत ऑर्डर्स नाहीत

धीरज शुक्लालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : श्रीगणेशोत्सवास २२ ऑगस्टपासून प्रारंभ होतो आहे. तरीदेखील या उत्सवाच्या भव्यदिव्यतेवर संभ्रम संपलेला नाही. मोठ्या स्वरूपात हा उत्सव साजरा करणाऱ्या आयोजकांना उत्सवाच्या परवानगीची प्रतिक्षा आहे तर मुर्तीकारांना मूर्तीच्या ऑर्डर्सची. कोविड-१९च्या संकटात विघ्नहर्त्याप्रति आस्थेचा भाव असणाऱ्यांना भक्तांना देवाच्या कृपेची आशा आहे आणि हा पर्व जल्लोषात साजरा होईल, अशी अपेक्षा आहे.श्रीगणेशाच्या मूर्ती बनविणाऱ्यांकडे कायम वर्दळ असणाऱ्या चितारओळीमध्ये कोरोनामुळे नीरव शांतता पसरली आहे. सरकारकडून टाळेबंदी शिथिल झाल्याने आणि मुर्तीकारांना सवलत दिल्याने चार फुटापर्यंतच्या मूर्तींना आकार दिला जात आहे. मात्र, उत्सवालाच परवानगी मिळाली नाही तर परिश्रमावर पाणी फेरले जाईल, अशी भितीही मुर्तीकारांमध्ये आहे. मूर्तीकार मूर्ती बनवतील अशी अपेक्षा आयोजकांमध्ये आहे तर आयोजक परवानगी घेऊन ऑर्डर देतील अशी अपेक्षा मुर्तीकारांना आहे.

त्याच अनुषंगाने काही आयोजक मनपा प्रशासनाकडून उत्सवाची परवानगी घेण्यासाठी पोहोचलेही होते. मात्र, परवानगी २१ दिवस आधी म्हणजेच १ ऑगस्टला मिळेल असे सांगून त्यांना माघारी पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येते. या प्रकारामुळे मुर्तीकारांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे. जर अशा तºहेने परवानगी दिली आणि आयोजकांनी त्यानंतर ऑर्डर दिली तर मोठ्या परिश्रमानेही एवढ्या कमी वेळेत केवळ दोन ते चारच मूर्ती आकार घेऊ शकणार असल्याचे मूर्तीकार सांगतात. जर असेच झाले तर वर्षभराचा रहाटगाडा कसा चालेल? आणि याच क्षेत्रात ऐन व्यवसायाच्या काळात कोरोना संक्रमित आढळला तर व्यवसाय आणि परिश्रम दोन्हीचा सत्यानाश होईल, अशी भिती मुर्तीकारांमध्ये निर्माण झाली आहे. मनपा प्रशासनाकडून या संदर्भात कुठलीच तयारी दिसून येत नाही.महागाई वाढली, भाड्याचा भारही डोक्यावर!: या काळात मुर्तीकार दुहेरी संकटात सापडले आहे. मूर्ती बनविण्यात उपयोगात येणारी माती, बारदाना, लाकूड आणि रंगाचे भाव वाढले आहेत. त्यामुळे, हा कच्चा माल ३० ते ४० टक्के महाग घेतला जात आहे. काही मुर्तीकारांनी ५० ते एक लाख रुपये प्रमाणे दुकाने भाड्याने घेतले आहे. मात्र, मूर्तींसाठीचे ऑर्डर्स येत नसल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली आहे. अशा स्थितीत भाडे द्यायचे की मूर्तीचे साहित्य आणायचे, अशी विवंचना आहे. तुर्तास चार फुटापर्यंतच्या मूर्तीसाठी भंडारा, यवतमाळ, छिंदवाडा आदी ठिाकाणांहून माती मागवली जात आहे.पीओपीची गाडी अजूनही सुसाट सोमवंशी आर्य क्षत्रीय समाजाने काहीच दिवसांपूर्वी पीओपी मूर्तींवर बंदी घालण्यासाठी आंदोलन केले होते तरी देखील शहरात या मूर्ती येत आहेत. अमरावती, काटोल, वरूड आदी ठिकाणांहून या मूर्ती शहरात पोहोचत आहेत.सरकारने धोरण स्पष्ट करावे - चंद्रशेखर बिंड रामनवमी उत्सवासाठी मूर्ती बनविणाºया मूतीर्कारांना ऐनवेळी मोठे नुकसान सहन करावे लागले होते. श्रीगणेशोत्सवासाठी आता फारच कमी वेळ शिल्लक आहे. त्यामुळे, सरकारने आपले धोरण स्पष्ट केल्यावरच मोठ्या मूर्तींच्या निमार्णासंदर्भात आपले धोरण स्पष्ट करणे अपेक्षित असल्याची भावना सोमवंशी आर्य क्षत्रीय समाजाचे अध्यक्ष चंद्रशेखर बिंड यांनी व्यक्त केली.वर्षभराच्या अपेक्षेवर फेरले पाणी - विजय तायवाडे मूतीर्कारांना वर्षभर श्रीगणेशोत्सवाची प्रतिक्षा असते. मूर्तींच्या भरवशावरच मूतीर्कारांच्या कुटूंबाचे उदरनिर्वाह होत असते. मात्र, परवानगी संदर्भात कोणतेही स्पष्ट धोरण नसल्याने आमच्या अपेक्षेवर पाणी फेरल्या गेल्याचे सोमवंशी आर्य क्षत्रीय समाजाचे सचिव विजय तायवाडे यांनी सांगितले. 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव